गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्यास विधानसभा लढविणार : अँड अनिल काळे

भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्यास विधानसभा लढविणार : अँड अनिल काळे


तुळजापूर /प्रतिनिधी

आगामी काळात सन २०१९ मध्ये होणा-या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रबळ दावेदारी करत असताना पक्षाचे धोरण व सरकारच्या योजना जनतेपर्यंत पाहोंच करण्यात यश आलेले आहे. मग "वन बुथ २५ युथ" ही योजना असेल गाव तेथे शाखा योजना असेल. तसेच समाजातील सर्व घटक महिला, तरूण यांना जोडण्याचे काम सातत्याने करत असल्याने, माझ्या सारख्या उच्च, विद्याविभुषित व स्वच्छ प्रतिमेच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने तुळजापूर, विधानसभा मतदार संघामधून उमेदवारी दिल्यास मी, विधानसभा लढवणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य, अँड अनिल काळे यांनी सांगितले


तुळजापूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा काळे यांनी तालुका भाजप कार्यालय येथे पत्रकारदिन विशेष सन्मान सत्कार आयोजित केला होता त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले,यावेळी तुळजापूर शहर व ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी बोलताना पुढे म्हणाले की मी, गेल्या २५ वर्षापासून भाजपामध्ये अनेक प्रतिकुल परिस्थितीमध्ये काम करत असून, मौजे केमवाडी ग्रामपंचायतीचा सरपंच, मौजे सावरगांव-केमवाडी वि.का.से.सो. चा चेअरमन म्हणूनही काम केले आहे. तुळजापूर तालुका व धाराशिव जिल्हयामध्ये पक्षाच्या विविध पदावर काम केलेले आहे. भाजपाचा तुळजापूर तालुक्याचा कार्यकारिणी सदस्य म्हणून सन १९९६ मध्ये कामास सुरूवात करून, धाराशिव जिल्हा सहकार आघाडीचा अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, विधानसभा मतदार संघाचा पालक, प्रभारी म्हणून सध्या काम करत आहे. या कालावधी मध्ये पक्षाने संघटनेसाठी जी कांही जबाबदारी सोपविली, ती प्रामाणिकपणे, सातत्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता, पार पाडलेली आहे.


पक्षामध्ये काम करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधण्याचा व त्यांच्या कामाच्या पध्दतीचा अनुभव जवळून पाहता आला. तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  तसेच ज्यांच्यामुळे राजकारणामध्ये मला खंबीर साथ मिळाली व सुख-दुःखामध्ये मला साथ दिली ते भाजपाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यामुळे हा राजकारणातील यशस्वी प्रवास करता आला.


आपण कांही तरी समाजाचे देणे लागतो, 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या भावनेने काम करत असताना तुळजापूर तालुक्यातील गोर-गरीब, शेतकरी, तरूण सर्व जाती धर्मातील नागरीक यांच्यासाठी आपल्याला कांही चांगले काम करता आले तर त्यातच मी, धन्यता मानणारा कार्यकर्ता आहे.


तुळजापूर विधानसभा मतदार संघामध्ये उद्योग-धंद्याची वाणवा आहे, आहे ते सहकरातील सर्व उद्योग बंद पडलेले आहेत, सहकारी बँकाही बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी, तरूण व नागरीक यांच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा आहे. शेतीसाठी शाश्वत पाणी नसल्याने शेती पिकत नाही, त्यामुळे शेतकरी सुजलाम-सुफलाम व्हावे, म्हणून माझे स्वप्न आहे, ते स्वप्न साकार करण्यासाठी उजनीचे पाणी तुळजापूर तालुक्याला मिळायला पाहिजे, यासाठी मी, प्रयत्नशिल आहे. घाटने बॅरेजेसमधून कॅनॉलद्वारे पाणी रामधरापर्यत आणणे व तेथुन मोर्डा मार्गे लोहारा, नळदुर्ग व उमरगा या मार्गे नेणे, हे स्वप्न पूर्ण करण्याकरिता मी, प्रामाणिकपणे प्रयत्नशिल आहे.


श्री.तुळजाभवानी मातेचा आशिर्वाद आपणा सर्वाना आहे, त्यांचे नांव असलेल्या तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय वाचावे व ते बंद पडू नये व ते सरकार अधिग्रहीत करावे, यासाठी मी, शासनाकडे सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच तुळजापूरला एम.आय.डी.सी. नाही, ती आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच महाराष्ट्रातून व देशभरातून श्री.तुळजाभवानी मातेच्या दर्शनाकरिता लाखो भाविक तुळजापूरला दर्शनासाठी येत असतात, त्यांच्या सोयी-सुविधाकरिता प्राधिकरणाच्या माध्यमातून तुळजापूरचा विकास करणे हे प्रथमतः प्राधान्याने करणे हे माझे उद्दिष्ट आहे.


तुळजापूर तालुक्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असून, शेजारील मोठी गांवे स्मार्ट व्हीलेज कशी बनविता येतील, यासाठी प्रयत्नशील आहे. शेतक-यांच्या मालाला भाव मिळत नाही, शेतक-यांनी उत्पादन केलेल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहच करणे व प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभ कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहे, त्यामुळे स्वप्नातील तुळजापूर तालुका घडविण्याचा प्रयत्न करणार आहे.


अनेक वर्षापासून पक्षासाठी एकनिष्ठेने व निष्कलंकपणे सतत कार्यरत राहणारा कार्यकर्ता म्हणून मी, माझी प्रतिमा जपण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. तसेच सर्व धर्मीय जनतेच्या संपर्काच्या माध्यमातून जनतेच्या समस्यां सोडविण्याचा प्रयत्न करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. यापूर्वी दोन्ही वेळेस विधानसभेकरिता पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती. परंतु जरी पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तरी पक्षाचा एक पाईक म्हणून त्या-त्या उमेदवाराचा निवडणूकीमध्ये प्रामाणिकपणे प्रचार करून, निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे.





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

बुधवार, ३० जानेवारी, २०१९

नळदुर्ग पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी आपल्या कन्येचा वाढदिवस आपलं घर येथे साजरा करून तेथील मुलांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

नळदुर्ग पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी आपल्या कन्येचा वाढदिवस आपलं घर येथे साजरा करून तेथील मुलांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप 

मुख्याधिकारी गायकवाड यांचा हा उपक्रम एक आदर्श उपक्रम असून त्यांचा हा आदर्श इतरांनी ही घेण्यासारखा आहे

नळदुर्ग /सुहास येडगे 

नळदुर्ग पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी आपल्या कन्येचा वाढदिवस येथील आपल घर या आनाथ मुलांच्या प्रकल्पामध्ये साजरा करुन अनाथ विदयार्थी विदयार्थीनींना शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली. दरम्यान या उपक्रमाबददल मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांचे कौतुक केले जात आहे.

मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी आपली मुलगी परी हिचा वाढदिवस अत्यंत साध्या पध्दतीने आणि अनाथ मुलां बरोबर साजरा करण्याचा संकल्प केला होता आणि त्या नुसार गेल्या दोन वर्षापासून नळदुर्ग येथील आपल घर या अनाथ मुलांच्या बालग्राम मध्ये त्यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे. आज परी चा वाढदिवस होता आणि सकाळीच आपल घर बालग्राम मध्ये हा वाढदिवस अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करुन आपल घर मधील आनाथ मुला मुलींना शैक्षणिक साहीत्याची भेट ही देण्यात आली. या वेळी अनाथ मुला मुलींच्या चेहऱ्यावर मोठया प्रमाणात आनंद झालेला दिसून येत होता. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांचा हा उपक्रम एक आदर्श उपक्रम असून त्यांचा हा आदर्श इतरांनी ही घेण्यासारखा आहे. या उपक्रमामुळे सकळ मराठा परिवार व त्या बरोबर शहरातील नागरीकांकडून श्री गायकवाड यांचे कौतुक होत आहे शिवाय मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी आनाथ मुला मुलींमध्ये जावून त्याच्यातील एक अविभाज्य घटक बनून आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करणारे उमाकांत गायकवाड हे एकमेव मुख्याधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्याचा शहरातील नागरीकांतून कौतुक केले जात आहे.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

गतीरोधक बसविण्याच्या मागण्यासाठी मनसेचा आंदोलनाचा इशारा

गतीरोधक बसविण्याच्या मागण्यासाठी मनसेचा आंदोलनाचा इशारा



तुळजापूर / सिद्दीक पटेल 

शहरातील शिवाजी चौक ते पार्किंगकडे जाणा-या रस्त्यावर गतीरोधक बसविण्याच्या मागणीकरीता  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तुळजापूर तहसलिदार योगिता कोल्हे यांना देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की, शिवाजी चौक ते पार्किंगकडे जाणा-या रस्त्यावर गतीरोधक बसविण्याबाबत यापूर्वी वारंवार निवेदन देवूनही अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.‍ त्यामुळे मनसेच्यावतीने दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता प्रतिकात्मकरित्या गतीरोधक करुन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर मनसेचे शहराध्यक्ष धर्मराज सावंत शहर उपाध्यक्ष अविनाश पवार, सचिव नंदकुमार पेंदे, मनसविचे जिल्हा उपाध्यक्ष अमीर शेख, जिल्हा सचिव सुरज कोठावळे, विशाले माने आदींच्या स्वाक्ष-या आहेत.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

रविवार, २७ जानेवारी, २०१९

हे सरकार घोषणाबाजी करणारे पुन्हा येणार नाही -आमदार मधुकरराव चव्हाण

हे सरकार घोषणाबाजी करणारे पुन्हा येणार नाही : आमदार मधुकरराव चव्हाण

तुळजापूर विकास प्राधिकारणातील तीन विकास कामांचे भूमिपूजन

तुळजापुरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा चे आमदार सुजितसिंह ठाकूर यांना निमंत्रित केले नाही म्हणून दाखवले काळे झेंडे 

तुळजापूर  /प्रतिनिधी

राज्य आणि केंद्रातील भाजपची सरकार केवळ घोषणाबाजी करणारे सरकार आहे हे सरकार नक्की पुन्हा येणार नाही असा दावा तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दिलजमाई झाल्याप्रमाणे या कार्यक्रमात राजकीय मैत्री दिसुन आली. 


तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत जवाहर नवोदय विद्यालय ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ,  हेलिपॅड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह आणि मातंगनगर येथील ८० लाख किमतीचे सभागृह या तीन कामाचे भूमिपूजन माजी परिवहन मंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी राज्यमंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील हे उपस्थित होते . व्यासपीठावर तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य माजी आमदार नरेंद्र बोरगावकर , आप्पासाहेब पाटील , नगराध्यक्ष अर्चना गंगणे  , प्रभारी नगराध्यक्ष बापूसाहेब कने , पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोकुळ शिंदे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर मगर ,नगरसेविका वैशाली कदम, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरसिंग जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.


याप्रसंगी उद्घाटक आमदार मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर नगरपालिकेची जबाबदारी मोठी आहे प्राधिकरणाच्या माध्यमातून जी विकासकामे केली आहेत त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना जो निधी मिळणार आहे त्याचा योग्य वापर करून भक्तनिवास त्याचा उपयोग भक्तांना भावा तसेच तुळजापूर शहरात रखडलेला महत्त्वाचा रस्ता आर्य चौक जवाहर गल्ली ते साळुंखे चौक गल्ली हा दोन्ही बाजूंनी समान जागा घेऊन करण्यासाठी मंत्रालय स्तरावरील काम पूर्ण झाले आहे. लवकरच हे काम देखील पूर्ण करण्याच्या अनुषंगाने पावले टाकावीत जी कामे अपूर्ण आहेत त्या गुत्तेदारांना पैसे न देता काम पूर्ण व दर्जेदार झाल्याशिवाय पैसे दिले जाणार नाहीत असे सांगितले


तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर भक्तांना विरंगुळा म्हणून थांबण्यासाठी रामदरा तलावांमध्ये बगीचा आणि बोटिंग विकसित करण्यासाठी प्राधिकरणामध्ये तरतूद केलेली आहे त्यालाही आगामी काळात लवकरच सुरुवात करून येणाऱ्या भक्तांना निसर्गसौंदर्यात वापरता येण्याची सोय करण्याचा मानस आहे याशिवाय या सरकारने कृष्णा खोऱ्याच्या पाण्याच्या अनुषंगाने जो लावा नेमलेला आहे त्यामुळे आपले हक्काचे 21 टी एम सी चे पाणी वाढून ते 40 टक्क्यांपर्यंत वाढू शकते असा दावा आमदार चव्हाण यांनी करताना या सरकारने या योजनेसाठी कोणताही निधी दिला नाही केवळ घोषणाबाजी करून लोकांना या सरकारने नाराज केले आहे त्यामुळे हे सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही यांनी केलेल्या घोषणा आपल्याला पूर्ण करावे लागतील असा राजकीय टोला मारला. तुळजाभवानी शाकंबरी सांस्कृतिक महोत्सव पुन्हा सुरू करण्यासाठी आपण  बैठकीमध्ये विषय मंजूर केला आहे त्याशिवाय तुळजापूर शहरांमध्ये सांस्कृतिक सभाग्रह ची गरज लक्षात घेऊन अद्यावत नाट्यग्रह बांधण्यासाठी देखील नगरपालिकेकडे जागेची मागणी केलेली आहे नगरपालिकेने नाट्यगृहासाठी जागा देऊन त्याच्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्यास शहराला चांगले नाट्यग्रह मिळणार आहे असेही मधुकराव चव्हाण यांनी सांगितले


याप्रसंगी प्रमुख अतिथी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर तीर्थक्षेत्रांसाठी काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सुरुवात झाली आणि तुळजापूरच्या विकासाला गती देणारा कार्यक्रम त्यांनी दिला तो पूर्ण होण्यासाठी विलंब होत असला तरी मधुकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम पुढे चालू आहे त्यातील तीन विकासकामांचे आज होणारे भूमिपूजन देखील समाधानकारक आहे यासह नाट्यगृहाच्या प्रश्नांमध्ये नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष घालून त्यासाठी आवश्यक मंजुरी मिळवाव्यात आणि शहराला चांगले नाट्यग्रह उपलब्ध करून द्यावे.  याशिवाय शहराची गरज लक्षात घेऊन शंभर खाटांचे आयसीयू सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल झाल्यास तुळजापूर परिसराची मोठी गरज पूर्ण होणार आहे आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनुषंगाने योग्य ते प्रयत्न केले जावेत रामदारा तलावांमध्ये भाविक भक्तांना वावरता यावे असे पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात यावे अशा महत्त्वाच्या सूचना त्यांनी केल्या. तीर्थक्षेत्र विकास समितीचे सदस्य माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून शहराच्या विकासाला निश्चित गती मिळाली आहे असे सांगितले तर प्राधिकरणाचे सदस्य आप्पासाहेब पाटील यांनी शहराच्या विकासाच्या गरजा लक्षात घेऊन प्राधिकरणाने तयार केलेला आराखडा पूर्ण होत आला आहे मात्र निधीची गरज आहे असे सांगितले प्रारंभी नगराध्यक्ष बापूसाहेब कने यांनी प्रास्ताविक भाषणात नगरपालिकेने केलेल्या विकास कामांची माहिती देऊन तुळजापूर नगरपालिका सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे आणि हाती घेतलेली विकासकामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतिष महामुनी आणि आभार प्रदर्शन नगरसेवक अमर मगर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत रणजीत इंगळे  राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष आनंद कंदले,  संदीप गंगणे, पंडित जगदाळे , सचिन पाटील , प्रा. आशा बिडकर , विजय कंदले आदींनी केले. कार्यक्रमास माजी नगरसेवक राजा मामा भोसले , बाळासाहेब शिंदे , औदुंबर कदम ,लखन पेंदे,  भारत कदम ,अमर हंगरगेकर ,किशोर साठे ,अफसर शेख, सचिन रोचकरी  ,खंडू जाधव , सुनील रोचकरी, संतोष कदम ,कुलदीप मगर, विजय गंगणे, अभिजित कदम , राजेश शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवताना भाजपा कार्यकर्ते


चौकट मध्ये :

तुळजापुरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रमास आमदार सुजितसिंह ठाकूर यांना निमंत्रित न केल्याबद्दल निषेध करण्यासाठी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली सुमारे वीस मिनिटे घोषणा देत कार्यकर्त्यांनी नगरपालिकेचा निषेध केला दरम्यान सत्ताधारी नगरपालिकेच्या कार्यकर्त्याकडून देखील भाजप कार्यकर्त्यांना घोषणा देऊन प्रत्युत्तर देण्यात आले कोणताही अनुचित प्रकार न घडता हा घोषणाबाजीचा कार्यक्रम झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शनिवार, २६ जानेवारी, २०१९

दिनेश बागल यांची धाराशिव जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड

दिनेश बागल यांची धाराशिव जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी निवड.


तुळजापूर/प्रतिनिधी


भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते व झुंजार  प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश बागल, यांची धाराशिव जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा उपाध्यक्षपदी दि. 25 रोजी निवड झाली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी दि.25 रोजी धाराशिव येथे नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य व सी.एम. चषक, तुळजापूर विधानसभा पालक अॅड.अनिल काळे, व धाराशिव जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष प्रदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.


दिनेश बागल हा कार्यकर्ता अतिशय कष्टाळू व मनमिळावू कार्यकर्ता असून, झुंजार प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुळजापूर शहरांमध्ये व तालुक्यामध्ये अनेक समाजोपयोगी कामे केलेली असून, सर्वांसोबत राहून, तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करून, भारतीय जनता पार्टीचे कार्य व धोरण, सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोच करून, भाजपाचे संघटन मजबूत करेल, अशा अपेक्षा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी व प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड अनिल काळे यांनी व्यक्त केली. सदरची  निवड आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली झाली असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले.

या निवडीचे स्वागत प्रदेश सरचिटणीस व आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड.अनिल काळे, सरचिटणीस प्रभाकर मुळे, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद रोचकरी, विजय शिंगाडे, शहराध्यक्ष सुहास साळुंके, तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे, जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, शिवाजी बोधले, राम चोपदार, सचिन रसाळ, इंद्रजीत साळुंके, प्रसाद पानपुडे, दत्ता राजमाने, ऋषिकेश साळुंके, सागर पारडे, सागर कदम, विशाल वाघमारे, बाळासाहेब भोसले आदिंनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.




 (महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

बुधवार, २३ जानेवारी, २०१९

नळदुर्ग शहरासह ग्रामीण भागात कुस्ती खेळाला चालना मिळावी व चांगले कुस्ती पटटू निर्माण व्हावे यासाठी श्री खंडोबा यात्रेनिमीत्त भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले- अशोक जगदाळे

नळदुर्ग शहरासह ग्रामीण भागात कुस्ती खेळाला चालना मिळावी व चांगले कुस्ती पटटू निर्माण व्हावे यासाठी श्री खंडोबा यात्रेनिमीत्त भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले-अशोक जगदाळे.

  


नळदुर्ग/प्रतिनिधी

 हाप्पी डावावर आवघ्या दिड मिनीटात उत्तर महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान योगेश पवार याने महान भारत केसरी विजेता पैलवान योगेश बोंबाले याला आस्माना दाखवून नळदुर्ग ( मैलारपूर ) येथील श्री खंडोबा यात्रेतील कुस्ती स्पर्धा जिंकून एक लाख अकरा हजार 111 रुपयेचे पहिले पारितोषीक व मानाचा चांदीचा गदा मिळविला. शेवटची ही कुस्ती अतिशय चिततथराक झाली.


दि. 22 जानेवारी रोजी नळदुर्ग ( मैलारपूर ) येथे श्री खंडोबा यात्रेनिमीत्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पालिका व श्री खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समीतीने मैलारपूरात भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी पैलवानास एक लाख अकरा हजार 111 अकरा रपये व मानाचा चांदीचा गदा देण्यात आला. त्याचबरोबर या स्पर्धेत आणखी हजारो रुपयांची बक्षिसे देण्यात आले. प्रारंभी दुपारी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या हस्ते श्री हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करुन आखाडयाचे पूजन करण्यात आले. व त्या नंतर कुस्ती स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. उदघाटनानंतर शहरातील व ग्रामीण भागातील आलेल्या लहान मुलांच्या कुस्ती घेण्यात आल्या. यामध्ये नळदुर्ग येथील छोटा पैलवान समर्थ मारुती घोडके वय आठ वर्षे याने मैदान गाजविले. याने दोन कुस्त्या जिंकून नळदुर्गची कुस्ती क्षेत्रातील काय ताकद आहे हे दाखवून दिले.


या वेळी बोलताना अशोक जगदाळे म्हणाले की, कुस्ती हा खेळ मर्दानी खेळ आहे, मात्र सध्या हा खेळ लोप पावत चालल्याने आजच्या युवकांमध्ये कुस्ती खेळाची आवड निर्माण वहवी तसेच ग्रामीण भागात कुस्ती खेळाला चालना मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


या नंतर कुस्ती आखाडयात कुस्तयांच्या दंगलीला सुरुवात झाली. या स्पर्धेचे मुख्य आकर्षन म्हणजे लातूरची पैलवान श्रुती ठाकूर व परभणीचा पैलवान संतोष धुळगुडे यांच्यात झालेली कुस्ती. मुला मुलींच्या या कुस्ती मध्ये श्रुती ठाकूर हिने संतोष धुळगुडे यास जेरीस आणले होते मात्र अखेर पंचानी ही कुस्ती बरोबरीत सोडविली. त्याच बरोबर कु. साक्षी ठाकूर व कुमारी आहूती जाधवर यांच्यात झालेल्या कुस्ती मध्ये कु. साक्षी ठाकूर हिने विजय मिळविला. त्याच बरोबर या स्पर्धेत झालेल्या 51 हजार रुपये बक्षीसाच्या कुस्ती मध्‍ये खुदावाडीचा पैलवान सुंदर जवळगे यांने पुण्याच्या पप्पू काळेला आस्मान दाखविले तर दुसरी 51 हजाराची कुस्ती मध्ये पैलवान विकास धोत्रे सोलापूर व पैलवान बबलू धनके सिंदफळ यांच्यात झाली. मात्र ही कुस्ती पंचांनी बरोबरीत सोडविली. त्याच बरोबर या स्पर्धेत पैलवान अंगद बुलबुले सोलापूर, पैलवान मार्तंड मोकाशे अणदुर, पैलवान रोहीत डुकरे नळदुर्ग, पैलवान शशिकांत कांबळे रामलिंग मुदगड, पैलवान बाबासाहेब चव्हाण सोलापूर, पैलवान आकाश भोसले होर्टी, पैलवान ज्ञानेश्वर जाधव सोलापूर, पैलवान रविंद्र साखरे सोलापूर, पैलवान राघवेंद्र बरवे मानेवाडी, पैलवान वजीर मारीआईवाले मंद्रुप, पैलवान राम हराळे, पैलवान महेश शेळके सोलापूर या पैलवानांनी आपआपल्या गटात विजय मिळविला.  या स्पर्धेत लहान पैलवानांच्या तसेच तुळजापूर विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील अनेक पैलवानांच्या कुस्त्या झाल्या.


या नंतर शेवटची व मानाची कुस्ती उत्तर महाराष्ट्र केसरी विजेता व सोलापूर येथील श्री कृष्ण तालीम संघाचा योगेश पवार व महान भारत केसरी विजेता व गंगावेस तालीम संघ कोल्हापूरचा पैलवान योगेश बोंबाले यांच्यात झाली. दोन तगडया व ताकदवान पैलवानांची ही कुस्ती रंगतदार होण्याची शक्यता होती मात्र कुस्ती सुरु झाल्यानंतर पैलवान योगेश पवार यांने आवघ्या दिडच मिनीटात कुस्तीतील हाप्पी डावावर पैलवान योगेश बोंबाले याला आस्मान दाखवून पैलवान योगेश पवार याने स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये अकरा हजार 111 रुपये व मानाचा चांदीचा गदा पटकाविला. या कुस्ती मध्ये योगेश पवार याने योगेश बोंबाले यास कुठलीच बचावाची संधी दिली नाही. त्यामुळे आवघ्या दिडच मिनीटात ही कुस्ती निकाली लागली.


पहिली कुस्ती कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठाणच्या वतीने अशोक जगदाळे यांनी लावली होती तर स्पर्धेतील विजेत्या पैलवानास कै. नरहरी दादा बापूराव पूदाले यांच्या स्मरणार्थ पूदाले परिवारांकडून मानाचा चांदीचा गदा देण्यात आला.  त्याच बरोबर स्पर्धेतील प्रत्येक विजयी पैलवानास अशोक जगदाळे यांच्या कडून स्मृतीचिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आला. तर या स्पर्धेतील पहिल्या तीन कुस्तीतील विजेत्या पैलवानास कै. रेवप्पा सोनकांबळे यांच्या स्मरणार्थ राजेंद्र सोनकांबळे यांच्या कडून ढाल देवून त्यांचा गौरव करण्यात आला. ही स्पर्धा अतिशय शांततेत व चांगल्या वातावरणात व उत्साही वातावरणात पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या सहभागामुळे हि स्पर्धा अतिशय रंगतदार व थाटामाटात पार पडली. स्पर्धा पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकीन नागरीक उपस्थीत होते. या स्पर्धेसाठी अणदुरचे श्री घुगे, खुदावाडीचे उपसरपंच शिवप्पा जवळगे, भरत मेकाले, सुधाकर चव्हाण, शिवाजीराव वऱ्हाडे गुरुजी, राजेंद्र काशिद यांनी पंच म्हणून काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती समीतीचे अध्यक्ष राजाभाउ ठाकूर, उपाध्यक्ष अनिल पूदाले, बंडू विनायक पूदाले, पदमाकर घोडके, रमेश जाधव, संजय मोरे, संजय बताले, नितीन कासार, अमृत पूदाले, शरद बागल, विलास येडगे, तानाजी जाधव, सुहास येडगे, संतोष पूदाले, ज्ञानेश्वर घोडके, नवल जाधव, संजय विठठल जाधव यांनी परिश्रम घेतले. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवरांनी उपस्थीती दाखवीली शिवाय या सर्व मान्यवरांचा अशोक जगदाळे यांच्या हस्ते स्वागत ही करण्यात आले.


  

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे 24 जानेवारीला नळदुर्ग येथे बुथ कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा



उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे 24 जानेवारीला नळदुर्ग येथे बुथ कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा

पदाधिकारी यांनी मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने 
उस्मानाबाद/प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ आणि उमरगा-लोहारा विधानसभा मतदार संघातील बुथ कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्या मेळाव्याचे आयोजन गुरूवार दि. 24 जानेवारी 2019 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता नळदुर्ग ता. तुळजापूर येथील बी.के.फॅक्शन हॉल अक्कलकोट रोड येथे नियोजन केलेले आहे.
सदर मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, महाराष्ट्राचे सहप्रभारी संपतकुमार समन्वयक महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, सरचिटणीस  सत्संग मुंढे व जिल्हा प्रभारी टी.पी.मुंढे, सरचिटणीस राजेश राठोडसाहेब हे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमास माजी मंत्री महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी आमदार बसवराज पाटील, माजी मंत्री  आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  आप्पासाहेब पाटील, जि.प.विरोधी पक्ष नेते शरण पाटील उपस्थित राहणार आहेत.
तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, महिला काँग्रेस, एन.एस.यू.आय, मागासवर्गीय विभाग, अल्पसंख्यांक विभाग सर्व काँग्रेसचे सेल, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, न.प.सदस्य, ग्रा.पं. सदस्य, विविध कार्यकारी से.स.सो.सदस्य जिल्ह्यातील सर्व आजी-माजी काँग्रेस पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे मुख्य संघटक  राजाभाऊ शेरखाने यांनी केले आहे  

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

सोमवार, २१ जानेवारी, २०१९

तुळजापूर तालुक्यातील पवण चक्कीच्या नावाखाली एजंट मार्फत आर्थिक लुट

तुळजापूर तालुक्यातील पवण चक्कीच्या नावाखाली एजंट मार्फत आर्थिक लुट


तुळजापूर / प्रतिनिधी 


गमेसा कंपनी, डेव्हलपर्य (सब कंपनी) यांनी तुळजापूर तालुक्यातील शेतक-यांच्या शेतात

अनाधिकृतपणे पवन चक्की प्लॅन्ट करीत या बाबद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि. २१ जानेवारी रोजी तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले .


या निवेदनावर असे नमूद केले आहे की, तुळजापूर तालुका व उस्मानाबाद तालुक्यातील गमेसा कंपनी (डेव्हलपर्स सब -कंपनी) यांनी शेतक-यांची कवडीमोल किंमतीने शेती.खरेदी करुन शेतक-यांची फसवणुक करित आहेत.


उस्मानाबाद तालुका व तुळजापूर तालुका येथे शेतक-यांच्या शेतात पवण चक्की प्लॅन्टसाठी तहसिल कार्यालयाची मान्यता व त्या प्लॅन्टसाठी जमीन एन. ए. करणे अवश्यक असताना सुध्दा त्यांनी अनाधिकृत काम चालु केले आह.


तसेच तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय यांना संबंधित कंपनीने फक्त अर्ज केलेले आहेत. मात्र तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय यांनी मान्यता दिलेली नाही. किवा कंपनीने तहसिल कार्यालयातुन एन.ए. परवाना सुध्दा घेतलेला नाही. जवळपास अर्धवट काम झालेले आहे.


सध्दा दुष्काळी परिस्थितीत अधित शेतकरी अर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यातुन या पवन चक्की कंपनीचा मनमानी कारभार करीत आहेत. शेतकरी वर्गाचे उभ्या पिकांचे नुकसान करुन कंपनी च्या अवजड वहाने त्याच बरोबर इतर वहाने राजरोस पणे अनाधिकृत काम चालु आहे. संबंधित पवण चक्कीचे तुळजापूर येथे एका ठिकाणी ऑफिस सुध्दा नाही. फक्त दुकानदारी मांडली प्रमाणे ऑफिस आहेत.


जिल्हाधिकारी यांनी चौकशी करुन संबंधित कंपनीवर योग्य ती कार्यवाही करावी व शेतकरी वर्गाना न्याय द्यावा. अन्यथा तुळजापूर तालुका व उस्मानाबाद तालुका मध्ये पवन चक्कीचे मोठ्या प्रमाणात अनाधिकृत पणे काम चालु आहे ते येत्या ८ दिवसात बंद करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उग्र आंदोलन करुन काम बंद करण्यात येईल असा इशारा एका लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .


या निवेदनावर शहराध्यक्ष धर्मराज(दादा)  सावंत, समिर शेख,

अविनाश पवार,विशाल माने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

रविवार, २० जानेवारी, २०१९

आम आदमी पार्टीच्या महिला आघाडीच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी शशीकला वाघमारे तर तुळजापूर ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्ष पदी शिवकुमार स्वामी यांची निवड

आम आदमी पार्टीच्या महिला आघाडीच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी शशीकला वाघमारे तर तुळजापूर ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्ष पदी शिवकुमार स्वामी यांची निवड 


नळदुर्ग/प्रतिनिधी




आम आदमी पार्टी उस्मानाबाद वतीने शासकीय विश्रामगृह नळदुर्ग येथे दि 20 रोजी कार्यकर्ता पक्ष प्रवेश व निवड करण्यात आली यावेळी  आम आदमी पार्टीच्या उस्मानाबाद जिल्हा महिला आघाडीच्या  अध्यक्षपदी नळदुर्ग येथील रहिवासीअसलेल्या


 सौ.शशीकला अंबादास वाघमारे यांची नियुकी करण्यात आली तसेच अणदूर येथील रहिवासी असलेले  शिवकुमार लिंगराज स्वामी यांची आम आदमी पार्टी ओबीसी सेलच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यकत्यांना आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश देण्यात आला त्यानंतर त्यांची  निवड करून  सत्कार करण्यात आला यावेळी आम आदमी पार्टी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अँड अजित खोत,तुळजापूर अध्यक्ष तात्या रोडे , उपाध्यक्ष साहेबाल (लालु ) शेख, पिंपळे सर, उस्मानाबाद शहर अध्यक्ष मुन्ना शेख , आप जिल्हा मिडीया प्रमुख प्रा . चांदपाशा शेख, सौदागर कावळे , तालुका युवक अध्यक्ष केशव सलगर,भारती अंधारे , सोनाली गायकवाड,अंबादास वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.शशीकला वाघमारे यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

* पक्ष वाढीसाठी महिलांचे संघटन जिल्ह्यात मजबूत करणार तसेच अन्याय अत्याचाराच्या विरोधात आंदोलन करून सर्व सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे मत यावेळी न्यूज सिक्सर शी बोलताना शशीकला वाघमारे यांनी व्यक्त केले



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

वक्तृत्व स्पर्धेतून समाज प्रबोधन : महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरण सदस्य उमाकांत मिटकर

वक्तृत्व स्पर्धेतून समाज प्रबोधन : महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरण सदस्य उमाकांत मिटकर 



तुळजापूर  (दि.      ) शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षी मराठवाडा सामाजिक संस्था व युवास्पंदन सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, "स्पर्धा तुळजाभवानीची... वक्ता महाराष्ट्राचा" ही स्पर्धा नसून ही महाराष्ट्रातील होतकरू व अभ्यासू वक्ते निर्माण करणारी एक चळवळ आहे. यातून अनेक वक्ते तयार होत आहेत. वक्तृत्व स्पर्धेतून समाज प्रबोधन केले जात आहे. याचे सर्व श्रेय मराठवाडा सामाजिक संस्था व युवास्पंदन सामाजिक संस्थेस असून निश्चितच भविष्यात ही स्पर्धा उत्कृष्ट नियोजन नि:पक्षपाती धोरणामुळे एकतेच्या बळावर शतकपूर्ती करेल असा विश्वास महाराष्ट्र राज्य पोलीस प्राधिकरण सदस्य उमाकांत मिटकर यांनी केला. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भ्रमणध्वनी द्वारे सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा व शुभाशीर्वाद देऊन विजेत्यांचे अभिनंदन केले. 


                 यावेळी शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षी मराठवाडा सामाजिक संस्था व युवास्पंदन सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, "स्पर्धा तुळजाभवानीची... वक्ता महाराष्ट्राचा जागर तपपूर्तीचा" पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्वागताध्यक्ष अमर हंगरगेकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, नगरसेविका आशाताई पलंगे, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, भाजपा जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, बार असोसिएशनचे अध्यक्ष दादासाहेब सोंजी, मिर्झनपूरचे माजी सरपंच विश्वास चव्हाण, डायटचे चंद्रकांत साळुंखे इत्यादी उपस्थित होते. 


           राज्यातून "वक्ता महाराष्ट्राचा दिवसाचा मानकरी" म्हणून मुलीत सौ. माई सोपल आश्रमशाळा, खामगाव ता. बार्शी येथील कुमारी मनस्वी मनोज गादेकर ही विद्यार्थिनी तर मुलात कै. सो. डाॅ. जया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्यालय, इचलकरंजी येथील उत्कर्ष आप्पासाहेब शेंडगे हा विद्यार्थी तर तालुक्यातून मुलात नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ०३, तुळजापूर येथील प्रणव पांडुरंग ढेरे यांना देविची प्रतिमा,हार, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सांघिक फिरते पारितोषिक मानकरी शाळा म्हणून बालवाडी गटात तुळजापूर येथील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ०३, प्राथमिक गटात लातूर येथील आर. एन. मोटेगांवकर विद्यालय तर माध्यमिक गटात सोलापूर येथील बी. एफ. दमाणी प्रशाला या तीन शाळांना फिरता चषक, डिजिटल प्रमाणपत्र व फिरती ढाल देऊन गौरविण्यात आले. 


       या स्पर्धेत बालवाडी महाराष्ट्र गटातून प्रथम क्रमांक दमाणी विद्यामंदिर, सोलापूर  येथील स्वराज घाळे, द्वितीय क्रमांक महेश इंग्लिश स्कूल, सोलापूर येथील अंशुमन नडगेरी, तृतीय क्रमांक आर. एन. मोटेगांवकर विद्यालय, लातूर येथील मुक्ता गुंजोटीकर, चतुर्थ क्रमांक स्वामी विवेकानंद स्कूल, मुंबई येथील रुद्र पवार, पाचवा क्रमांक बालभवन विद्यामंदिर, लातूर येथील दिग्विजय चव्हाण तर उत्तेजनार्थ अनुक्रमे सुप्रीत चव्हाण, अर्णव सुपाते, कौटिल्य कुडकुले, आरव थोरमोटे, कौस्तुभ फुलारी, अहद सय्यद, विश्वेश्वर आंधळकर, क्षितिज जाधव, सार्थक उंडाळे व अन्वी शहा तर बालवाडी तुळजापूर तालुका गटातून प्रथम क्रमांक नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ०३, तुळजापूर येथील प्रणव ढेरे, द्वितीय क्रमांक पोतदार जम्बो स्कूल, तुळजापूर  येथील अनिकेत पडणूर, तृतीय क्रमांक दी वर्ल्ड स्कूल तुळजापूर येथील स्वामिनी पेंदे, चतुर्थ क्रमांक नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ०३, तुळजापूर येथील तनिष्का खुरुद, पाचवा क्रमांक नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ०३,तुळजापूर येथील अपेक्षा जाधव व उत्तेजनार्थ अनुक्रमे श्रावणी कदम, श्रेया बोंदर, शरण्या रणदिवे, साई कदम, संस्कार घोडके, तेजस पवार, अंबिका जट्टे, श्रेयानशी रोकडे, भक्ती नरवडे, शरण्या हिरोळीकर,  इयत्ता पहिली ते इयत्ता दुसरी गटातून प्रथम क्रमांक कै. सो. डाॅ. जया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्यालय, इचलकरंजी येथील उत्कर्ष शेंडगे, द्वितीय क्रमांक आर. एन. मोटेगांवकर, लातूर येथील श्रावणी घाडगे, तृतीय क्रमांक महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यामंदिर, लातूर  येथील अमन सय्यद, चतुर्थ क्रमांक आर. एन. मोटेगांवकर, लातूर येथील मंगेश गुंजोटीकर, पाचवा क्रमांक मराठी कन्या प्रशाला, उस्मानाबाद येथील वसुंधरा गुरव तर उत्तेजनार्थ अनुक्रमे संस्कृती पवार, आद्रा शिंदे, सोहम येमूल, विराट जाधव, सिद्धी पट्टनशेट्टी, इयत्ता तिसरी ते इयत्ता चौथी गटातून प्रथम क्रमांक आर. एन. मोटेगांवकर, लातूर येथील संयोगिता जाधव, द्वितीय क्रमांक विद्या प्रतिष्ठान प्राथमिक विद्यालय, बारामती  येथील वैष्णव जांभळे, तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दत्तपूर येथील स्वरा शिंदे,  चतुर्थ क्रमांक आदर्श प्राथमिक विद्यालय, घाटनांदुरी येथील श्रुती साळुंखे, पाचवा क्रमांक महेश इंग्लिश स्कूल सोलापूर येथील नेहा शहा, उत्तेजनार्थ अनुक्रमे कृष्णाई जेऊरकर, सिध्दी जाजी, हर्षवर्धन नवगीरे, कौमुदी खिचडे, आर्या कोल्हाळे, इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी गटातून प्रथम क्रमांक सौ. माई सोपल आश्रमशाळा, खामगाव ता. बार्शी येथील कुमारी मनस्वी गादेकर, द्वितीय क्रमांक विद्या प्रतिष्ठान, बारामती येथील श्रेनिका जांभळे, तृतीय क्रमांक दमाणी प्रशाला, सोलापूर येथील अनुष्का बिराजदार, उत्तेजनार्थ अनुक्रमे संचित देशमुख, अनुभव ठोंबरे, साक्षी नागरगोजे, आकांक्षा गुजर, रेहान सय्यद इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी गटातून प्रथम क्रमांक बी. एफ. दमाणी प्रशाला, सोलापूर येथील संकेत मेलगिरी, द्वितीय क्रमांक वसतिगृह विद्यालय काराटी येथील ऋतुराज राऊत, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर केज येथील प्राजक्ता सोनवणे, उत्तेजनार्थ अनुक्रमे साधना ठोंबरे, वैभवी भंडारे, स्वराज चेडे, रणजीत शिंदे, श्रेया झांबरे सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके म्हणून रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे व शालेय शिक्षण प्रधान सचिव यांचा संस्थेस शुभेच्छा व शुभाशीर्वाद म्हणून प्राप्त शुभसंदेशाचे वाचन युवास्पंदन सामाजिक संस्थेचे सचिव प्रा. प्रशांत भागवत यांनी केले. यावेळी स्पर्धकांना शुभेच्छा स्वागताध्यक्ष अमर हंगरगेकर यांनी दिल्या. आभार मराठवाडा सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष  जीवन इंगळे यांनी तर सूत्रसंचालन स्पर्धा प्रमुख शिवशंकर जळकोटे व प्रा. प्रशांत भागवत यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष अमर हंगरगेकर, महेंद्र कावरे, किरण हंगरगेकर, विनोद पलंगे, जीवन इंगळे, देवेंद्र पवार, प्रा. प्रशांत भागवत, संदीप गंगणे, निरंजन डाके, शिवशंकर जळकोटे, अमर वाघमारे, राहूल कुलकर्णी, अविनाश सराटे, आण्णासाहेब क्षीरसागर, कुमार टोले, दत्ता सोमाजी, पद्माकर मोकाशे, विष्णु गायकवाड, नितीन ढगे, विशाल सूर्यवंशी,  किरण लोहारे, स्वाती कावरे, प्रतिभा हंगरगेकर, बंडू शेटे, सद्दाम शेख, समीर माने, सारंग कावरे,शाम खोत, नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोनच्या मीना राजू मंचच्या विद्यार्थिनी यांच्यासह दोन्ही संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. या स्पर्धेत एकूण इयत्ता बालवाडी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या एकूण सहा गटातून राज्यातील २५ जिल्ह्यातील ४६५ शालेय स्पर्धकांनी विक्रमी सहभाग नोंदविला. 


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)


शनिवार, १९ जानेवारी, २०१९

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच त्या संस्थेवर बंदी घालावी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच त्या संस्थेवर बंदी घालावी


दि १९/ शनिवार


लोहारा / प्रतिनिधी 


लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधणी विद्यालयात   अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन लोहारा येथील तहसीलदार यांना देण्यात आले आहे त्यात असे म्हटले आहे की हराळी येथील विद्यालय शाळेतील काही कर्मचाऱ्यांनी मिळून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे त्यातील पाच आरोपी ना पकडण्यात पोलीसाना यश मिळाले मात्र एक आरोपी फरार झाला असून त्याला तात्काळ अटक करून त्या बेजबाबदार पणे वागणाऱ्या ज्ञान प्रबोधणी  संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी व तालुक्यातील प्रत्येक शाळेत सी सी टी व्ही बसवण्यात यावी अशी मागणी लोहारा काँग्रेस   अल्पसंख्याक  तालुकाध्यक्ष  अस्लम खानापूरे, यांच्या वतीने करण्यात आली आहे त्या निवेदनावर ईनुस शेख,सरफराज सय्यद, मतीन गवंडी, आदींच्या सह्या आहेत या घटनेचा लोहारा तालुक्यातुन 

 जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे,




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

जिल्हयात शस्त्र व जमावबंदी लागू - अप्पर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र खंदारे

                 

जिल्हयात शस्त्र व जमावबंदी लागू

-           अप्पर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र खंदारे

उस्मानाबाद/प्रतिनिधी

 दि.19 मौजे कानेगाव ता. लोहारा येथे चालू असलेल्या वादावरून सवर्ण व दलित समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सध्या तुळजाभवानी शकं भरी नवरात्र चालू असून सदर यात्रो करिता महाराष्ट्र, कर्नाटक, अध्रप्रदेश, तेलगना राज्यातून मोठया प्रमाणात भावीक येतात तरी   जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबांधित राखण्यासाठी शांततेत व सुरळीत पार पडण्याकरीता उस्मानाबाद जिल्हयात हे आदेश दि. 20 जानेवारी ते  3  फेब्रुवारी  2019  पर्यंत लागू राहतील.

पर्जन्यमान कमी पडल्याने  जनावराच्या चारा पाण्याचा तसेच सोयाबीनला योग्य भाव मिळावा व चारा छावण्या सुरू कराव्या उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा या मागण्या करिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष,कॉग्रेस पक्ष व इतर पक्ष विविध आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुस्लीम धनगर समाजाच्या वतीने आरक्षण मिळावी या व इतर मागण्यासाठी त्याच्याकडून आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादी कॉगेस पक्ष व कॉग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल,डिझेल दर वाढीच्या अनुषंगाने अचानक पणे आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यात दि. 20 ते 23 जानेवारी 2019 पावेतो श्री. खडोबा मैलापूर (नळदुर्ग)   संपन्न होणार आहे. सदर यात्रेकरिता जिल्हयातून  आजू बाजूच्या जिल्हयातून मोठया प्रमाणात भावीक दर्शना करिता येतात. दि 21 जानेवारी 2019 रोजी लोहार समाजाच्या वतीने लोहार समाजाला एस. टी प्रवर्गात आरक्षण मिळावे या व इतर मागणी करिता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा रॅली आयोजित आहे. दि.26 जानेवारी 2019 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी कॉग्रस पक्षा तर्फे लोहारा उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना सन 2016-2017 चा थकीत पिक विमा मिळावा या व इतर मागणी करिता पालकमंत्री उस्मानाबाद यांना घेराव आंदोलन आयोजित आहे. यांना  जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी   

  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या अधिनियम 22 च्या कलम 37 (1) व (3)अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात अप्पर जिल्हादंडाधिकारी   राजेंद्र खंदारे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, या कालावधीत जिल्हयात नागरिकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तू बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यास बंदी राहील.

          आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाहीत. सभ्यता किंवा  नीतीमत्ता यास  बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्तीचे किंवा प्रतिकृत्तीचे / प्रतिमांचे पदर्शन करता येणार नाही. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने  , वाद्य वाजवणार नाहीत. सभा घेणार   नाहीत. हे आदेश उस्मानाबाद जिल्‍हयाच्या संपूर्ण हददीत लागू राहतील .

          तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकिय कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासनाचे अधिकारी, कर्मचारी, अंत्य यात्रा, धार्मिक कार्यक्रम यास हे आदेश लागू राहणार नाहीत. उक्त कालावधीत   परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, मंडळ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील. हे आदेश दि. 20 जानेवारी 2019  रोजीचे 06.00 ते  3  फेब्रुवारी  2019 रोजीच्या  रात्री  बारा पर्यंत लागू राहतील. 

                                     





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)              

तुळजापूर प्रहार जनशक्ती च्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन

तुळजापूर प्रहार जनशक्ती च्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन


मागण्या मान्य नाही केल्यास आमरण उपोषणास बसणार


तुळजापूर  (प्रतिनिधी)

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीच्या दान पेटीत  भक्तांनी टाकलेल्या दान हे पिडित कुटूंबाच्या  आरोग्य निधी म्हणून खर्च करण्याची मागणी तुळजापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नायब तहसिलदार मोहिते यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

 नायब तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि तुळजाभवानी  देवस्थांनाच्या वतीने जे गरीब लोक ज्यांची परिस्थीती हालाकीची आहे. ज्यांची दवाखान्याचा खर्च करण्याची आयपत नाही अशा रुग्णाना बाकीच्या देवस्थाना

प्रमाणे आर्थीक मदत करण्यात यावी.दर्शनासाठी येणा-या  भाविकांना  आरोग्याची सोय तात्काळ व्हावी यासाठी देवस्थान वतीने अँबुलन्सची सोय करण्यात यावी. महावितरणने  ग्राहकांना बील वितरीत केले जाते ते अंदाजे व चुकीचे देवून ग्राहकंवर आर्थिक  भुरदंड बसवला जातो ते बिल दुरुस्तीसाठीचे अर्ज मागीतले जातात पण त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. ग्राहकांची वारंवार हेळसांड केली जाते ती हेळसांड थांबवून ग्राहकांना न्याय देण्यात यावा. 

पंचायत समितीद्वारे  मंजूर केलेले   स्वच्छालय  अनुदान अधिका-याच्या बेजबाबदारी पणामुळे स्वच्छालयाचे  बिल वेळेवर मिळत  नाही. शासनाने तुळजापूर तालुका हा दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर केला असुन दुष्काळ भागात योजना तात्काळ सुरु करण्यात यावे, तालुक्यातील अवैध रित्या चालू असलेले धंदे खुलेआम चालू आहेत त्यावर प्रशासनाचा कसलाही  धाक नसुन आवैद  धंदे तात्काळ बंद करण्यात यावे आदी मागण्यासाठी अमरण उपोषण करण्यात येणार आहे.

याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदार सौदागर,तालुकाध्यक्ष शशिकांत मुळे,उपाध्यक्ष जुबेर शेख,तालुका सचिव अमर शेख,सोमनाथ झाडे,जिवन साखरे,हबीब पठाण,कृष्णा सावंत,सुनिल शिंदे,आदींच्या निवेदनावर  स्वाक्ष-या आहेत 



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

उस्मानाबाद जिल्ह्यातील विवीध गुन्ह्यांचा वृतांत -19/01/2019



2

 “ उस्मानाबाद जिल्हयात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 132 लोकांवर कारवाई 

उस्मानाबाद जिल्हा :- दिनांक 18/01/2019 रोजी एका दिवसामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस स्टेशन अंतर्गत व वाहतुक शाखा उस्मानाबाद येथील अधिकारी / कर्मचारी यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुध्द मोटार वाहन कायद्याच्या कलमा नुसार एकूण 132 केसेस केलेल्या आहेत. त्यापोटी 28 हजार 300 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

 “ दगड धानोरा शिवारात महिलेचा विनयभंग करून मारहान गुन्हा दाखल 

पोलीस स्टेशन उमरगा  :- दिनांक 17/01/2019 रोजी 18.00 वा.सु.यातील  फिर्यादी  हे व त्यांची पत्नी, आई असे त्यांचे शेतात काम करीत असताना शेत शेजारी 1) योगेश माधव कदम याने फिर्यादी यांचे पत्नीचे अंगावर येवून तुझा नवरा कुठे गेला आहे. म्हणून तिचे पोटात लाथ मारून विनयभंग केला. तेव्हा फिर्यादी यांची आई सोडविण्यास गेली असता 2) माधव कदम याने त्यांचे कोपरास दगडाने मारून दुखापत केली त्यावेळी फिर्यादी हे गोंधळ ऐकून खालच्या शेतातून तेथे आले असता योगेश माधव कदम याने त्यांचे हाताला, मनगटाला चावून दुखापत केली व दगड हातात घेवून मारून मुकामार दिला व जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणून फिर्यादी यांचे फिर्यादवरुन 1) योगेश माधव कदम 2) माधव कदम यांचे विरुध्द दिनांक 18/01/2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 324,354(ब),506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 “ अल्पवयीन मुलीचा लैंगीक छळ 

पोलीस स्टेशन लोहारा :- 2013 ते 2018 या कालावधीत लोहारा तालुक्यातील मौजे हराळी येथील एका शैक्षणीक संस्थेमधील एक अल्पवयीन मुलीचा तिच्या अज्ञानाचा व तिच्या न वाढलेल्या बौध्दीक क्षमतेचा गैर फायदा घेवून सदर संस्थे मध्ये काम करणारे विक्रम काजळे , सुयश जोशी, जयराम मोरे, नागनाथ कोकाटे, दत्ता जमदाडे, विजय तोडकर, यांनी तिच्या ईच्छेविरुध्द तिचे सोबत वरील कालावधीत लैंगीक छळ केलेने, त्यांचे विरुध्द दिनांक 17/01/2019 रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे भादंविचे कलम 376,377,376(2)(एन), 376(2)(डी),376 (एफ) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3,4,5(सी),5(डी), 5(एफ),5(आय), 6,7,8,12,11(3),11(4) ,11(6) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयामध्ये आरोपी नामे 1) सुयेश माधवराव जोशी वय 24 वर्षे ,रा. बलसुर ह. मु. हराळी,  2) जयराम गजेंद्र मोरे, वय 29 वर्षे,  रा. तिर्थ बुद्रक ता. तुळजापुर  3) नागनाथ रंगनाथ कोकाटे वय 58 रा. कुमटे ता. उत्तर सोलापुर. ह.मु. हराळी ता. लोहारा 4) दत्तात्रय सुयेश जमदाळे वय 28 वर्षे , रा. दौंड जि. पुणे ह.मु. हराळी ता. लोहारा 5) विजय श्रीमंत तोरडकर वय 44 वर्षे रा. उमरगा ह.मु. हराळी ता. लोहारा यांना दिनांक 18.01.19 रोजी अटक करण्यात आली असुन त्यांची तपास कामी मा. अपर सत्र न्यायाधीश उमरगा यांनी 7 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे तसेच 6) आरोपी नामे विक्रम काजळे रा. हराळी हा फरार असुन त्याचा शोध घेणे कामी पोलीसांचे विशेष पथक इतरत्र जिल्हात व परिसरात पाठविण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा श्री आर.आर. धस हे करीत आहेत.

 

3

 “ इंदापुर ते वाशी रोडवर मोटारसायकलच्या अपघातात एक महिला मयत 

पोलीस स्टेशन वाशी  :- दिनांक 27.12.18 रोजी तानाजी अर्जुन गपाट रा. इंदापुर ता. वाशी याने त्याचे ताब्यातील मोटारसायकल क्र एम एच 25 ए एन 7710 ही हयगईने व निष्काळजीपणे चालवुन खडीचे टेकावर घातल्याने मोटारसायकलवर पाठीमागे बसलेली  विनोद दत्तु गपाट यांची आई सुकमल दत्तु गपाट वय 45 रा. इंदापुर ता. वाशी यांना गाडीवरुन खाली पाडुन त्यांना गंभीर जखमी करुन त्यांचे मरणास कारणीभुत झाला आहे. म्हणुन विनोद दत्तु गपाट रा. इंदापुर ता वाशी जि. उस्मानाबाद यांचे फिर्यादवरुन तानाजी अर्जुन गपाट याचे विरुध्द दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन वाशी येथे भादंविचे कलम 279,338,304(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

“  मौजे किलज येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या इसमास मारहान गुन्हा दाखल 

पोलीस स्टेशन नळदुर्ग  :- दिनांक 13.01.19 रोजी 22.00 वा. सु. मौजे किलज येथे राहुल शांतीर काळेगावकर रा. किलज ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद हे बोर चालु करण्यासाठी जात असताना राहुन काळेगावकर यांचे मामा रमेश व 1) राम महादेव गिरी 2) आबा राम गिरी रा. किलज ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद यांचेत आपआपसात भांडणे चालु होती त्यावेळेस राहुल काळेगावकर हे भांडण सोडवण्यास गेले असता 1) राम महादेव गिरी यांनी संगनमत करुन तु मध्ये कशाला आलास असे म्हणुन शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहान केली व 2) आबा राम गिरी याने राहुल यास दगडाने मारुन जखमी केले म्हणुन राहुल शांतीर काळेगावकर यांचे फिर्यादवरुन वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे भादंविचे कलम 325,323,504,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 “  उस्मानाबाद येथे किरकोळ कारणावरुन मारहान गुन्हा दाखल 

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 18.01.19 रोजी 12.30 वा. सु. समता माध्यमिक विद्यालय उंबरे कोळा समोर उस्मानाबाद येथे फिर्यादी यांचा मुलगा संग्राम विष्णु इंगळे हा शाळा सुटल्यानंतर बाहेर आल्यानंतर 1) मुकेश शिंदे 2) ऋषिकेश शिंदे दोघे रा. शिंगोली ता. जि. उस्मानाबाद 3) अनमेश सोनकवडे 4) अजिंक्य मुंडे दोघे रा. उस्मानाबाद यांनी संगनमत करुन संग्राम यास मोसावर बस म्हणुन गालात चापटा मारुन शिवीगाळ केली व मुकेश शिंदे याने संग्राम याचे कपाळावर, पाठीवर बांबुने मारुन मुक्का मार देवुन जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन फिर्यादी महिलेच्या फिर्यादवरुन वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 324,323,504,506,34. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

“  मौजे निलेगाव येथे महिलेचा विनयभंग गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन नळदुर्ग :- दिनांक 17.01.19 रोजी 12.00 वा. सु. मौजे निलेगाव येथे विलास वसंतराव देशमुख रा. निलेगाव ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद हा चड्डीवर लज्जा वाटेल असे फिरत असताना पिडीत महिलेने त्यास तुम्ही चड्डीवर का फिरता असे म्हणाल्यावर विलास देशमुख याने पिडीत फिर्यादी महिलेस शिवीगाळ करुन, टक लावुन वाईट नजरेने पाहुन पाठलाग केला व विनयभंग केला म्हणुन पिडीत महिलेचे फिर्यादवरुन विलास वसंतराव देशमुख याचे विरुध्द दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे भादंविचे कलम 354(अ),509,504. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

 

4

“  मौजे आचलेर येथे पैसे देण्या-घेण्याचे कारणावरुन मारहान गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन मुरुम :- दिनांक 18.01.19 रोजी 20.00 वा. सु. मौजे आचलेर ता. लोहारा येथे किरण बाळु राठोड रा. आचलेर ता. लोहारा जि. उस्मानाबाद हा त्यांचे घरासमोर थांबले असता 1) संतोष शंकर बंदीछोडे 2) सचिन आप्पास सोनटकले दोघे रा. आचलेर तांडा ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांनी संगनमत करुन पैसे देण्याघेण्याचे कारणावरुन किरण राठोड व सुनिल लोकु पवार रा. आचलेर तांडा यांना शिवीगाळ करुन काठीने व दगडाने मारुन जखमी  केले तसचे लाथाबुक्याने मारहान करुन जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन किरण बाळु राठोड यांचे फिर्यादवरुन 1) संतोष शंकर बंदीछोडे 2) सचिन आप्पास सोनटकले यांचे विरुध्द दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन मुरुम येथे भा.दं.वि.चे कलम 324,323,504,506,34. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

“  वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई 

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 19.01.19 रोजी 14.40 वा. सु. बसस्थानक  इनगेटसमोर  उस्मानाबाद येथे 1) अजिंक्य अंकुश तनमोर रा. उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील रिक्षा क्र एम एच 25 ए. के. 0578, 2) आकाश नवनाथ शिंगाडे रा.भिमनगर उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील रिक्षा क्र. एमएच. 25 ए.बी. 5557,  3) रविंद्र शामराव आडे रा. शिंगोली तांडा उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील रिक्षा क्र. एमएच. 25 ए.के. 0267  वरील रिक्षा चालक यांनी त्याचे ताब्यातील रिक्षा  सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल व इतर वाहनांना वाहन चालवण्यास धोका निर्माण होईल अशा परिस्थितीत रिक्षा लावलेला मिळुन आला म्हणुन त्यांचे विरुध्द दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भा.दं.वि.चे कलम 283 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 18.01.19 रोजी 20.15 वा.सु. एनएच 65 रोडवर उमरगा येथे वसीमपाशा कादरसाब मुजावर रा. गुंजोटी ता. उमरगा याने त्याचे ताब्यातील मॅजीक टेम्पो क्र एम ए च 25 आर 7472 हा सार्वजनिक रोडवर येणारे जाणारे लोकांना तसेच वाहनांना अडथळ होईल अशा ठिकाणी धोकादायक स्थितीत उभा केलेला मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भा.दं.वि.चे कलम 283 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) :- दिनांक 18.01.19 रोजी13.00 वा सु. बार्शी नाका उस्मानाबाद येथे रोडवर 1) मोहसीन अशकरी खतीब रा. इदगाह नगर शिराढोण ता. कळंब याने त्याचे ताब्यातील टेम्पो क्र एम एच 13 जी. 0808 , नेहरु चौक उस्मानाबाद येथे 2) विष्णु गोपिनाथ गवळी रा.नेहरू चौक उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील टेम्पो क्र. एम.एच. 25 पी. 2491 , देशपांडे स्टॅंन्ड भाजी मंडई जवळ उस्मानाबाद येथे           3) संतोष विठ्ठल डुकरे रा.सकनेवाडी ता.जि.उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील टेम्पो क्र. एम.एच. 25 पी. 4201. माऊली चौक उस्मानाबाद येथे 4) सलीम सत्तार शेख रा. देशपांडे स्डॅुन्ड भाजी मंडई उस्मानाबाद याने त्याचे ताब्यातील टेम्पो क्र एम एच 25 पी 1688  वरिल टेम्पो चालक यांनी त्यांचे ताब्यातील टेम्पो वरिल ठिकाणी सार्वजनिक रोडवर येणारे जाणारे लोकांना तसेच वाहनांना अडथळ होईल अशा ठिकाणी धोकादायक स्थितीत उभा केलेला मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द  दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन भुम :- दिनांक 19.01.19 रोजी 13.30 वा. सु. तहसील कार्यालय समोर भुम येथे आरोपीत महिला हिने तीचे ताब्यातील भेळ विक्रीचा गाडा रहदारीस अडथळा होवुन अपघात होवुन जिवीत हानी होईल अशा स्थितीत उभा करुन भेळ विक्री व्यवसाय करीत असताना मिळुन आली म्हणुन तिचे विरुध्द  दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन भुम येथे भादंविचे कलम 283 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

5

पोलीस स्टेशन तामलवाडी :- दिनांक 19.01.19 रोजी 13.20 वा. सु. एन एच 52 रोडवर तामलवाडी शिवारातील टोलनाक्याचे दक्षिण बाजुस अंदाजे 500 फुट अंतरावर मुस्तफा दाऊद शेख रा. शिवगंगा नगर सोलापुर याने त्याचे ताब्यातील टाटा कंपनीचा छोटा हाती क्र एम एच 13 सी जे 0593 या वाहनामध्ये पाठीमागे फाळका उघडा ठेवुन आत मध्ये 6 लोखंडी  गोदरेज कपाट व त्यावरती 2 लोखंडी कपाट असे एकुण 8 लोखंडी कपाट लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितीत वाहतुक करीत असताना मिळुन आला म्हणुन त्याच्या विरुध्द  दिनांक 19.01.19 रोजी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे भा.दं.वि.चे कलम 283 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

 

“  महादेववाडी पाटी येथे भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्यावर कारवाई 

पोलीस स्टेशन बेंबळी :- दिनांक 18.01.19 रोजी 12.15 वा. सु. महादेववाडी पाटी येथे मोहमंद इस्माईल शेख रा. उजणी ता. औसा जि. लातुर याने त्याचे ताब्यातील तीन चाकी टमटम क्र एम.एच 25 एन 528 हा रस्त्याचे परिस्थितीचे भान न ठेवता वेगात, हयगईने व निष्काळजीपणे चालवित असताना मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन बेंबळी येथे भादंविचे कलम 279 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 “  अज्ञात व्यक्तीच्या मानवी सांगाडयाचा शोध 

पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) :- दिनांक 16.01.19 रोजी 10.00 वा.पुर्वी उस्मानाबाद तालूक्यातील पिंपरी शिवारातील जंगलामध्ये नक्की तारीख वेळ समजून येत नाही. असा एक मानवी सांगाडा आढळून आल्याची खबर संतोष भिमराव माळी पोलीस पाटील पिंपरी ता.जि.उस्मानाबाद यांनी दिनांक 16/01/2019 रोजी खबर दिल्याने पोलीस ठाणे उस्मानाबाद (ग्रामीण) येथे अकस्मात‍ मृत्यू क्रं. 2/19 कलम 174 सी.आर.पी.सी. प्रमाणे दाखल आहे. एक मानवी सांगाडा असुन सांगाडयाची हाडे कुरतडलेली मिळुन आली आहेत . सदरचा सांगाड हा स्र्‍ि किंवा पुरुष जातीचा आहे असा समजुन येत नाही. त्याचे वय समजुन आले नाही. घटनास्थळी अर्धवट जळालेला निळया रंगाचा जिन्स पँन्टचा तुकडा, लाल रंगाचा कमरेचा करदोडा, VKS pride कंपनीची 10 नंबरची चप्पल , कांदयाचे पिकावर फवारण्याचे tag globe कंपनीचे विषारी औषधाची बाटली टुबर्ग कंपनीची फुटलेली बिअरची बाटली व अर्धवट जळालेले पॉकेट व पॉकेट मध्ये अर्धवट जळालेली डायरी डायरी मधील एका पानावर इंग्रजी मध्ये A J ARUN  असे लिहलेल्या वर्णनाचे साहित्य मिळुन आले आहे.

तरी आपले परिचयाचे किंवा नातेवाईक स्र्‍ी अथवा पुरूष जातीचा इसम हरवलेला असेल अथवा किडनॅप केलेला असेल तर पो.स्टे.उस्मानाबाद (ग्रामीण) ता.जि.उस्मानाबाद यांचेशी संपर्क साधणे बाबत सहायक पोलीस निरीक्षक उस्मानाबाद (ग्रामीण) यांनी आवाहन केले आहे. त्यांचा संपर्क क्र. 7620922988 , 73505334100 तसेच पोलीस स्टेशन उस्मानाबाद (ग्रामीण) फोन नं. 02472-223303 असा आहे.

 

 

6

“  उस्मानाबाद येथे बस (एस.टी.) भरधाव वेगात चालवुन नुकसान केलेवरुन गुन्हा नोंद 

पोलीस स्टेशन आनंदनगर :- दिनांक 18.01.19 रोजी 13.00 ते 13.30 वा. सु. बस क्र एम एच 14 बी. टी. 2069 वरील चालकाने त्याचे ताब्यातील बस (एस.टी.) ही अतिवेगात हयगईने व निष्काळजीपणे चालवुन सुनिल चांगदेव मिसाळ यांचे छत्रपती संभाजीराजे चौपाटी उस्मानाबाद येथील थंडा मामला कोल्डींग सेंटर या दुकानात बस घालुन दुकानातील सामानाचे एकुण 3,22,500/-रु. चे मालाचे नुकसान केले आहे. म्हणुन सुनिल चांगदेव मिसाळ यांचे फिर्यादवरुन बस क्र एम एच 14 बी टी 2069 च्या चालकाचे विरुध्द दिनांक 18.01.19 रोजी पोलीस स्टेशन आनंदनगर येथे भादंविचे कलम 279,427 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

उमरगा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथ समितीची बैठक संपन्न

उमरगा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथ समितीची बैठक संपन्न



उमरगा/ चेतन पवार


उमरगा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बूथ कमिटी आढावा बैठक श्रीराम मंगल कार्यालय येथे घेण्यात आले. या बैठकीचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे अध्यक्ष  प्रा.सुरेश (दाजी) बिराजदार हे होते पक्ष निरीक्षक म्हणून उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे यांनी काम पाहिले तर प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव माने बूथ नियंत्रक प्रशांत मते उपस्थित होते. नऊ जिल्हा परिषद मतदार संघाचे गट अठरा पंचायत समिती मतदार संघाचे गण व उमरगा व मुरूम शहर येथील सर्व बूथ प्रमुखांची व समन्वयकाची गाव प्रमुखाची नियुक्ती यावेळी करण्यात आली. 

अध्यक्षीय भाषणात प्रा सुरेश (दाजी) बिराजदार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विविध विकासात्मक कामे केली तसेच शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असलेला पक्ष अशी ओळख निर्माण केलेली आहे.

 याचा फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होणार असल्याचे सांगितले आहे तर निरीक्षक काकडे यांनी बूथ कमिटी पक्षाचा पाया नियोजन बद्द योजनेने काम केल्यास यश हमखास आपली असल्याचे मत व्यक्त केले याप्रसंगी उमरगा तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी संतोष भाकरे यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांनी बोलत असताना वंचित बहुजन व  ओबीसी नेता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. भविष्यात मी वेळोवेळी काम करेन असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. आलुर गावचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजकुमार माने यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली मी वेळोवेळी गोरगरीबाचे काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भाकरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

तालुका अध्यक्षपदी तात्याराव

 (बाळू) माशाळ सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा सचिवपदी श्री. राजाभाऊ तुरोरीकर याना यावेळी नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष संजय पवार, बाबा जाफरी, आदी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडले.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

आलुर येथील एकता सामाजिक बहुउद्देशीय संस्थेकडून कै. मोहन शिवाजी राठोड यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त सत्तर हजाराची रोख रक्कम मदत म्हणून दिले तसेच समाजपयोगी साहित्याचे वाटप.

आलुर येथील एकता सामाजिक बहुउद्देशीय संस्थेकडून कै. मोहन शिवाजी राठोड यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त सत्तर हजाराची रोख रक्कम मदत म्हणून दिले तसेच  समाजपयोगी साहित्याचे वाटप.

 

उमरगा /चेतन पवार 



उमरगा तालुक्यातील आलुर येथील कै. मोहन शिवाजी राठोड यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक लमाण तांडा आलुर येथे गरीब व होतकरू मुलांना फळे, खाऊ, व वह्या पुस्तके वाटप करण्यात आले.

यावेळी कै. मोहन शिवाजी राठोड यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने आलुर येथील लमाण तांडा येथे भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.आर्थिक परिस्थिती हलाखीचे स्थितीत असलेल्या चांदुबाई शिवाजी राठोड याना एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून आर्थिक मदत सुपूर्द करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत (दादा) राठोड, उपसंस्थापक संतोष (भैय्या) पवार आदी मान्यवर उपस्थित होते.या निमित्ताने एकता संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत (दादा) राठोड व उपसंस्थापक संतोष (भैय्या) पवार यांच्या वतीने एक हजार माणसाचे जेवणाचे नियोजन स्वतःच्या खर्चातून करण्यात आले होते.

घरातील कर्ता मुलाचा अपघाती मृत्यू गेल्या वर्षी झाल्यानंतर हलाखीची स्थितीत जीवन व्यतीत करणाऱ्या आलुर ज्योती तांडा येथील चांदूबाई राठोड याना एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने सत्तर हजाराची आर्थिक मदत केली. येथील कै. मोहन राठोड यांचे गेल्या वर्षी अपघाती निधन झाले त्यानंतर त्यांच्या आई चांदूबाई राठोड या एकाकी जीवन जगत आहेत.सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात मदतीचा हात देणाऱ्या तसेच गोर गरिबांचे मदतीला धावून जाणारे आलुर येथील एकता सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्याकडून कै. मोहन राठोड यांच्या आईना सत्तर हजार रुपये रोख देऊन सहकार्याचा आदर निर्माण केले आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शिवसेनेचे युवा नेते मा.श्री.श्रावण दादा इंगळे, चेतन पवार (पत्रकार) रोहित बिराजदार (पत्रकार) मोहन चव्हाण ,धनराज राठोड ,उमेश चव्हाण ,रमेश चव्हाण ,सतीश पवार ,गोपीनाथ चव्हाण ,अमोल राठोड ,सचिन पवार, दिपक पवार, मोतीराम राठोड, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रकारचे मदत करून आपण सर्वजण माझ्या मुलाचे कार्य करत आहात असे भावनावस होऊन चांदूबाई राठोड यांच्या डोळ्यात पाणी आले होते. तुमच्या संस्थेकडून गोर गरीबाचे कामे नेहमी घडत राहवो असे सांगून संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

आलूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी स्नेहा भालके तर उपाध्यक्षपदी महादेव बिराजदार यांची निवड


आलूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या  व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी स्नेहा भालके तर उपाध्यक्षपदी महादेव बिराजदार यांची निवड

उमरगा / चेतन पवार


उमरगा तालुक्यातील आलूर येथील जिल्हा. परिषद. प्राथमिक कन्या शाळा येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा म्हणून सौ. स्नेहा सिद्धाराम भालके तर उपाध्यक्षपदी श्री.महादेव चनप्पा बिराजदार यांची निवड करण्यात आली. यावेळी मा.श्री. सरपंच सुरेश बोळदे यांच्या अध्यक्षतेखाली पालकांची बैठक आयोजित करण्यात आलेल्या सभेत सदस्य म्हणून सौ. सविता बसप्पा कांबळे, सौ. सुरेखा सुभाष धुमाळ, सौ. अंबिका मोनेश्वर सुतार, सौ. साधना नितीन धमगुंडे, श्री.अशोक शांतप्पा समन, श्री.अशपाक मिरासाब कुरणे,श्री.गणपती आबाराव हळणुरे, श्री.संतोष कलप्पा चौगुले, श्री.संतोष मनोहर मिरजे, श्री.आनंद संगप्पा ब्याळीकुळे,  सौ. महानंदा शांतप्पा बिराजदार यांच्या सर्वानुमते निवड करण्यात आली. या प्रसंगी मुख्याध्यापक श्री.अनिल सोमवंशी सर, ग्रापंचायत सदस्य श्री.सत्तार सय्यदअली,

श्री.शिवराज समन, श्री.सखाराम कांबळे, श्री.सिद्धाराम कुंचगे, श्री.शेखर स्वामी सर, श्री.कलशेट्टी सर, श्री.राजपूत सर, श्री.रेवनसिद्ध भाकरे, श्री.सदानंद मासुडे, श्री.प्रकाश हळणुरे, श्री.बंडूसिंग चव्हाण आदींसह पालक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शाकंभरी नवरात्र महोत्सवातील जलयात्रेत जनसागर

 शाकंभरी नवरात्र महोत्सवातील जलयात्रेत जनसागर 


बैलगाडीत ठेवलेले नगारा हेही भाविकांचे लक्ष वेधत होते.


तुळजापूर /प्रतिनिधी

संभळ,तुतारी, बँड ,हलगी व डी.जे.च्या वाद्यात तुळजाभवानी-शाकंभरी च्या जय घोषात सुवासिनी महिला पारंपरिक वेशभूषेत व आराधी, गोंधळी, पुजारी यांच्या सहभागात शाकंभरी तील जलयात्रा मोठ्या उत्साहाने व पारंपारिक पद्धतीने पार पडली. यात्रेत हजारो सुहासिनी महिलांनी सहभाग नोंदविला होता .

तत्पूर्वी पापनाश तीर्थ येथील इंद्रायणी देविस शाकंभरी यजमान पाळीकर पुजारी सतीश रामचंद्र व सविता सोमाजी या दाम्पत्याने पंचामृत अभिषेक घालून पूजन केले. त्यानंतर पापनाश तीर्थाचे जलपूजन त्याठिकाणी भरलेले नऊ जलकुंभ पूजन, श्रीच्या प्रतिमेचे पूजन,मुख्य जलकुंभ ,शाकंभरी मूर्तीचे पूजन, तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करून, रथातील जल कलशाचे पूजन करून व सहभागी सुहासिनी महिला, कुमारिकेने डोईवर कलश - श्रीफळ घेऊन यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी फटक्याची आतिषबाजी, कुंकवाची उधळण, संभळाचा तुतारीच्या निनादात बँड व डॉल्बीच्या वाद्यात जलयात्रा शिवाजी चौक, आंबेडकर चौक ,दीपक चौक, भवानी रोडवरून महाद्वार चौकातून जलयात्रा मंदिरात रवाना झाली. मंदिरातील गाभाऱ्यात सुहासिनी  महिलांनी आणलेले जलकलश तुळजाभवानी चरणी जल अर्पण करून सुवासिनी महिलांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले .त्यानंतर परंपरेप्रमाणे सहभागी महिलांचे मंदिर संस्थानच्या वतीने खण नारळाची ओटी भरण्यात आली. त्यानंतर पंचामृत अभिषेक प्रारंभ झाला. दरम्यान जल यात्रेतील सहभागी आराधी, गोंधळी वाले ,धनगरी पथक ,महिला, युवा पुजारी वर्ग यांनी आपली पारंपारिक नृत्य कला या वेळी सादर केली. परगावाहुन आलेले व जल यात्रेत सहभागी झालेले तृतीयपंथी यांनीही त्यांच्या पद्धतीने कला सादर केली तर आराधी महिलांनी कवड्याची माळ, गळ्यात भंडाराची पिशवी ,हातात झांज घेऊन फेर धरून देवीचे गीते गायली. या यात्रेत सहभागी असलेले घोडेस्वार विशेषता कुमारिका घोडेस्वार सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बैलगाडीत ठेवलेले नगारा हेही भाविकांचे लक्ष वेधत होते. रथामध्ये शाकंभरी ची मूर्ती, चांदीचा कलश याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दुतर्फा मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती .या जत्रेत तुळजाभवानीचे महंत,शासकीय उपाध्ये बंडोपंत पाठक, व्यवस्थापक राहुल पाटील ,धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले,  मंदिर कर्मचारी, प्रक्षाळ मंडळाचे पदाधिकारी, पुजारी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, उपाध्ये,सेवेकरी इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. यात्रेच्या समारोपानंतर प्रक्षाळ मंडळाच्या वतीने अन्नदान व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर सहभागी महिलांना जलकलश देण्यात आले. यात्रा पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात चोख सुरक्षाव्यवस्थेत पार पडली.



* घोडेस्वार (चिमुकले)सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.


* आराधी व गोंधळी यांनी जलयात्रे वेळी आपली पारंपारिक नृत्य कला या वेळी सादर केली.




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...