पाणी पुरवठयाची टाकी बनली धोकादायक
पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरात पाणी पुरवठा करण्यात येणारी टाकी जुनी झाली आसून ही टाकी पडण्याच्या अवस्थेत झाली आहे त्यामुळे नागरिक कांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे याकडे लक्ष देऊन नगरपंचायत ने ही टाकी पाडून टाकावी या साठी नगरपंचायत ला भाजप विद्यार्थी आघाडी तालुकाअध्यक्ष बाबा सुबेकर व सर्व नागरिकाच्या तर्फे निवेदन देण्यात आले, त्यात आसे म्हटले आहे की निवेदने देऊन पण यांची कोणीच दखल घेत नाही, ही टाकी ग्रामपंचायत ने त्या काळात शहरासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बांधली होती आता ह्या टाकीला ४५ वर्ष पूर्ण होऊन गेले आहेत, ही टाकी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आसून, ह्या टाकी च्या खाली लहान मुलांची अंगणवाडी व आजूबाजूला घरे दुकाने व दवाखाना आहेत, ही टाकी कधीही पडू शकते येत्या काही दिवसात जर टाकी नाही, पाडली गेली तर नागरिक तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले जात आहे,
(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सरला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा