रविवार, ४ नोव्हेंबर, २०१८

प्रसाद दिवाळी विशेषांक साहित्य क्षेत्रातील मैलाचा दगड ठरेल- डॉ. उदय मोरे.

प्रसाद दिवाळी विशेषांक साहित्य क्षेत्रातील मैलाचा दगड ठरेल- डॉ. उदय मोरे.


उमरगा /प्रतिनिधी


प्रसाद दिवाळी अंकाने ग्रामीण भागातील नवोदित लेखक ,कवी साहीत्यीक  यांना लिहीते करीत उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठामुळे साहीत्यीकाची चळवळ उभे राहील असे प्रतिपादन श्री.श्री. रविशंकर फौंडेशन तथा आर्ट ऑफ लिव्हिंग चे राज्य समन्वयक डॉ. उदय मोरे यांनी केले.


प्रसाद दिवाळी विशेषांक 2018 या पाचव्या अंकाचे प्रकाशन शुक्रवार दि. 02:11:2018 रोजी सायंकाळी 7:30 वा करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे, पोलिस निरीक्षक माधवराव गुंडीले, अचलबेट देवस्थानचे ह.भ.प. हरी लवटे गुरूजी, डॉ. राजकुमार कानडे, राज्यातील प्रसिद्ध कवि बालाजी इंगळे, रोटरी चे अध्यक्ष संतराम मुरजानी, संपादक लक्ष्मण पवार, उपसंपादक नसरोद्दीन फकीर, रोटरी चे माजी अध्यक्ष प्रविण स्वामी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. 


यावेळी पुढे बोलताना डॉ. मोरे म्हणाले की, ग्रामीण भागातील साहीत्यीकांना साहीत्य प्रकाशन करण्यासाठी भरपूर खटपट करावी लागते परंतु पत्रकार लक्ष्मण पवार यांनी प्रसाद च्या माध्यमातून नवोदितांना व सर्वच साहित्य लेखक,कवी रसिकांना व्यासपीठ मिळवून दिले आहे.याचबरोबर शालेय साहीत्यांना स्थान देण्यात यावे. उमरग्यासारख्या ठिकाणी प्रसाद च्या रूपाने ग्रामीण भागातील चांगला दिवाळी अंक प्रकाशीत होत आहे याचे निश्चितच कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. 


यावेळी डॉ दिपक पोफळे यांनी प्रसाद च्या सर्वच सहकारी यांना शुभेच्छा देत भविष्यात येणारा अंक आणखी दर्जेदार व्हायला पाहिजे असे म्हणून शुभेच्छा दिल्या.


अचलबेट देवस्थानचे प्रसिद्ध किर्तणकार ह.भ.प. हरी लवटे महाराज बोलताना म्हणाले की, साहित्य क्षेत्रात लहाणांपासून अबाल व्रध्दा पर्यंत सर्वांना समजेल असा सजग दिवाळी अंक असून साहित्याची ओढ काय आहे हे समजून ग्रामीण भागात प्रसाद ने चांगला दर्जेदार अंक  आमच्या हस्ते प्रकाशीत केल्याने समाधान व्यक्त करत महाभारतातील राम- लक्ष्मण यांचे बाबत थोडं उदाहरणे दाखले देत कलीयुगातील संपादक लक्ष्मण यांच्या बाबत एक दोन वर्षातील आठवणी विषद केल्या. 


कवि बालाजी इंगळे म्हणाले की, ग्रामीण भागातील साहीत्य शहरी भागात चांगल्या प्रकारे प्रकाशित होते. त्याच साहीत्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पहिला अंक ते पाचव्या अंकापर्यंतचा प्रवास मी स्वतः पाहीला आहे. भरपूर आडचणी आहेत त्यावर मात करत महाराष्ट्रातील जवळपास 450 दिवाळी अंक निघतात त्या अंकाच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील नवोदित साहित्य घेवून दर्जा दिवसेंदिवस वाढत चालला आहे असे गौरोदगार काढले.



शेवटी पोलीस निरीक्षक माधवराव गुंडीले म्हणाले की, सतत सातत्य ठेवून कार्य केल्यास प्रसाद ने  तालुका, जिल्हा, मराठवाडा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवित असून येणाऱ्या काळात शेजारच्या कर्नाटक राज्यात तसेच अन्य राज्यात दिवाळी चे महत्व पटवून देत नावलौकिक मिळवेल असे म्हणून यापुढील काळात प्रसाद दिवाळी अंकाच्या टिमने कठोर परिश्रम घेवून तळागाळापर्यंत अंक पोहचवावे अशी अपेक्षा व्यक्त केले. 

यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष संतराम मुरजानी यांनी संपादक मंडळाला शुभेच्छा देत दिवाळी अंकाचे महत्व सांगितले.


प्रसाद दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्यास माजी प्राचार्य शिवानंद दळगडे, मुख्याध्यापक तथा कवि कमलाकर भोसले, व्यापारी महासंघाचे नितीन होळे, प्रदिप चालुक्य, अनिल मदनसुरे, संजय ढोणे, प्राचार्य युसुफ मुल्ला, प्रेस फोटोग्राफर मनिष सोनी, उमरगा लाईव्ह या चँनेलचे प्रमुख प्रदिप भोसले, समाजसेवक भुमीपुत्र वाघ, अभ्यास मंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर माशाळकर सर, कवि अँड. सौ. शोभदाताई पोतदार, सौ. पुष्पलता ताई पांढरे, सुधाकर झिंगाडे, संजय राठोड, बंडू नेलवाडे सर, उमाकांत सुर्यवंशी सर, डॉ. आळंगे, डॉ. हराळय्या, आदीं मान्यवरांची उपस्थिती होती. 


प्रसाद दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्याचे सुत्रसंचालन प्रविण स्वामी यांनी केले.  प्रास्ताविक प्रा. विनोद देवरकर यांनी तर उपस्थित मान्यवरांचे आभार युवा कवि युवराज गायकवाड यांनी मानले.


या सोहळ्यास नवोदित लेखक,कवी यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...