शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

नळदुर्ग शहरात पत्रकार भवन साठी नगरपालिकेच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार -अशोक जगदाळे नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न

नळदुर्ग शहरात पत्रकार भवन साठी नगरपालिकेच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार -अशोक जगदाळे

नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न



नळदुर्ग/प्रतिनिधी

नळदुर्ग शहर विकास कामात नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे मोठे योगदान असून पत्रकार संघाने काढलेले सन 2019 या वर्षाचे दिनदर्शिका सर्वांसाठी उपयुक्त आसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना सांगितले.

सालाबादप्रमाणे यावर्षी ही नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने सन 2019 या वर्षी ची वार्षिक दिनदर्शिका काढली आहे. पत्रकार संघाच्या या दिनदर्शिकेचे वैशिष्ठये म्हणजे या दिनदर्शिकेमध्ये बाजारात मिळणाऱ्या दिनदर्शिकेतील माहीती असतेच या शिवाय आपल्या परिसरातील सर्व धर्मीयांचे उत्सव,सण,उरुस, जयंती व वाढदिवसाच्या यामध्ये समावेश केलेले आहे. त्यामुळे ही दिनदर्शिका केव्हा बाहेर येते याची सर्वजण वाट पहात असतात. नळदुर्ग पत्रकार संघ गेली सतरा वर्षे दिनदर्शिका काढण्याचा हा उपक्रम राबविते. शहर पत्रकार संघाने काढलेल्या या दिनदर्शिकेचे प्रकाशन दि. 29 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समीतीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून नगरसेवक शहेबाज काझी, नितीन कासार, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, शहर प्रमुख संतोष पूदाले, भाजपाचे शहराध्यक्ष पदमाकर घोडके, पालिकेचे पाणी पुरवठा समीतीचे सभापती महालिंग स्वामी, नगरसेवक विनायक अहंकारी, बसवराज धरणे आदी उपस्थीत होते. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शीकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अशोक जगदाळे म्हणाले की, नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या दिनदर्शिका काढण्याचा उपक्रम अतिशय स्तूत्य आहे. प्रत्येक विकास कामात पत्रकार संघाचे सहकार्य आहे. पत्रकारांनी सर्व सामान्यांना न्याय देण्या बरोबरच चुकीचे काम करणाऱ्याचे कान उघडण्याचे कामे करावे, येत्या एक वर्षात शहरात पत्रकारांना पत्रकार भूवन बांधण्यासाठी पालिकेकडून जागा उपलब्ध करुन देणार असल्याचे जगदाळे यांनी म्हटले आहे. विकास कामात राजकारण करु नये, शहरातील लिंगायत स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी पालिकेने 15 लाख रुपयेचा निधी देवून रस्ता तयार करण्याचे सर्व प्रक्रीया पुर्ण केली आहे. मात्र या न्यायालयीन वाद आसल्याने पालिका सध्या त्या रस्त्याचे काम करण्यात आडचणी येत आहेत. ही वस्तूस्थीती असताना कांही नेत्यांनी या मध्ये राजकारण करुन आम्ही या रस्त्याच्या विरोधात असल्याचे सांगून यात राजकारण करायचा प्रयत्न केला आहे. लिंगायत समाज यांनी अशा नेत्या पासून सावध रहावे, रस्त्याचा हा वाद लिंगायत समाज अंतर्गत आहे. त्या मुळे समाजाने हा वाद मिटविला तर पालिका एक दिवसातच या रस्त्याचे काम सुरु करेल. रस्तयाच्या कामाचे श्रेय घेण्याचा आम्ही प्रयत्न कधीच करणार नाही. आम्हाला त्या ठिकाणी फक्त रस्ता करायचा आहे राजकारण करायचे नाही असे ही अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे. यावेळी कमलाकर चव्हाण, शहेबाज काझी, विनायक अहंकारी, संतोष पूदाले व शिवाजीराव मोरे यांनी ही आपल्या भाषणात शहर पत्रकार संघाचे कौतुक करुन पत्रकारांनी यापुढील काळात कोणते ही असे उपक्रम राबविण्याबरोबरच अन्याय व भृष्टाचाराच्या विरोधात लिखान करावे असे म्हटले आहे.

या कार्यक्रमास मनेसेच शहराध्यक्ष जोतीबा येडगे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकूर, शिवसेनेच्या ग्राहक कक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र जाधव, युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, काँग्रेसच्या शिक्ष्क सेलचे जिल्हाध्यक्ष संजय दळवी, तानाजीराव जाधव, शिवाजीराव वऱ्हाडे, मल्लीकार्जून हत्ते, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, मराठा सेवा संघाचे राजेंद्र काशीद, रघुनाथ नागणे, शरद देशमुख, पत्रकार आयुब शेख, सतीश राठोडे, अशोक अलकुंठे, भगवंत सुरवसे, संजय विठठल जाधव, उमेश जाधव, नेताजी किल्लेदार, अविनाश जाधव, कुलदीप येडगे, प्रशात पवार, मनोज जाधव, नितीन शिंदे, नेताजी जाधव, सोमनाथ पवार, सोमनाथ सावंत यासह शिवशाही तरुण मंडळा व धर्मवीर संभाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन तानाजी जाधव यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे सचिव गुरुनाथ कबाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, गुरुनाथ कबाडे, सदस्य विलास येडगे, लतीफ शेख, उत्तम बनजगोळे, तानाजी जाधव, प्रा. दिपक जगदाळे, अमर भाळे यांनी परिश्रम घेतले.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सरला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून युवकांनी शरीर, मन आणि बुद्धी सुदृढ करून व्यक्तिमत्त्व विकास करावा - प्रा.डी.टी इंगोले

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून युवकांनी शरीर, मन आणि बुद्धी सुदृढ करून व्यक्तिमत्त्व विकास करावा - प्रा.डी.टी इंगोले 


उमरगा / चेतन पवार


राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे

उदघाटन.


उमरगा तालुक्यातील आलूर येथे मुरुम येथील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे "विशेष शिबीराचे उदघाटन  झाले. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मुरुम पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मा.श्री.सानप बी.डी.साहेब, वेदमूर्ती महांतय्या स्वामी ,भारत शिक्षण संस्थेचे संचालक त्र्यंबक (बाबा) इंगोले, सोमेश्वर पंचकमिटी अध्यक्ष अशोक वाकडे, शंकर जाधव, रामचंद्र काळू, शिवराज(पोलीस) पाटील इत्यादी.उपस्थित होते.

ग्राम राष्ट्रीय सेवा योजना विभांगातर्गत   स्वच्छता व जलसंवर्धन हि काळाची गरज आहे. जलव्यवस्थापनासाठी युवा हे विशेष  श्रमसंस्कार शिबीर मौजे आलुर येथे दि.२४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत करणार आहेत. शिबिरामध्ये मौजे आलुर गावातील ग्रामस्वच्छता करून स्वच्छता ही सेवा जनजागृती करण्यात आली. गावातील सांडपाणी पूर्णभरण करण्यासाठी शोषखड्डे घेण्यात आले सदर शिबिरामध्ये प्रबोधन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कौशल्य विकास व रोजगार निर्मिती शिवकालीन जल व्यवस्थापन, सामाजिक ,धार्मिक समस्या आजचा तरुण, जलसंधारण काळाचे गरज सूक्ष्म सिंचन वापर, आणि ग्राम सहभागातून जल समृद्धी अशा विविध ज्वलंत प्रश्न व विचार  मंथन करण्यात येणार आहे .तसेच विविध विषयांवर शिबिरार्थीची गट चर्चा अशा विविध उपक्रमाचा या श्रमसंस्कार शिबिरामध्ये राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुरूम पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मा.श्री.सानप बी.डी साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कला,वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य इंगोले डी. टी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते आपण चांगले आयुष्य जगण्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. हे वय वादळी वय आहे.आपल्या हातून कोणत्याही प्रकारचा अपराध घडू नये,यासाठी आपण भरपूर अभ्यास करून आई वडीलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असे प्रतिपादन सानप साहेब यांनी केले.

विजयकुमार बोळदे हे म्हणाले की, शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न होण्यासाठी चांगले व्यासपीठ तयार होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य इंगोले डी.टी.यांनी अंध मुलाची जिद्द कशी असते. ही कथा सांगितली. ते पुढे म्हणाले की, आपण मुलगा जन्माला आला तर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करतो ,पण ज्या आईच्या ऊदरी अंध मुलगा जन्माला येतो त्या मातेची वेदना काय असेल. परंतु तोच अंध मुलगा पुढे मोठा झाल्यावर जिल्ह्याधिकारी बनतो.तुमच्या मध्येही जिद्द निर्माण करून चांगला माणूस म्हणून जगा असे मत व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.किसन माने यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती. विजया बेलकेरी मॅडम यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

लोहारा शहरातील तरुणाई व्यसनाच्या विळख्यात

लोहारा शहरातील तरुणाई व्यसनाच्या विळख्यात 

लोहारा / सुमित झिंगाडे 

लोहारा शहरातील तरुणाई व्यसनाच्या विळख्यात चिरली जाऊ लागली आहे, नशाबाज तरुणाई मुळे शहरात दारु, शिंदी,गांज्या, गुटखा, मटका, आहेत त्यामुळे  अवैध धंदे खुलेआम सुरु असल्यामुळे तरूणाई जामिनदोस्त होत आहे, या झिंगाट तरुणांना योग्य मार्गदर्शन देणारा मार्गदर्शन हवा आहे शासनाने गुटखाबंदी  केली माञ ही बंदी कागदावरच नावालाच राहिली असून राज्यात गुटखाबंदीचा फज्जा उङाला आहे फङणवीस सरकारने गुटखाबंदील आतून पाठीबा दिल्यामुळेच आज  गुटखाबंदी कायधाचे बारा वाजले आहेत अन्न व औषध विभागाच्या ङोळेझाकीमुळे गुटखा विकला जातो ङोळ्यांनी बघून एखादी साधी कारवाई   सुध्दा न करणारा अन्न  व औषध विभाग शासनाने कशासाठी पोसल आहे हा प्रश्न सामान्य जनतेतून विचारल जात आहे .प्रत्येक पानटपरीमध्ये खुलेआम गुटखा विकला जातोय कर्नाटक तून चोरट्या मार्गने येणारा गुटखा ङायरेक्ट पान टपरीत अनून  पानटपरीतून तो सहज तरुणांच्या खिशात  सापडतोय चोरुन विकला जाणारा गुटखा आता अव्वाच्या सव्वा किंमतीत विकला जातोय खाणारी तोंडे वाढल्यामुळेची विक्रेता ची चांदी आहे  या गुटखा विक्री  मुळे युवावर्ग व्यसनधिन झाला असल्यामुळे त्याची कुटुंबे उद्ध्वास्त होण्याचा मार्गावर आहेत तरी संबंधित विभागाने या गोष्टीकङे गांभीर्यान लक्ष घ्यावे परिसरातील नागरिक मधून नाराजी व्यक्त होत आहे,


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मंगळवार, १८ डिसेंबर, २०१८

लोहारा येथे प्रधानमंत्री आवास योजना सुरू

लोहारा येथे प्रधानमंत्री आवास योजना सुरू


लोहारा / प्रतिनिधी 

दि १८

लोहारा  शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावा गावात प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली, असून लोहारा शहरातील नगरपंचायत मध्ये अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे, तरी या प्रधानमंत्री आवास योजने चा शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात फायदा व्हावा यासाठी शिवसेनेचे नगरसेवक शामसुंदर नारायणकर यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांचे असे म्हणणे आहे की सध्या राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, असून येथिल नागरिकांना मोफत फॉर्म भरून ध्यावे, घरपट्टी व नळपट्टी सध्या नागरिक भरू शकत नाहीत, तरी त्यची अट न ठेवता नागरिकांचे फॉर्म मोफत भरून द्यावे अशी मागणी केली आहे,



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

जलयुक्त शिवार अभियान 2018-19 योजनेंतर्गत कंपार्टमेंन्ट बंडींगाच्या कामाचा शुभारंभ आ. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले

जलयुक्त शिवार अभियान  2018-19 योजनेंतर्गत कंपार्टमेंन्ट बंडींगाच्या कामाचा शुभारंभ  आ. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले .

सन

तुळजापूर / प्रतिनिधी 


पर्यावरणाच्यादृष्टिने अत्यंत आवश्यक आहे. विकासाच्या नादात जलयुक्त शिवार घटकांचा नाश होत आहे. या प्रमुख घटकांचे संवर्धन करण्यासाठी कटिबध्द आहेत. त्यासाठीच जलयुक्त शिवार, गाळ युक्त शिवार यांसारख्या योजना अंमलात आणल्या आहेत. जलयुक्त शिवारामुळे नैसर्गिक पाणी स्त्रोताचे पुर्नजिवित करणे शक्य झाले असल्याची माहिती आ. मधुकरराव चव्हाण यांनी दिली.दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वा.मौजे  हिप्परगा ताड येथे जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत कामाचे शुभारंभ दिवशी बोलताना सांगीतले.


यावेळी पुढे बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, कंपार्टमेंटन्ट बंडींगच्या कामामुळे शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात लाभ होणार त्यामुळे या भागातील शेतकरी हे होणारी सर्व कामे दर्जेदार करुन घ्यावी. सध्या दुष्काळी परिस्थीती आहे. त्यामुळे पाणी जपून वापरणे त्याच बरोबर पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. टंचाई काळात अधिकाऱ्यांनी नागरिकांना विहिर,बोअर अधिग्रहण करणे व मंजूराच्या हाताला काम  देण्याच्या सूचना यावेळी केल्या. रोजगार हमी योजनेंतर्गत शेतरस्ते,सिंचन विहीर व इतर कामे करण्यात येणार आहेत. प्रशासनाशी समन्वय साधून वैयक्तीक लाभाच्या योजना तसेच इतर योजनाचा लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले. यावेळी  नायब तहसिलदार अमित भारती, प.स. सभापती शिवाजी गायकवाड संरपंच, अरुण दळवी,ग्रामसेवक,गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येणे आदि उपस्थित होते .

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

मोघा खुर्दच्या मुलांनी रंगभरन करूण केले बाबासाहेबांना अभिवादन

मोघा खुर्दच्या मुलांनी रंगभरन करूण केले बाबासाहेबांना अभिवादन

लोहारा / प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघा खुर्द येथे भारतरत्न,महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनानिमित्त रंगभरण स्पर्धा घेवुन अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण भोंडवे हे होते.यावेळी लोहारा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम.सय्यदा टी.एच यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन विषयतज्ञ आनंद सोनकांबळे,शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष मुरलीधर शिंदे,रेखा दळवे,मनिषा गोरे,शैला गोरे ,माने एस.ए यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मुख्याध्यापक विकास घोडके यांनी बाबासाहेबांच्या जिवनाविषयी माहीती दिली व बाबासाहेबांचे विचार,गुण आचरणात आणावेत असे अवाहन केले.यावेळी गटशिक्षणाधिकारी सय्यदा मँडम यांनी शालेय गुणवत्तेची तपासणी करून शालेय गुणवत्तेविषयी समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे जिवनचरीत्र वाचावे,शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे जो पिल तो गुरगुरल्याशिवाय रहाणार नाही यासाठी विद्यार्थांनी चांगला अभ्यास करावा असे अवाहन केले.शाळेत विविध उपक्रम साजरे करीत असल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले.यावेळी मुलांनी डाँ.बाबासाहेबांच्या चित्रांचे रंगभरण करून अभिवादन केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विकास घोडके यांनी केले तर आभार सतीश माने यांनी मांडले.यावेळी हमीद मुजावर,रईसा मुजावर,विद्यार्थी,पालक उपस्थित होते.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

लोहारा येथे म रा वि वि कंपनीचे वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी

लोहारा येथे म रा वि वि कंपनीचे वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी

लोहारा / प्रतिनिधी 

म रा वि वि कंपनीचे वीज बिल भरणा केंद्र कार्यालयातच चालु करणे बाबत चे निवेदन आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या वतीने देण्यात आले.

 लोहारा शहरात म रा वि वि कंपनीचे लाईट बील भरणा केंद्र यापुर्वा कार्यालयात चालु होते. परंतु ते येणेगुर येथे स्थलांतर करण्यात आले आहे. लोहारा हे तालुक्याचे ठिकाण असुन या ठिकाणी संपुर्ण खेडे गावाचे लोक ये-जा करतात. त्याला पर्याय म्हणुन आपण डाँ बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट बँकेस बिल भरणा केंद्राची परवानगी दिली आहे. तरी त्या बँकेत ग्राहकांना बँकेत खाते काढुन घेतल्यानंतरच लाईट बिल भरून घेण्यात येईल असे सांगितले जात आहे. तरी 100 रु बिल भरणासाठी ग्राहकांना बँकेत खाते काढुन 1000/- रु गुंतवावे लागेल. तरी य़ात बँकेचा फायदा होत असुन ग्राहकांना नुकसान होत आहे.

 तरी कोणत्याही खाजगी बँकेला हा बिल भरणा केंद्र न देता पुर्वी प्रमाणे कार्यालयामध्ये चालु असलेले बिल भरणा केंद्र चालु करावे जेणे करून नागरिकांची नुकसान व गैरसोय होणार नाही. असे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फ आंदोलन छेडण्यात येईल याची नोद घ्यावी. अश्या मागणीचे निवेदन *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आयुब हबीब शेख यांनी उपअभियंता लोहारा यांना दिले. निवेदनावर जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, युवक तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, महेबुब फकिर, हेमंत माळवदकर, सलीम कुरेशी, आमीन कुरेशी, शेख आशपाक, ताहेर पठाण, महंमद खड़ीवाले, सद्दाम मुलानी आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.


(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

रविवार, २ डिसेंबर, २०१८

पाणी पुरवठयाची टाकी बनली धोकादायक पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

पाणी पुरवठयाची टाकी बनली  धोकादायक

पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष 

 लोहारा/प्रतिनिधी

 लोहारा शहरात पाणी पुरवठा करण्यात येणारी  टाकी  जुनी झाली आसून ही टाकी पडण्याच्या अवस्थेत झाली आहे त्यामुळे नागरिक कांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे याकडे लक्ष देऊन नगरपंचायत ने ही टाकी पाडून टाकावी या साठी नगरपंचायत ला भाजप विद्यार्थी आघाडी तालुकाअध्यक्ष बाबा सुबेकर व सर्व नागरिकाच्या तर्फे  निवेदन देण्यात आले, त्यात आसे म्हटले आहे की निवेदने देऊन पण यांची कोणीच दखल घेत नाही, ही टाकी ग्रामपंचायत ने त्या काळात शहरासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बांधली होती आता ह्या टाकीला ४५ वर्ष पूर्ण होऊन गेले आहेत, ही टाकी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आसून, ह्या टाकी च्या खाली  लहान मुलांची अंगणवाडी व  आजूबाजूला घरे दुकाने व दवाखाना आहेत, ही टाकी कधीही पडू शकते येत्या काही दिवसात  जर टाकी नाही, पाडली गेली तर नागरिक तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले जात आहे,


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सरला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार विद्यार्थ्यांना पास मिळेना अधिकाऱ्यांकडून दिली जात आहेत उडवाउडवीची उत्तरे

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार विद्यार्थ्यांना पास मिळेना

अधिकाऱ्यांकडून  दिली जात आहेत उडवाउडवीची उत्तरे 

तामलवाडी/प्रतिनिधी 

तामलवाडी ता.तुळजापूर येथील साधारण 100 ते 120 विद्यार्थी सोलापूर येथे उच्च शिक्षण( 11 वी,12 वी डिप्लोमा, पदवी शिक्षणासाठी दररोज सोलापूर ला ये-जा करतात. मराठवाडय़ातील 164 तालुक्यात दुष्काळग्रस्तस्थिती असल्यामुळे त्यांना शिक्षणासाठी मोफत पास देण्याचे सरकारने जाहीर

 केले पण तामलवाडीतील विद्यार्थी मुले-मुली नियमित पास सोलापूरने काढत असतात आणि हा मोफत पास आम्ही देऊ शकत नाही असे रा.प.म.सोलापूर सांगतात व मुला-मुलींना पास देत नाहीत..तुमचे गाव मराठवाडय़ातील आहे..तुम्ही तुळजापूर आगाराशी संपर्क करून मोफत पास काढा..काही पालक, विद्यार्थी यांनी आगार व्यवस्थापक रा.प.म.तुळजापूर येथील अधिकारी श्री.दिवटे साहेब, राठोड साहेब, पासविभाग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणतात तुम्ही जेथे काढता तेथेच पास काढा अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे सध्या पालकांना, विद्यार्थ्यांना एस.टी.प्रशासन देत आहे सरकार योजना जाहीर करतय आणि अधिकारी अशी वागणूक देत आहेत दि.19/11/2018 पासून महाविद्यालये चालू झालेली आहेत आणि त्यात हा प्रकार त्यामुळे शेतकऱ्यांच्या,गोर-गरीब,सर्वसामान्य लोकांच्या मुला-मुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे आम्ही मार्गदर्शन मागवत आहोत बघू अशी शब्दिक फसवणूक एस.टी.प्रशासन विद्यार्थ्यांना करत आहे याकामी लवकरात लवकर मार्ग निघावा अन्यथा पालक,विद्यार्थी, लोकप्रतिनिधी ग्रामस्थ यांच्यावतीने लोकशाही मार्गाने एस.टी.प्रशासना विरोधी आंदोलन उभे करण्यात येईल अशी भूमिका पालक,विद्यार्थी मांडत आहेत.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१८

नळदुर्ग वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने आयोजित विवाह सोहळ्यात तेरा जोडप्यांचा विवाह संपन्न विवाह सोहळ्याचे गेल्या चार वर्षांपासून करण्यात येते आयोजन

नळदुर्ग वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने आयोजित विवाह सोहळ्यात तेरा जोडप्यांचा विवाह संपन्न
विवाह सोहळ्याचे गेल्या चार वर्षांपासून करण्यात येते आयोजन 

नळदुर्ग/प्रतिनिधी


नळदुर्ग  एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने 18 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात तेरा जोडप्यांचा विवाह येथील एकदा मैदान येथे मोठ्या थाटामाटात पार पडला यावेळी तेरा वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिक तसे वधू-वरांच्या वऱ्हाड कडील माणसाची नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती निर्णय घेतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या नळदुग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही इस्तेमाई शादियां( सामुदायिक विवाह सोहळा) चे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे या वर्षीही इस्तेमाई शादिया( सामुदायिक विवाह सोहळा) चे आयोजन करण्यात आले होते गेल्या चार वर्षापासून नळदुर्ग शहरात मुस्लिम समाजासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत आहे.नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशन च्या या कार्यामुळे नळदुर्ग शहर तसेच परिसरातील गरीब मुस्लिम बांधवांना मोठा आधार मिळाला आहे पहिल्या वर्षी सात जोडप्यांची विवाहबद्ध झाले होते त्यानंतर दुसऱ्या वर्षी 15 जोडपे विवाहबद्ध झाले होते नंतर तिसऱ्या वर्षी 9 जोडपी विवाहबद्ध झाले होते यावर्षी 18 नोव्हेंबर रोजी तेरा जोडपी विवाहबद्ध झाले 1) औसा - आरळी 2) किरनाळी - हैद्राबाद 3)नळदुर्ग - सोलापूर 4) बादोला - आरळी 5) जेवळी - विरवळे 6) सलगरा - उस्मानाबाद 7) येवती - येवती 8) गंधोरा - सोलापूर  9) शिरशाल - निलंगा 10) अफझलपुर - कराड 11) सोलापूर - सोलापूर 12) बोरगाव - अक्कलकोट 13) उमरगा - करमळा येथील वधुवरांचा विवाह पारपडला या विवाह सोहळ्यात व्यवस्थित झालेल्या नव वधू-वरांना नळदुग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रत्येकी 25 हजार रुपयांचे संसारोपयोगी भांडी भेट देण्यात आली तसेच तसेच नळदुग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने नागरिकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती नळदुग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष लतीफ मामा शेख, मतीन बाडेवाले, रुकणोद्दिन शेख ,युनूस शेख, बरकत जागीरदार, अमीर शेख सादिक काझी खालीद इनामदार, अफरोज पंचभाई, अशपाक कुरेशी, आलीम शेख ,वसीम कुरेशी, खमर कुरेशी आबेद इनामदार, सज्जाद सावकार मुर्तुजा मोजन, दस्तगीर जागीरदार ,शौकत कुरेशी, असलम आतार, रहेमान कुरेशी ,फक्रुद्दीन मुजावर, सिद्दिक शेख, रब्बानी शेख, गौस इनामदार, शमा काझी, ईयाज काजी, आवेज शेख ,करीम इनामदार रफिक फुलारी,बकर कुरेशी, अरफात इनामदार,यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनला उस्मानाबाद येथील हजरत हाजी शमसुद्दीन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अलहाज  सय्यद नादेरउल्ला हुसेनी व त्यांच्या सहकार्यासह हारुन भाई ईनामदार यांचे सहकार्य लाभले त्या विवाह सोहळ्याप्रसंगी हाफिस व खारी सय्यद मैनुद्दिन जागीरदार व आलेम मोहम्मद रजा यांचे धर्म प्रवचन झाले यावेळी हाफिज नियामतुला इनामदार हाफिज, फारुक शेख, हाफिज मोहम्मद मुसा जमादार ,हाफेज शब्बीर शेख,शहर काजी अहेमद अली काजी यांच्या सह शहरातील हाफिज, आलीम, खारी, मुफ्ती, व धर्मगुरू यांच्या सह या विवाह सोहळ्यात नळदुर्ग व परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या समस्यांबाबत सकारात्मक विचार करणार महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या समस्यांबाबत सकारात्मक विचार करणार

हिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे


मुंबई/प्रतिनिधी

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या विविध समस्या जाणून घेतल्या.  त्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 विधान भवनातील त्यांच्या दालनात राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या विविध समस्यांबाबत दि 19 रोजी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.  यावेळी आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे, महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद सिंगल, आयुक्त, ऋषिकेश यशोद, आयोगाचे सदस्य डॉ. शालिनी कराड, वासंती देशपांडे, स्वरदा केळकर आणि विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.  


     मंत्री मुंडे म्हणाल्या की, गतिमंद मुलां-मुलींची बालगृहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहेत. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि सचिवांबरोबर चर्चा करणार आहे.  तसेच गतिमंद मुलां-मुलींसाठी शासनाकडून अधिक लाभ देण्यासाठी सचिव स्तरावर संबंधित सचिवांबरोबर चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  


     राज्यातील बाल कल्याण समिती व बाल न्याय मंडळ सदस्यांचे थकीत मानधन देण्यात आले आहे. वाढीव मानधन देण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. राज्य शासनाकडूनही त्यांना मानधन वाढविण्यासाठी महिला बालविकास विभागाच्या सचिवांना अभ्यास करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत अर्थसंकल्पीय पूरक मागणी,<आयोगाची अतिरिक्त पदे मंजूर करणे, आयोगाच्या आस्थापनेवर अतिरिक्त पदे भरणे आदी विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

लोहारा येथे लहूजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी

लोहारा येथे लहूजी वस्ताद साळवे  यांची जयंती साजरी

लोहारा/प्रतिनिधी दि १४

लोहारा शहरातील शिवाजी चौकात दि 14 रोजी आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची २२४ वी जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मा,दीपक नाना रोडगे, व लोहारा विकास समिती अध्यक्ष जालिंदर भाऊ कोकणे,यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागणंणा वकील, पत्रकार निळकंठ कांबळे ,सरदार फकीर, दीपक रोडगे, लक्ष्मण सगट,विक्रांत मोरे,लहुजी शक्ती सेनेचे सर्वच पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

रविवार, ४ नोव्हेंबर, २०१८

प्रसाद दिवाळी विशेषांक साहित्य क्षेत्रातील मैलाचा दगड ठरेल- डॉ. उदय मोरे.

प्रसाद दिवाळी विशेषांक साहित्य क्षेत्रातील मैलाचा दगड ठरेल- डॉ. उदय मोरे.


उमरगा /प्रतिनिधी


प्रसाद दिवाळी अंकाने ग्रामीण भागातील नवोदित लेखक ,कवी साहीत्यीक  यांना लिहीते करीत उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठामुळे साहीत्यीकाची चळवळ उभे राहील असे प्रतिपादन श्री.श्री. रविशंकर फौंडेशन तथा आर्ट ऑफ लिव्हिंग चे राज्य समन्वयक डॉ. उदय मोरे यांनी केले.


प्रसाद दिवाळी विशेषांक 2018 या पाचव्या अंकाचे प्रकाशन शुक्रवार दि. 02:11:2018 रोजी सायंकाळी 7:30 वा करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे, पोलिस निरीक्षक माधवराव गुंडीले, अचलबेट देवस्थानचे ह.भ.प. हरी लवटे गुरूजी, डॉ. राजकुमार कानडे, राज्यातील प्रसिद्ध कवि बालाजी इंगळे, रोटरी चे अध्यक्ष संतराम मुरजानी, संपादक लक्ष्मण पवार, उपसंपादक नसरोद्दीन फकीर, रोटरी चे माजी अध्यक्ष प्रविण स्वामी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. 


यावेळी पुढे बोलताना डॉ. मोरे म्हणाले की, ग्रामीण भागातील साहीत्यीकांना साहीत्य प्रकाशन करण्यासाठी भरपूर खटपट करावी लागते परंतु पत्रकार लक्ष्मण पवार यांनी प्रसाद च्या माध्यमातून नवोदितांना व सर्वच साहित्य लेखक,कवी रसिकांना व्यासपीठ मिळवून दिले आहे.याचबरोबर शालेय साहीत्यांना स्थान देण्यात यावे. उमरग्यासारख्या ठिकाणी प्रसाद च्या रूपाने ग्रामीण भागातील चांगला दिवाळी अंक प्रकाशीत होत आहे याचे निश्चितच कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. 


यावेळी डॉ दिपक पोफळे यांनी प्रसाद च्या सर्वच सहकारी यांना शुभेच्छा देत भविष्यात येणारा अंक आणखी दर्जेदार व्हायला पाहिजे असे म्हणून शुभेच्छा दिल्या.


अचलबेट देवस्थानचे प्रसिद्ध किर्तणकार ह.भ.प. हरी लवटे महाराज बोलताना म्हणाले की, साहित्य क्षेत्रात लहाणांपासून अबाल व्रध्दा पर्यंत सर्वांना समजेल असा सजग दिवाळी अंक असून साहित्याची ओढ काय आहे हे समजून ग्रामीण भागात प्रसाद ने चांगला दर्जेदार अंक  आमच्या हस्ते प्रकाशीत केल्याने समाधान व्यक्त करत महाभारतातील राम- लक्ष्मण यांचे बाबत थोडं उदाहरणे दाखले देत कलीयुगातील संपादक लक्ष्मण यांच्या बाबत एक दोन वर्षातील आठवणी विषद केल्या. 


कवि बालाजी इंगळे म्हणाले की, ग्रामीण भागातील साहीत्य शहरी भागात चांगल्या प्रकारे प्रकाशित होते. त्याच साहीत्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पहिला अंक ते पाचव्या अंकापर्यंतचा प्रवास मी स्वतः पाहीला आहे. भरपूर आडचणी आहेत त्यावर मात करत महाराष्ट्रातील जवळपास 450 दिवाळी अंक निघतात त्या अंकाच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील नवोदित साहित्य घेवून दर्जा दिवसेंदिवस वाढत चालला आहे असे गौरोदगार काढले.



शेवटी पोलीस निरीक्षक माधवराव गुंडीले म्हणाले की, सतत सातत्य ठेवून कार्य केल्यास प्रसाद ने  तालुका, जिल्हा, मराठवाडा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवित असून येणाऱ्या काळात शेजारच्या कर्नाटक राज्यात तसेच अन्य राज्यात दिवाळी चे महत्व पटवून देत नावलौकिक मिळवेल असे म्हणून यापुढील काळात प्रसाद दिवाळी अंकाच्या टिमने कठोर परिश्रम घेवून तळागाळापर्यंत अंक पोहचवावे अशी अपेक्षा व्यक्त केले. 

यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष संतराम मुरजानी यांनी संपादक मंडळाला शुभेच्छा देत दिवाळी अंकाचे महत्व सांगितले.


प्रसाद दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्यास माजी प्राचार्य शिवानंद दळगडे, मुख्याध्यापक तथा कवि कमलाकर भोसले, व्यापारी महासंघाचे नितीन होळे, प्रदिप चालुक्य, अनिल मदनसुरे, संजय ढोणे, प्राचार्य युसुफ मुल्ला, प्रेस फोटोग्राफर मनिष सोनी, उमरगा लाईव्ह या चँनेलचे प्रमुख प्रदिप भोसले, समाजसेवक भुमीपुत्र वाघ, अभ्यास मंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर माशाळकर सर, कवि अँड. सौ. शोभदाताई पोतदार, सौ. पुष्पलता ताई पांढरे, सुधाकर झिंगाडे, संजय राठोड, बंडू नेलवाडे सर, उमाकांत सुर्यवंशी सर, डॉ. आळंगे, डॉ. हराळय्या, आदीं मान्यवरांची उपस्थिती होती. 


प्रसाद दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रविण स्वामी यांनी केले.  प्रास्ताविक प्रा. विनोद देवरकर यांनी तर उपस्थित मान्यवरांचे आभार युवा कवि युवराज गायकवाड यांनी मानले.


या सोहळ्यास नवोदित लेखक,कवी यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

येणेगूर जवळ बस व पिकअप जीपचा भीषण अपघात दोघे जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी

येणेगूर जवळ बस व पिकअप जीपचा भीषण अपघात

दोघे जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी

 


येणेगूर/प्रतिनिधी : 

उमरगा तालुक्यातील येणेगूर जवळील राष्ट्रीय महामार्गावरील नियोजित साई गणेश मंदिराजवळ कर्नाटक बस व पिकप जीपचा समोरासमोर भीषण अपघात होवून पिकप जीप मधील दोघे जागीच ठार तर चार जन गंभीर जखमी झाल्याचा अपघात गुरुवार दि १ रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडला 

कर्नाटक येथील यादगीर डेपोची तुळजापूर ते शहापूर जानारी बस क्र (के ए ३३ एफ ०४०६ )ही जळकोट कडून उमरग्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना तुगावपाटी ता उमरगा वरील नियोजित साई गणेश मंदिराजवळ आली असता राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण काम चालू असल्याने देण्यात आलेल्या वळण रस्त्यावर ट्रकला ओव्हटेक करन्याच्या नादात समोरुन जळकोटच्या दिशेने जाणाऱ्या महिंद्रा पिकप जीप क्र (एम एच १३ सी यु ३०७९ ) ला बसने समोरासमोर जोराची धडक देवून पिकप जीपच्या समोरील भागाचा चुराडा केला या अपघातत पिकपचालक नागेश काशिनाथ बिराजदार वय २५ रा येणेगूर,गणेश शिवाजी जाधव वय ३२ रा आलियाबाद तांडा ता तुळजापूर हे दोघे जागीच ठार झाले असून प्रकाश शिवाजी जाधव वय ३६ ,विकास शिवाजी जाधव वय २६ रा आलियाबाद तांडा ता तुळजापूर, आप्पु विलास अंगुले वय २६,विलास आंगुले वय ४८ रा जळकोट ता तुळजापूर हे दोघे पिता पुत्र असे एकूण चार जन गंभीर जखमी झाले आहेत मयत व जखमी जाधव हे सख्खे भावूच आहेत या घटनेची माहिती मिळताच येणेगूर दुरक्षेत्रातील पो का दिगंबर सुर्यवंशी,निवृत्ती बोळके यानी घटनास्थळी धाव घेवून जेसीबी व येणेगूर येथील महबूब शेख ,महेश मायनाळे,शंकर हुळमजगे,शरण बिराजदार,शिवराज बिराजदार आदि ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी उमरगा येथे पाठवले यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने पिता पुत्र अंगुले याना सोलापुर येथील यशोधरा या खाजगी रुग्णालयात दाखल केले असून प्रकाश जाधव याना सोलापूर येथील गंगामाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नेहमीप्रमाणेच महामार्ग पोलीस उशिराने आल्याने महामार्गावरील दोन तास वाहतूक खोळंबली होती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी पाहणी केली व योग्यत्या सुचना केल्या मुरूम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक ज्ञानदेव सानप यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सरला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

“आई राजा उदो, उदो” च्या गजरात श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात घटोत्थापन

“आई राजा उदो, उदो” च्या गजरात श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात घटोत्थापन


 

तुळजापुर /प्रतिनिधी

आई राजा उदो उदोच्या गजरात गुरुवार दि. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता मंदीरातील होमकुंडावर पारंपारिक पद्धतीने अजाबली चा धार्मिक विधी सोहळा पार पडला. येथील तहसील कार्यालयातील शिपाई जिवन मोहनराव वाघमारे यांच्या हस्ते होमकुंडावर अजाबलीचा धार्मिक सोहळा पार पडला.


तत्पुर्वी श्री तुळजा भवानी मातेचे पहाटे १ वाजता चरण तिर्थ होवुन भाविकांसाठी दरवाजे खुले करण्यात आले होते. तसेच श्री देवीने दुर्गाष्टमीदिनी महिषासुराचा वध केल्याने शहरातील देवी भक्तांनी श्री देवीजीस गोड करंज्या आदीसह इतर वस्तुचा नैवद दाखवुन पानाचा विडा देण्यात येवुन श्री देवीजीस शहरवासियावतीने आरत्या ओवळण्यात आल्या. त्यानंतर श्री देवीजीस ५ ते ९ या कालावधीत भाविकांचे अभिषेक घालण्यात आले.


🔲शारदीय नवराञ महोत्सवाच्या ९ व्या माळे दिनी श्री तुळजा भवानी मातेची नित्योपचार करून धुपारती करण्यात आली. “आई राजा उदो उदो च्या गजरात मंदीरातील गाभाऱ्यातील घटोत्थापना करण्यात आली. संबळाच्या निनादात तुतारीच्या गजरात मंदीरातील विविध धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने पार पडले.


यावेळी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पाळीचे पुजारी प्रसाद बापुसाहेब पाटील, श्री तुळजा भवानीमातेचे मुख्य महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा महंत हमरोजी बुवा पुजारी,भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे परमेश्वर, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव सांळुके, उपाध्यक्ष विपीन शिंदे, भोपे पुजारी सचिन पाटील, शशीकांत पाटील प्रशांत सोंजी, मुन्ना भैय्ये, कैलास पाटील, विकास मलबा, अविनाश मलबा, संजय कदम, संजय सोंजी तहसीलदार योगीता कोल्हे, प्रभारी नगराध्यक्ष चंद्रकांत कने, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, पाळीकर पुजारी अविनाश गंगणे, रणजीत इंगळे, रुषीकांत मगर, नरसिंग बोधले, प्रा. काकासाहेब शिंदे, आण्णासाहेब भोसले, प्रशांत अणदुरुकर, विकास शिंदे, बाळासाहेब भोसले, सतिश सांळुके, रणजीत करडे आदीसह पाळीकर पुजारी, सेवेदारी, चोपदार, छञे, पलंगे आदीसह पाळीकर पुजारी बांधव धार्मिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थिती होते.तालुक्यातील सिंदफळ येथील अजाबली चे मानकरी गजेद्रं यशवंत लांडगे यांच्या मानाच्या अजाबली ची शहरातुन मिरवणूक काढुण अजाबली मंदीरात आणण्यात आला. त्यानंतर मंदीरातील होमकुंडावर दुपारी १२ वाजता धार्मिक सोहळा पार पडला. या धार्मिक सोहळा पहाण्यासाठी श्री तुळजा भवानी मातेचा परिसर गजबजुन गेला होता.त्याचबरोबर शहरातील नागरीकांनी पुजारी बांधवानी व पंचक्रोशीतील भाविकांनी श्री तुळजा भवानी मातेस नैवद दाखविण्यासाठी मंदीरात एकच गर्दी केली होती.यानंतर मंदीर कार्यालयात मंदीर संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते अजाबलीचे मानकरी गजेद्रं लांडगे व तहसील शिपाई जिवन वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. खंडे नवमीचा सोहळा पहाण्यासाठी शहरातील पुजारी बांधवासह श्री देवी भक्तानी मंदीरात एकच गर्दी केली होती. श्री तुळजाई नगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. श्री तुळजा भवानी मंदीरात प्रचंड बंदोबस्तात मंदीरातील सर्व धार्मिक विधी पार पडले.


🔲"राञी नगरहुन येणाऱ्या पलंग पालखीचे शहरातुन मिरवणूक काढुन शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर रोजी पहाटे श्री देवीचा विजया दशमी (दसरा) पहाटे श्री तुळजा भवानी मातेचे सिमोल्लघंलन होणार आहे".

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)

१०९८ चाईल्ड लाईन चा नंबर हा २४ तास गरजू मुलांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे- डॉ दापके -देशमुख

१०९८ चाईल्ड लाईन चा नंबर हा २४ तास गरजू मुलांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे- डॉ दापके -देशमुख

जळकोट /प्रतिनिधी

जळकोट येथील जिल्हा परिषद शाळा ,  ग्रामपंचायत  व बालकल्याण समिती उस्मानाबाद,सह्याद्री फाउंडेशन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेत दि 16 रोजी बाल रक्षा अभियान  राबविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सत्यवान सुरवसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अलका हिंडोळे , उपसरपंच अर्जुन कदम जिल्हा परिषद चे  माजी सदस्य गणेश सोनटक्के,डॉ ए डी कदम, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सतीश पिसे,न्यूज सिक्सर चे संपादक सोमनाथ बनसोडे हे उपस्थित होते प्रथमथा विद्येची देवता सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सह्याद्री फाउंडेशन उस्मानाबाद चे  डॉ दिग्गज दापके देशमुख यांनी चाईल्ड लाईनच्या १०९८ हा टोल फ्री क्रमांक असून ही एक २४ तास मोफत सेवा देणारी संस्था आहे एखाद्या असहाय्य किंवा मदतीची गरज असणाऱ्या मुलाला पाहिले असाल तर वरील क्रमांकावर फोन करून कळवावे असे आवाहन केले बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. ए डी कदम,

सदस्या कस्तुराबाई कारभारी यांनी बालकांचे हक्क व संरक्षण,बाल कामगार, बाल गुन्हेगार किंवा एखाद्या बालकांचा छळ होताना पहाल तेव्हा त्याला मदत कशी करायची हे सांगून १०९८ या क्रमांकाचे जागृती करून दिली या कार्यक्रमास मुख्याध्यापक टोणपे शोभा,सय्यद कांबळे यु जी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन रुग्ण कल्याण व सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जयश्री महाबोले, मोहिते ये डी,ये डी ढोबळे, एस डी सुरवसे, एस जी प्रदीप, सोमवंशी जी डी यांच्यासह गावातील ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

हस्तलिखित पत्रिका व्यक्त होण्याचे सर्वांगसुंदर माध्यम - डॉ. जी. एच. जाधव

हस्तलिखित पत्रिका व्यक्त होण्याचे सर्वांगसुंदर माध्यम - डॉ. जी. एच. जाधव 

हस्ताक्षर हे मन व स्वभाव उलगडण्याचे तसेच व्यक्त होण्याचे सशक्त माध्यम असून तंत्रज्ञानाच्या या युगात ही कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. सुंदर हस्ताक्षरात लिहलेली पत्रे आजही अनेकांनी आठवणींचा ठेवा म्हणून जतन केलेली आहेत. माहितीच्या आंतजालामुळे सहज उपलब्ध होणारे संदेश, जसेच्या तसे एकमेकांना पाठवले जातात त्यामुळे स्वलेखन कला संपुष्टात येते कि काय? हा प्रश्न अभ्यासकांना पडतो आहे. या पार्श्वभूमीवर हस्तलिखित भित्तीपत्रिका उपक्रमाचे अनन्यसाधारण महत्व आहे असे मत डॉ. जी. एच. जाधव यांनी अनावरण प्रसंगी व्यक्त केले.

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आज दि १४ रोजी वाड.मय मंडळाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लिखाणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना व्यक्त होण्यास व्यासपीठ मिळावे म्हणून “हस्तलिखित भित्तीपत्रक” या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. वाड.मय मंडळाचे अध्यक्ष प्रा. एस. व्ही. बहिरव व सदस्य यांनी विद्यार्थी संपादकांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना लिहिते केले. विद्यार्थी संपादक म्हणून श्री संतोष कांबळे, कु. संध्या पत्रोळे, कु. मेघा पुजारी, कु. पल्लवी गायकवाड व श्री मारुती होगाडे यांनी काम पहिले. 

भित्तीपत्रक अनावरण प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. इंगळे, उपप्राचार्य प्रा. डी. व्ही. थोरे, उपप्राचार्य बी. एन. गायकवाड, पर्यवेक्षक व्ही. जी. तडोळगे, मराठी विभागप्रमुख डॉ. पद्माकर पिटले, हिंदी विभागप्रमुख डॉ. आर. एम. खराडे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. विनोद देवरकर, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत पवार, प्रा. जीवन जाधव, डॉ. सन्मुख मुच्छटे, आदि उपस्थित होते




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

ग्रंथालये ही वाचनालये व्हावीत - डॉ. पद्माकर पिटले

ग्रंथालये ही वाचनालये व्हावीत - डॉ. पद्माकर पिटले  

ग्रंथालये हि वाचकांअभावी स्मशानव्रत झाली आहेत. त्यांच्या अंत्ययात्रेचे साक्षिदार होण्यापेक्षा त्याला आनंदयात्रेचे स्वरूप कसे आणता येईल यावर विचार झाला पाहिजे. ग्रंथालयातील पुस्तके धूळ खात न पडू देता वाचकांपर्यंत कशी पोहचवावीत जेणेकरून ग्रंथालये हि वाचनालयांमध्ये परावर्तीत होतील. यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रमुख वक्ते डॉ. पद्माकर पिटले यांनी "वाचन प्रेरणा दिनानिमित्ते आयोजित व्याख्यानात केले. 

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दि  १५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना व वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ते "वाचन प्रेरणा दिनाचे" आयोजन करण्यात आले होते. डॉ. कलाम यांचा वाढदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जावा अशी त्यांची इच्छा होती. ज्ञानाने मनुष्य समृद्ध व प्रगल्भ होतो. त्याकरिता प्राध्यापक, विद्यार्थी, व सर्व शिक्षित जनामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. समृद्ध ग्रंथालयातील पुस्तके वाचकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली पाहिजेत  म्हणून हा वाचन प्रेरणा दिन साजरा केला गेला. आपण कुठल्या जातीत जन्मलो त्यापेक्षा ज्ञानाच्या बळावर आपण कुठे पोहचलो हे महत्वाचे. वेगवेगळ्या जातीत जन्मूनही अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून शेवटी पुस्तकांसोबतच या जगाचा निरोप घेतला असेही मत डॉ. पिटले यांनी व्यक्त केले.   

या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य, प्रा. डी. व्ही. थोरे म्हणाले कि, सुजलाम सुफलाम संस्कृती असणाऱ्या आपल्या देशामध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याची वेळ यावी ही बाब भावी पिढीसाठी चिंताजनक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकविसाव्या शतकामध्ये पुस्तकांबरोबरच माणसंही वाचायला शिकली पाहिजेत. जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी आपण मजबूत पायाभरणी केली जाईल.  याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव, उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. इंगळे, उपप्राचार्य बी. एन. गायकवाड, पर्यवेक्षक व्ही. जी. तडोळगे, हिंदी विभागप्रमुख डॉ. आर. एम. खराडे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख व रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. विनोद देवरकर, डॉ. एम. एस. निर्मळे, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी, प्रा. सुजित शिंदे, प्रा. डी. डी. पांढरे,  सर्व विभागांचे विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनोद देवरकर, सूत्र संचलन प्रा. एस. पी. पसरकल्ले, तर आभार डॉ. आर. एम. खराडे यांनी मानले.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 80875414141,8432860606)

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

तुळजाभवानी देवीची श्री.मुरली अलंकार महापूजा पाचव्या माळेला लाखो भक्तांनी घेतले दर्शन

तुळजाभवानी देवीची श्री.मुरली अलंकार महापूजा पाचव्या माळेला लाखो भक्तांनी घेतले दर्शन  


तुळजापूर (प्रतिनिधी) 


शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या माळेला, रविवार मिती अश्विन शु. ६ , षष्ठी, शके १९४० दि.१४ रोजी तुळजाभवानी देवीची श्री. मुरली अलंकार महापुजा मांडण्यात आली. लाखाच्यावर भाविक भक्तांनी या मुरली  अलंकार महापूजेचे मनोभावे दर्शन घेतले. आई राजा उदो उदोच्या गजराने संपूर्ण मंदीर परिसर दुमदुमून गेला होता. 

शुक्रवारी पहाटे १ वा. देवीची चरणतीर्थ पुजा संपन्न होऊन मंदीर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी ६ वा. नित्य अभिषेक पूजेची घाट देण्यात आली, त्यानंतर देवीस पंचामृत अभिषेक स्नान घालण्यात आले. सिंहासन पूजा संपन्न झाल्या. 

यावेळी मंहत तुकोजीबुवा, भोपे पुजारी संभाजी पाटील, अतुल मलबा, शिवराज पाटील, सचिन पाटील, नागेश भैय्ये, रुपेश परमेश्वर, संजय सोंजी, संकेत पाटील, प्रशांत सोंंजी, विकास सोंजी, मंदीर कर्मचारी दिलीप नाईकवाडी आदींची उपस्थिती होती.

अभिषेक विधी संपल्यानंतर धुपारती करुन अंगारा काढण्यात आला.

तुळजाभवानी देवीला महावस्त्र नेसवून विविध पारंपरिक अलंकारांनी मढवण्यात आले. रविवारी देवीची श्रीकृष्ण रुपातील श्री. मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली. अलंकार महापूजेच्या निमीत्ताने प्राचिन, पारंपारिक दाग-दागिन्यांनी देवीला मढवण्यात आले.

शारदीय नवरात्राच्या पाचव्या माळेला देवीस फिकट लाल  पदराचा लाल रंगाचा शालू नेसविण्यात आला. हिरव्या आणि सोनेरी जरीकाठीचा शालूमध्ये तुळजाभवानी देवीचे रुप अतीव मनमोहक दिसत होते. मस्तकावर नाजूक कलाकुसर केलेला माणिक, पाचू आदी रत्नजडित  सुवर्णमुकूट देवीने धारण केला होता. मुकुटावर सुवर्ण छत्र असून, मुकूटाच्या उजव्या बाजूस मोत्यांचा तुरा सोडण्यात आला होता. देवीला माणिक रत्नजडित सुवर्णनेत्र लावण्यात आले होते. भाळावर हळदी चंदनाचा लेप लावून बाजूस कुंकवाचा मळवट रेखला होता. हळदी-चंदनाच्या लेपावर शुद्ध कुंकू आणि चंदनाने विष्णूगंध रेखाटला होता. देवीस रत्न मोती जडित सुवर्णनथ घालण्यात आली. यानंतर देवीस प्राचिन दाग-दागिन्यांनी मढवण्यात आले. नाजूक कलाकुसर असलेल्या प्राचिन दागिन्यासह शिवकालीन सुवर्ण पुतळ्यांच्या माळा, पाचू, माणिक रत्नजडित जडवलेले सोन्याचे पदक, सुवर्णमाळा, रत्नहार, मोतीमाळा आदी विविध दागिन्यांनी सजवण्यात आले. 

यानंतर देवीची श्री. मुरली अलंकार ही विशेष अलंकार महापूजा मांडण्यात आली. यात देवीस श्रीकृष्णाचे रुप देण्यात आले. देवीने केस तिच्या उजव्या खांद्यावर मोकळे सोडले असून देवीने आपल्या हाती मुरली धारण केली आहे. मुकूटावर मोरपिस खोवले आहे. 

श्री. मुरली अलंकार महापूजेबाबत, तुळजाभवानी मातेने दैत्याचा वध केल्यानंतर सर्व देव, देवता दैत्याच्या त्रासातून मुक्त झाल्या. त्याप्रसंगी श्रीकृष्णाने आपली मुरली देवीस अर्पण केली, त्यामुळे मुरली अलंकार पुजा बांधली जाते. देवीच्या मुरलीवादनामुळे सर्व देव दैवी सुराचा मंगल आनंदानुभव घेऊ लागले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते.

तुळजाभवानीचे श्री. मुरली अलंकार महापुजेतील रूप अत्यंत शांत आणि मनमोहक दिसत होते. लाखो भाविकांनी आई राजा उदो उदोच्या गजरात देवीच्या मुरली अलंकार महापूजेतील मंगलमय रुपाचे दर्शन घेतले.

तत्पूर्वी शनिवारी रात्री प्रक्षाळपूजा संपन्न होऊन सिंह वाहनावरून देवीचा छबिना काढण्यात आला. देवीची चांदीची उत्सवमूर्ती छबिन्याच्या सिंहवाहनावर ठेऊन मुख्य मंदीराभोवती प्रदक्षिणा घालत छबीना मिरवणूक संपन्न झाली. यावेळी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, महंत तुकोजीबुवा, देवीचे भोपे, पुजारी सेवेधारी, मंदीर व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पाचव्या माळेला भाविकांनी पुढील प्रमाणे घेतला दर्शन

अभिषेक दर्शन 2210  

धर्म दर्शन 65662  

मुख दर्शन17455  

पेड दर्शन 6806




(उस्मानाबाद जिल्हयासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा नवरात्रीच्या चौथ्या माळेला हजारो भाविकांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा 

नवरात्रीच्या चौथ्या माळेला हजारो भाविकांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन


तुळजापूर /  सिद्दीक पटेल 

शनिवार मिती अश्विन शु. ५ , ललिता पंचमी, शके १९४० शारदीय नवरात्रीच्या चौथ्या माळेदिवशी तुळजाभवानीची रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. हजारो भाविक भक्तांनी या रथ अलंकार महापूजेचे भक्तीभावाने दर्शन घेतले. आई राजा उदो उदोच्या गजराने मंदीर परिसर दुमदुमून जात होता. 

शुक्रवारी पहाटे १ वा. देवीची चरणतीर्थ पूजा संपन्न होऊन मंदीर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी ६ वा. नित्य अभिषेक पूजेची घाट देण्यात आली. त्यानंतर देवीस पंचामृत अभिषेक स्नान घालण्यात आले.सिंहासन पूजा संपन्न झाल्या. 

यावेळी मंहत तुकोजीबुवा, भोपे पुजारी विरेंद्र कदम, अतुल मलबा, सचिन परमेश्वर, संजय सोंजी, संकेत पाटील, प्रशांत सोंजी, बाळकृष्ण कदम, शशिकांत परमेश्वर, वसंत कदम, सचिन पाटील, मंदीर कर्मचारी दिलीप नाईकवाडी आदींची उपस्थिती होती.

अभिषेक विधी संपल्यानंतर धुपारती करुन अंगारा काढण्यात आला.

तुळजाभवानी देवीला महावस्त्र नेसवून विविध अलंकारांनी मढवण्यात आले. ललिता पंचमीपासून नवमीपर्यंत रोज विशेष अलंकार महापूजा बांधण्यात येतात. शनिवारी ललिता पंचमीच्या निमित्ताने पारंपारिक रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. अलंकार महापूजेच्या निमित्ताने प्राचिन, पुरातन, दागदागिन्यांनी देवीला मढवण्यात येते.

शारदीय नवरात्राच्या चौथ्या माळेला देवीस फिकट केशरी पदराचा लाल रंगाचा शालू नेसविण्यात आला. जांभळ्या आणि सोनेरी जरीकाठीचा शालूमध्ये तुळजाभवानी देवीचे रुप प्रसन्न दिसत होते. मस्तकावर नाजूक कलाकुसर आणि माणिक, पाचू आदी रत्ने जडवलेला सुवर्णमुकूट देवीने धारण केला होता. मुकुटावर सुवर्ण छत्र असून मुकुटाच्या उजव्या बाजूस मोत्यांचा तुरा सोडण्यात आला होता. देवीला माणिक रत्नजडित सुवर्णनेत्र लावण्यात आले होते. भाळावर हळदी चंदनाचा लेप लावून बाजूस कुंकवाचा मळवट रेखला होता. हळदीचंदनाच्या लेपावर शुद्ध कुंकवाने  ॐ कारासह त्रिशूल रेखाटला होता. देवीस रत्न मोती जडित सुवर्णनथ घालण्यात आली. यानंतर देवीस प्राचिन दागदागिन्यांनी मढवण्यात आले. यात शेकडो वर्षांपासून वापरले जाणारे पुरातन तसेच अत्यंत नाजूक कलाकुसर असलेले दागिने आहेत. शिवकालीन सुवर्ण पुतळ्यांच्या माळा, किमती पाचू आणि माणिक, मोती जडवलेले सोन्याचे पदक, सुवर्णमाळा, रत्नहार, मोतीमाळा आदी दागिन्यांनी सजवण्यात आले. 

यानंतर देवीची ललिता पंचमी निमित्ताने विशेष अलंकार महापूजा मांडण्यात आली. यात देवीच्या सिंहासनास रथाचे रुप देण्यात आले. देवीने केस तिच्या उजव्या खांद्यावर मोकळे सोडले असून देवीच्या उजव्या हाती प्रतोद असून डाव्या हातामध्ये लगाम धरला आहे. सिंहासनाच्या दोन्ही बाजूस चक्र जोडले असून पुढे धवल रंगाचे पाच देखणे अश्व जोडले आहेत. 

तुळजाभवानीचे रथ अलंकार महापूजेतील रूप अत्यंत विलोभनीय आणि मंगलमय दिसत होते. हजारो भाविकांनी आई राजा उदो उदोच्या उद्घोषात देवीच्या रथ अलंकार महापूजा रुपाचे भक्तीभावाने दर्शन घेतले.

तत्पूर्वी शुक्रवारी रात्री प्रक्षाळपूजा संपन्न होऊन वाघ वाहनावरून देवीचा छबिना काढण्यात आला. देवीची चांदीची उत्सवमूर्ती छबिन्याच्या व्याघ्रवाहनावर ठेऊन मुख्य मंदीराभोवती प्रदक्षिणा घालत छबीना मिरवणूक संपन्न झाली. यावेळी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, महंत तुकोजीबुवा, देवीचे भोपे, पुजारी सेवेधारी, मंदीर व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज

 तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज

 

उस्मानाबाद/प्रतिनिधी

 तुळजापूर येथील श्री.तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास बुधवार दि.10 ऑक्टोबर पासून घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाची तयारी सर्व प्रकारे पूर्ण झाली आहे.भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची यंत्रणा सज्ज्‍ झाली आहे.

     भाविकांना सुलभ दर्श्न व्हावे यासाठी दर्शनांची वेगवेगळया रांगातून धर्मदर्शन, मुखदर्शन यांच्या वेगळया रांगा केलेल्या आहेत. रांगांशेजारी आपतकालीन वेगळी जागा ठेवली आहे. परिसरात 4+1 मजली दर्शनी मंडप इमारत बांधलेली आहे. या इमारतीत भाविकासाठी पिण्याचे पाणी, पुरुष व महिलासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची प्रत्येक मजल्यावर सोय

 

 

करण्यात आली आहे. दर्शन रांगेत स्टीलरोलिंग, प्रत्येक हॉलमध्ये एलईडी स्क्रीनद्वारे गाभाऱ्यातील, मंदिर परिसरातील प्रक्षेपण भाविकांना पाहण्यासाठी मिळणार आहे.

          दर्शन मंडप मंदिर व मंदिर परिसरात पोलीस विभागाच्या सूचनेनुसार सर्व ठिकाणी बॅरिकॅटींग लावण्यात आले आहेत.मंदिर संस्थानच्या वतीने परिसर स्वच्छ राहावा यासाठी

अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. हे काम तीन सत्रामध्ये जादा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. कचराकुडयांसाठी डस्टबीन ठेवण्यात आलेले आहे. मंदिर परिसरात जंतूनाशक पावडरची फवारणीही करण्यात आली आहे. वेटस्वीपद्वारे सर्व स्वच्छतागृहांची प्रत्येक तासाला कामगारांकडून स्वच्छता करण्यात येत आहे. याशिवाय सुलभ शौचालयाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.भाविकांचे साहित्य तपासण्यासाठी प्रवेशद्वारातच दोन स्कॅनिंग मशिन बसविण्यात आल्या आहेत.

शारदीय नवरात्र महोत्सवात पूर्वापार पंरपरेनूसार श्री. देवीजींचे अनेक धार्मिक विधी होतात, यात घटस्थापना, छबीना, नवरात्राचे कालावधीत दररोज विविध अंलकार महापूजा, वैदिक होम, होमावरील धार्मिक विधी, सिमोल्लंघन, कौजागिरी पौर्णिमा, सोलापूरच्या काठयांसह छबीना ही धार्मिक विधी होतात. मंदिर व मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सर्व परिसर सुरक्षेच्या दृष्टीने नियंत्रित करण्यात आला आहे.प्रशासनाचे विविध विभागावर नियंत्रण राहावे म्हणून मंदिरात नियंत्रण कक्ष, सहाय्यता केंद्र, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय सेवा, मंदिराचे सुशोभिकरण, आपत्ती व्यवस्थापनाची स्थापना करण्यात आली आहे.

शारदीय नवरात्र महोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, पोलीस अधीक्षक आर राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. आशिष लोकरे , मंदिर संस्थानचे व्यवस्थापकीय मंडळ लक्ष देवून कार्यरत आहेत.भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा तात्काळ कार्यान्वित करण्यात येत आहेत.    



(उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीत वाहतूक मार्गात बदल वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे पोलीस विभागाचे आवाहन

शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीत वाहतूक मार्गात बदल

वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे पोलीस विभागाचे आवाहन

उस्मानाबाद /प्रतिनिधी

 तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे तुळजापूरकडे येणाऱ्या विविध मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा यांनी या संदर्भातील आदेश नुकतेच जारी केले आहेत. दि.10 ऑक्टोबर  ते दि. 25 ऑक्टोबर 2018 पर्यंत हे बदल लागू राहणार आहेत.

          या कालावधीत तुळजापूर-सोलापूर या मार्गावर फक्त हलकी वाहने आणि परिवहन महामंडळाच्या बसेस ये-जा करू शकतील. मात्र 21 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपासून  ते  24 ऑक्टोबर 2018 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण वेळ या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद

 

 

असेल  व ही वाहने मंगरुळ पाटी, इटकळ मार्गे ये-जा करतील. उस्मानाबाद-सोलापूर ही वाहतूक वैरागमार्गे होईल. उस्मानाबाद-हैद्राबाद मार्गावरील वाहने औसा-उमरगा,

 

हैद्राबादमार्गे ये-जा करतील. सोलापूर-औरंगाबाद या मार्गावरील वाहने बार्शी, येरमाळामार्गे ये-जा करतील. बार्शी-तुळजापूर या मार्गावर केवळ एकेरी वाहतूक सुरु राहील. तुळजापूरहून वाहने बार्शीला जाऊ शकतील. मात्र बार्शीहून तुळजापूरकडे येणाऱ्या वाहनांना प्रतिबंद करण्यात आलेला आहे. हैद्राबाद-औरंगाबाद या मार्गावर ये-जा करणारी वाहने उमरगा चौरस्ता, औसा, लातूर, अंबाजोगाई, मांजरसुंबा मार्गे ये-जा करतील. लातूर-सोलापूर मार्गे ये-जा करणारी वाहने मुरुड, ढोकी, येडशी, बार्शी मार्गे सोलापूर ये-जा करतील.

          या बदलातून एस.टी. बसेसना वगळण्यात आले आहे. तुळजापूर ते सोलापूर या मार्गाने ये-जा करणाऱ्या एस.टी. बसेस मंगरुळ पाटी-इटकळ मार्गे ये-जा करतील. सर्व प्रकारची शासकीय वाहने, महत्वाच्या, अतिमहत्वाच्या व्यक्तींची वाहने, सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवांसाठींची वाहने यांना या बदलातून वगळण्यात आले आहे. तरी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




(उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेतेअशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली नळदुर्ग महावितरण कार्यालयावर मोर्चा विजयादशमी सणाच्या पार्श्वभूमीवर रोज नऊ तास भारनियमन होत असलेले बंद करण्याची मागणी


राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेतेअशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली नळदुर्ग महावितरण कार्यालयावर मोर्चा

विजयादशमी सणाच्या पार्श्वभूमीवर रोज नऊ तास भारनियमन होत असलेले बंद करण्याची मागणी

नळदुर्ग /प्रतिनिधी

नळदुर्ग येथे ऐन उत्सवात महावितरण कडून नऊ तास भारनियमन होत असल्यामुळे महावितरणच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक  जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि.१० रोजी सायंकाळी भव्य मोर्चा काढण्यात  आला. यावेळी नागरिकांनी भारनियमान विरोधात फलक हाती घेतले होते.सध्या विजयादशमी सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साह असतानाच महावितरणकडून या उत्साहावर पाणी फिलावले जात आहे.महावितरणकडून दररोज नऊ तास भारनियमन करण्यात येत आहे. हे भारनियमन त्वरित बंद करावे व उत्सवाच्या काळात कुठल्या प्रकारचे भारनियमन करू नये या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि.10 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा  काढण्यात आला. ऐतिहासिक चावडी चौकातून मोर्चास सुरूवात झाली. हा मोर्चा मुख्य बाजारपेठ, शास्ञी चौक, बसस्थानक मार्गे महावितरण कार्यालयात धडकला.  यावेळी अनेक तरुणांनी महावितरणचा निषेध व्यक्त करणारे फलक हाती घेतले होते.  या मोर्चामध्ये माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी नगरसेवक संजय बताले, नगरसेवक महावीर स्वामी, संजय जाधव, नगरसेवक दयानंद बनसोडे  सिराज काझी, शब्बीर कुरेशी, नवल जाधव, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते  व्यापारी व सामान्य नागरिकांनी मोर्चात उत्स्फूर्त सहभाग  नोंदविला.



(उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

तुळजाभवानीला इजा पोचवल्यास कुराणाची शपथ…

तुळजाभवानीला इजा पोचवल्यास कुराणाची शपथ…


तुळजापूर /प्रतिनिधी

तुळजाभवानी देवीच्या मंदिराला इजा पोहचवू नये, तेथील पुजार्‍यांना त्रास देवू नये, मंदिराचे नुकसान करू नये, असा स्पष्ट उल्लेख असलेली पाचशे वर्षांपूर्वीची आदिलशाहीची अस्सल सनद तुळजापुरात सापडली आहे. असे कृत्य करणार्‍या मुस्लिमांना कुराणची, ब्राम्हणांना गायीची तर मराठ्यांना काशीची शपथ घालण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वी १४० वर्षे अगोदर पहिल्या आदिलशहाने दिलेली ही सनद महाराष्ट्राच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाला छेद देणारी ठरणार आहे. या सनदीमुळे नव्या ऐतिहासिक मांडणीसाठी विश्वासार्ह प्रमाणही उपलब्ध झाले आहे.आदिलशाहीचा संस्थापक युसूफ आदिलशहा याने हिजरी ९१० म्हणजेच १४८९ साली तुळजापूरसाठी दोन महत्वाच्या सनद दिलेल्या आहेत. तुळजापूर येथील पुजारी विलास वाळके यांच्या घरी १९७१ साली घराचे बांधकाम करताना जुन्या बांधकामात ही सनद सापडली. घराच्या भिंतीत एका संदुकमध्ये ही सनद जपून ठेवण्यात आली होती. एक सनद १ फूट आकाराची तर दुसरी तब्बल ७.२ फूट लांबीची आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख प्रमाणपत्र धारकांकडून यातील मोडी लिपीचे मराठी भाषांतर करून घेण्यात आले आहे. औरंगाबाद येथील उच्च न्यायालयातील एका प्रकरणातही ही सदर वापरण्यात आली आहे.छोट्या सनदीमध्ये त्याकाळी आदिलशहाचा राज्य कारभार कसा चालत होता, याची चुणूक आहे. तर दुसर्‍या सनदीत आदिलशहाने तुळजापूर हे वतन ७०० होनाचा कर म्हणून आनंदराव कदम यांना दिल्याचा उल्लेख आहे. बहामणी राजसत्तेचा सुभेदार असलेल्या युसूफ आदिलशहा याने १४८९ साली आदिलशाहीची स्थापना केली. सलग २०५ वर्षे राज्य कारभार करून १६८५ पर्यंत आदिलशाही टिकली. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात त्याचा मोठा प्रभाव आहे, ही सनद त्याचे उत्तम उदाहरण होय.विलास वाळके यांच्या घरी सापडलेल्या या ऐतिहासिक ठेव्यामुळे महाराष्ट्राच्या तत्कालीन इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल होण्यास मदत होणार आहे. तुळजाभवानी मंदिराला आदिलशहाचा सरदार अफजलखान याने १६५९ साली इजा पोहचविल्याचे उल्लेख अनेक बखरींमध्ये आढळतात. मात्र, इतिहासाचा अस्सल दस्तावेज असलेली ही सनद समोर आल्यामुळे आता नव्याने ऐतिहासिक मांडणी करण्यास विश्वासार्ह प्रमाण उपलब्ध झाला असल्याचा दावा तुलाजभवानी देवीचे अभ्यासक तथा तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ. सतीश कदम यांनी केला आहे.



(उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सरला बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8432860606,8087544141)

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

उस्मानाबाद जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा यासाठी मनसेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

उस्मानाबाद जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा यासाठी मनसेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

उस्मानाबाद/प्रतिनिधी

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दि 4 रोजी निवेदन देण्यात आले  खरीप हंगामी पैसेवारी फुगवून शेतकर्यांचे नुकसान व शासनाची दिशाभूल करणार्या महसूल,कृषि व विमा कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी यांचेवर कठोर कारवाई करून फेर पैसेवारी जाहिर करून उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा अशी मागणी करण्यात आली.

    यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे,मनविसे जिल्हाध्यक्ष महेश जाधव,मनसे उपजिल्हाध्यक्ष अविनाश साळुंखे,जोतिबा येडगे,जिल्हासचिव हणमंत घुगे,मनविसे उपजिल्हाध्यक्ष मल्लिकार्जून कुंभार,शेतकरी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष मयूर गाढवे,मनसे उस्मानाबाद शहराध्यक्ष अभिजित पतंगे,तालुकाध्यक्ष हरी जाधव(उमरगा),अतुल जाधव (लोहारा),पाशाभाई शेख (उस्मानाबाद),शहराध्यक्ष अलिम शेख(नळदुर्ग),राजू चुंगे(उमरगा),उपतालूकाध्यक्ष तुळजापूर धनाजी साठे, शशिकांत तांबे,आश्विन कदम तालुकासचिव रहेमान काझी,विभागाध्यक्ष खंडू कुंभार,अक्षय साळवे,तुळजापूर शहरउपाध्यक्ष राहूल गायकवाड,खामदेव घुगे,विशाल माळी यांच्यासह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापुर तालुकाच्या वतीने निवेदन



तुळजापुर /प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील  खरिप हंगाम २०१८ मध्ये  पावसाचा सलग ८५ दिवसाचा खंड पडल्याने पीकस्थिती चांगली नसताना आणेवारी ५०% हुन अधिक दाखवली म्हणून सुधारित आणेवारी घोषित करून चुकीची आणेवारी दाखवल्याबद्दल दोषींवर कारवाई करणे बाबत उस्मानाबाद चे  उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे  यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये अनेक मागण्या करण्यात आले आहेत ७६ गावांची नजर अंदाज आणेवारी ५० पैशांपेक्षा जास्त दाखवण्यात आल्याचे वृत्तपत्रातील बातम्या पाहून समजले. वास्तविक पाहता खरीप हंगामात पावसाचा जवळपास सलग ८५ दिवसाचा खंड पडला होता.त्यामुळे पिकांची परिस्थिती गंभीर बनली व हातची पिके वाया गेली आहेत.परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.



मोठा खंड पडल्याने व पिकांना जेंव्हा पाण्याची गरज होती तेंव्हाच पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील विविध गावांची पीकस्थिती मागील वर्षाच्या तुलनेत अत्यंत वाईट आहे. या हंगामात सर्वच खरीप पिकांचा उतारा २० टक्केही येणार नाही ही वस्तुस्थिती असताना महसूल विभागाने जावईशोध लावत तालुक्यातील ७६ गावांतील आणेवारी ५० पैशांपेक्षा अधिक दाखवली आहे.



सदर अहवाल हा अत्यंत चुकीचा असून तो वस्तुनिष्ठ नाही.प्रशासनाकडून वारंवार या चुका घडत असल्याने शासनाच्या मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.



गेल्या वर्षी नुकसान झाल्याने या हंगामात हातचे पीक वाया गेले तर कांहीतरी हातभार लागावा याकरिता यंदाही तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे.पीक विम्याच्या दाव्यासाठी ही आणेवारी उपयुक्त ठरते. परंतु गेल्या वर्षी प्रशासनाने चुकीची आणेवारी दाखवल्याने,प्रचंड नुकसान झालेले असताना देखील उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील ७५००० शेतकऱ्यांना पिकविम्यापासून वंचित रहावे लागले.



गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील प्रशासनाने चुकीच्या पद्धतीचा अवलंब करत ५०% हुन अधिक आणेवारी दाखवली आहे.त्यामुळे यावर्षीही उस्मानाबाद-लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणे तुळजापूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.



उत्पादनात लक्षणीय घट झाल्याने बियाण्यांसाठी झालेला खर्चसुद्धा हाती येणार नसल्याचे बहुतांश गावांत चित्र आहे. काही गावांमध्ये आतापासूनच टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यल्प पावसाने खरीप हंगामानंतर आता रब्बीच्या आशा बेभरवशावर पावसावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.



दरम्यान आणेेवारी काढण्याची पद्धत ही निजामकाळापासून एकच असल्याने याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागतो. प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आणेेवारीवरच शासनाच्या पुढील दुष्काळी उपाययोजना अवलंबून असल्याने शासकीय लाभापासून वंचित राहण्याच्या विवंचनेने चिंताग्रस्त असलेले शेतकरी प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्त झाले असून त्यांच्या भावना तीव्र आहेत.



५० पैशांपेक्षा कमी आणेवारी निघाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाबाबतचे वेगवेगळे निर्णय लागू होऊ शकतात. परिणामी शेतकऱ्यांनाही विविध योजनांचा लाभ मिळू शकतो.



आर्थिक संकटात सापडलेला शेतकऱ्यांना प्रशासनाच्या चुकीमुळे शासनाची व पिकविम्याची मदत मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी तातडीने प्रत्यक्ष पीकस्थिती पाहून वस्तुनिष्ठ फेर आणेवारी घोषित करावी.चुकीच्या पद्धतीने आणेवारी घोषित करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी.अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.असे निवेदन आमदार 

 राणाजगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले 


    यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद (दादा) कंदले, महादेव जाधव, रत्नदिप भोसले, दुर्गेश साळुके, समर्थ पैलवान, सुरज जगदाळे, राम जाधव, सुलेमान शेख, ओंकार इगवे व सहकारी उपस्थित होते.

(उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)

गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

असे करा श्रीगणेश विसर्जन पर्यावरणावर प्रेम करा, नदी प्रदूषण मुक्त करा, घरच्या घरी श्रीगणेशांचे विसर्जन करा.

असे करा श्रीगणेश विसर्जन पर्यावरणावर प्रेम करा, नदी प्रदूषण मुक्त करा, घरच्या घरी श्रीगणेशांचे विसर्जन करा,,,,


सर्व गणेशभक्तांना नम्रतेने आवाहन करते की ' परवा श्रीगणेश विसर्जन आहे .पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरेला थोडंस वेगळ वळण देऊ पूर्वी पाऊस जास्त पडत होता नदी बारा महिने वाहत असे ,आता पाऊस काळ कमी | झाला आहे . त्यात नदीमध्ये श्री गणेेशाचे विसर्जन करून व देवाला वहिलेले निर्माल्य नदी ' तलावात

टाकून एक प्रकारचे प्रदूषण करत आहोत .

        ईश्वराने निर्माण केलेले पाणी आपण स्वत : प्रदूषित 

करत आहोत . श्रीगणेश मूर्तीला लावलेले रंग त्यामध्ये असलेले हानिकारक केमिकल पाण्यात मिसळतात व पाण्याचे प्रदूषण होते . त्यामुळे जलचर प्राणी व मानवाला सुद्धा हानी पोहचते. आपण सर्वानी मिळून एक नवीन उपक्रम हाती घेऊया .


      एक नवा संकल्प करूया


१ ) घरच्या घरी श्रीगणेश विसर्जन.

२ ) निर्माल्य झाडाखाली टाका.


विसर्जन

एका मोठया .टफला किंवा बादलीला फुलाने सजवा त्यामध्ये श्रीगणेशाला विसर्जन करा . ते पाणी झाडांना घाला . किंवा त्यामध्ये नवीन झाड लावा .श्रीगणेशाच्या नावे एक झाड लागेल .ज्यांना जागा नसेल त्यांनी . मोकळ्या जागेत किंवा शेतात झाड लावा .झाडांच्या रूपाने बाप्पा आपल्याला सावली रूपी प्रेम देत राहिल . आणि फळ रूपी आशीर्वाद देत राहिल.


निर्माल्य

 निर्माल्य पायदळी न जाता झाडाच्या आळयामध्ये टाका . चांगले खत होईल .


नाविण्य पूर्ण उपक्रमाचे फायदे


१ ) प्रदूषण होणार नाही .

२ ) प्रत्येक घरामध्ये एक झाड 


चला तर मग परवा होणाऱ्या श्रीगणेशाच्या विसर्जनाला एक वेगळे वळण देऊया .आपल्या घरीच श्रीगणेशाचे विसर्जन करूया .


                          पर्यावरणप्रेमी 

                  कविता रमेशराव पुदाले ( विज्ञान शिक्षक )

                जि.प.कन्या प्रशाला नळदुर्ग

  अक्षरवेल महिला साहित्य मंडळ नळदुर्ग अध्यक्ष ( संस्थापिका )



(लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)

मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

केरळ पुरग्रस्तांच्या मदतीला धावले तुळजाभवानी महाविद्यालयाचे विद्यार्थी

केरळ पुरग्रस्तांच्या मदतीला धावले तुळजाभवानी महाविद्यालयाचे विद्यार्थी


तुळजापूर/प्रतिनिधी


अर्थशास्त्र विभागाच्या वतीने केरळ येथील पुरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी तुळजाभवानी महाविद्यालयातील विद्यार्थी पुढे सरसावले त्यांनी अर्थशास्त्र विभागाच्या माध्यमातून महाविद्यालय आणि तुळजापूर शहरात मंगळवार, (दि.१८) रोजी फेरी काढून पुरग्रस्तांसाठी मदत मागितली. या कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र विभागातील प्रा. मारुती लोंढे आणि डॉ.टी.एल. बारबोले यांनी पंधरा दिवसापासून उपक्रमाचे नियोजन केले होते. केरळ येथे घडलेल्या दुर्घटनेत विद्यार्थ्यांनी आपलाही त्यांचे दुःख कमी करण्यासाठी  सहभाग असावा, यासाठी खारीचा वाटा म्हणून तुळजापूर शहरातून दिवसभर फिरून मदत मागितली. या उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एम. मणेर  यांनी अर्थशास्त्र विभागाचे कौतुक केले व अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम महाविद्यालयांमध्ये सातत्याने घेण्यात यावेत,  अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. प्राचार्यांनी स्वतः सर्वप्रथम मदत पेटीमध्ये मदत टाकून या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमासाठी एन.सी.सी.चे मेजर डॉ. वाय. ए. डोके यांचे  प्रा.डॉ.फर्जाना तांबोळी, प्रा.डॉ .सी.आर.दापके तसेच ईतर सर्व प्राध्यापकवृदांनी बहुमोल  सहकार्य केले. सदर मदत फेरीमध्ये बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनिनी आपला सहभाग नोंदविला.


(लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या, जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

तुळजापूर शहर प्रवेशाचे वळण रस्ता नव्याने नंदनवन ढाब्यापासून होणार संजयकुमार बोंदर यांच्या प्रयत्नाला यश

तुळजापूर शहर प्रवेशाचे वळण रस्ता नव्याने नंदनवन ढाब्यापासून होणार 


संजयकुमार बोंदर यांच्या प्रयत्नाला यश 



तुळजापूर /प्रतिनिधी 

तुळजापूर शहरात प्रवेश करण्यासाठी वाहनचालकांना सिंदफळ  चार किलोमीटर पासून वळण घावे  लागत असल्याची मोठी ओरड आहे त्यामुळे राष्ट्रीय अपराध ज्यांचं बयूरो मार्फत संजयकुमार बोंदर यांनी पाठपुरावा केला आहे. राष्ट्रीय अपराध जांच ब्युरो चे इन्फर्मेशन अधिकारी संजयकुमार बोंदर यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक  ५२ वर वहान चालकाची दिशाभूल होत असल्याची   समस्या श्री संजय कदम परियोजना निर्देशक (NHAI) सोलापूर यांच्याकडे पाठपुरावा केल्याने  हजारो वाहनचालकांना याचा फायदा होणार आहे  सोलापूर ते तुळजापूर मार्गावर सिंदफळ येथे तुळजापूर शहर प्रवेशासाठी चा  दिशा दर्शक फलक स्पष्ट मोठ्या अक्षरात लावावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने निवेदनाची दाखल घेऊन सदर सिंदफळ पासूनचे डायव्हर्शन नंदनवन ढाब्यापासून काढले आहे. त्यासाठी ची डिव्हायडर खोदकाम करण्यात आले आहेत. शेजारी असणाऱ्या शौचालयाचा वापर वाहन चालकांनी करावी अशीही व्यवस्था नंदनवन आणि आनंदवन या दोन्ही धाब्याच्या बाजूला केली आहे सोलापूर ते येडशी हा महामार्ग क्रमांक ५२ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी च्या पावन नगरीत येण्यासाठी सोलापूर मार्ग लाभदायक ठरत आहे.  तुळजापूर शहर हे उंचावरती असल्यामुळे दुरुनच तुळजापूर शहर नजरेस येते . वाहन चालकाचा समज असा होतो की शहराच्या जवळ आल्यानंतर शहरात प्रवेश करण्यासाठी चा मार्ग असावा. परंतु वळण मार्ग पाठीमागचे गेला असून त्या वाहनचालकांना पुलावरून उस्मानाबाद रोड वर यावे लागते हे सर्व दृष्टीने चुकीचे झाले आहे हि बाब संजयकुमार बोंदर यांनी प्रशासनाला निवेदनादवरे  लक्षात आणून दिले आहे त्यामुळे हि कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली आहे 


(लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व  जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)


     

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...