गुळमळीचा ट्रक अल्टो कारवर पलटी, कार मधील सात जण ठार, तर चार जण जखमी
तुळजापूर, दि. १८ (प्रतिनिधी ) :
तुळजापूर घाटाच्या वळणात मळीचा ट्रक क्रं. एम एच आर 6537
सोलापूरच्या दिशेने जात असताना, सोलापूरहून तुळजापूरकडे येत असलेली अल्टो कार नं. एम एच १२ वाय. ए. ३६७२ वर पलटी झाल्याने कारमधील सात जण ठार, तर चार जण जखमी झाले. सदरचा अपघात सोमवार रोजी दि. १८ फ्रेबुवारी ५.३o च्या सुमारास झाला.
सोलापूर मार्गाने मळी घेऊन सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, तो अल्टो कारवर पलटी झाल्याने कारमधील सात जण जागीच ठार तर, चार जण जखमी झाले, त्या जखमीना पुढील उपचारासाठी शासकिय रुग्णालय उस्मानाबाद येथे हलवीण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप घुगे, पालिस निरिक्षक तानाजी दराडे, योगेश खटाने , अतुल यादव पोलीस व किरेणच्या व जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले.
मयत रजनी प्रेमकुमार चिलधरे, वय ३५, शिवकुमार गोविंद पोवत्ते, वय ४० वर्ष , नर्मदा शिवकुमार पोवत्ते, ३५ वर्ष, नेताजी शिवकुमार पोवत्ते, १२ वर्ष, श्रध्दा शिवकुमार पोवत्ते वय ४ वर्ष , अर्पवा प्रेम कुमार चिलवरे १३ वर्ष , वर्षा लिंबराज अडम १२ वर्ष सात जणांचा मुत्यू झाला आहे.
जखमी नागेश कॅनम वय ३२ , मयुरी नागेश कॅनम वय २५ , ऋतीका शिवकुमार पोवत्ते वय १५ , श्रावणी भालचंद्र महुत वय आठ वर्ष यांना शासकिय रुगनालय उस्मानाबाद येथे उपचारासाठी पाठवीले आहे.
(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा