उस्मानाबाद जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा यासाठी मनसेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
उस्मानाबाद/प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दि 4 रोजी निवेदन देण्यात आले खरीप हंगामी पैसेवारी फुगवून शेतकर्यांचे नुकसान व शासनाची दिशाभूल करणार्या महसूल,कृषि व विमा कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी यांचेवर कठोर कारवाई करून फेर पैसेवारी जाहिर करून उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे,मनविसे जिल्हाध्यक्ष महेश जाधव,मनसे उपजिल्हाध्यक्ष अविनाश साळुंखे,जोतिबा येडगे,जिल्हासचिव हणमंत घुगे,मनविसे उपजिल्हाध्यक्ष मल्लिकार्जून कुंभार,शेतकरी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष मयूर गाढवे,मनसे उस्मानाबाद शहराध्यक्ष अभिजित पतंगे,तालुकाध्यक्ष हरी जाधव(उमरगा),अतुल जाधव (लोहारा),पाशाभाई शेख (उस्मानाबाद),शहराध्यक्ष अलिम शेख(नळदुर्ग),राजू चुंगे(उमरगा),उपतालूकाध्यक्ष तुळजापूर धनाजी साठे, शशिकांत तांबे,आश्विन कदम तालुकासचिव रहेमान काझी,विभागाध्यक्ष खंडू कुंभार,अक्षय साळवे,तुळजापूर शहरउपाध्यक्ष राहूल गायकवाड,खामदेव घुगे,विशाल माळी यांच्यासह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा