लातूर/न्यूज सिक्सर
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने औसा उमरगा तुळजापूर रोड वरती औसा चौक येथे दि 30 रोजी 12.30 च्या सुमारास रास्ता रोको करण्यात आला मातंग समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात गेल्या तीन दिवसांपासून लातूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू आहे लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष अंगद वाघमारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मायाताई लोंढे हे आमरण उपोषण करत आहेत आज उपोषणनाचा चौथा दिवस आहे त्या उपोषणाची तात्काळ दखल घेण्यात यावी यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला यावेळी लहुजी शक्ती सेनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, ग्रामीण जिल्हाध्यक्ष लातूर काशिनाथ सगट,शिवाजी लोंढे,अँड भागवत सगट,संपत गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने मातंग समाजातील महिला व पुरुष उपस्थित होते यावेळी काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले खालील प्रमाणे मातंग समाजाच्या मागण्या आहेत लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडी येथील मातंग समाजाचे पुनर्वसन करण्यात यावे,मदनसुरी ता निलंगा येथील अशोक शिंदे यांचा खून झाला असून त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत समाविष्ट करावे व पंचवीस लाखाची मदत करावी,पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना हटवण्यात यावे व दुसऱ्या पालकमंत्र्याची नियुक्ती करण्यात यावे तसेच पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे,लातूर जिल्ह्यातील लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी व कुटुंबाच्या जीवाला व मातंग जातीला यापुढे जीवित हानी,आर्थिक हानी,मानसिक छळ झाल्यास याला पालकमंत्री व पोलीस अधीक्षक,महाराष्ट्र शासन यांना जबाबदार धरण्यात यावे,लातूर जिल्ह्यातील मातंग समाजावर आतापर्यंत हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शासन करण्यात यावे यासह विविध मागण्या आहेत
रास्ता रोको वेळी दोन्ही बाजूनी वाहनांची लांब पर्यंत रांगा होत्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त होता यावेळी उपस्थित असलेल्या नायब तहसिलदार यांना लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले