शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

जलयुक्त शिवार अभियान 2018-19 योजनेंतर्गत कंपार्टमेंन्ट बंडींगाच्या कामाचा शुभारंभ आ. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले

जलयुक्त शिवार अभियान  2018-19 योजनेंतर्गत कंपार्टमेंन्ट बंडींगाच्या कामाचा शुभारंभ  आ. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले .

सन

तुळजापूर / प्रतिनिधी 


पर्यावरणाच्यादृष्टिने अत्यंत आवश्यक आहे. विकासाच्या नादात जलयुक्त शिवार घटकांचा नाश होत आहे. या प्रमुख घटकांचे संवर्धन करण्यासाठी कटिबध्द आहेत. त्यासाठीच जलयुक्त शिवार, गाळ युक्त शिवार यांसारख्या योजना अंमलात आणल्या आहेत. जलयुक्त शिवारामुळे नैसर्गिक पाणी स्त्रोताचे पुर्नजिवित करणे शक्य झाले असल्याची माहिती आ. मधुकरराव चव्हाण यांनी दिली.दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वा.मौजे  हिप्परगा ताड येथे जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत कामाचे शुभारंभ दिवशी बोलताना सांगीतले.


यावेळी पुढे बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, कंपार्टमेंटन्ट बंडींगच्या कामामुळे शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात लाभ होणार त्यामुळे या भागातील शेतकरी हे होणारी सर्व कामे दर्जेदार करुन घ्यावी. सध्या दुष्काळी परिस्थीती आहे. त्यामुळे पाणी जपून वापरणे त्याच बरोबर पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. टंचाई काळात अधिकाऱ्यांनी नागरिकांना विहिर,बोअर अधिग्रहण करणे व मंजूराच्या हाताला काम  देण्याच्या सूचना यावेळी केल्या. रोजगार हमी योजनेंतर्गत शेतरस्ते,सिंचन विहीर व इतर कामे करण्यात येणार आहेत. प्रशासनाशी समन्वय साधून वैयक्तीक लाभाच्या योजना तसेच इतर योजनाचा लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले. यावेळी  नायब तहसिलदार अमित भारती, प.स. सभापती शिवाजी गायकवाड संरपंच, अरुण दळवी,ग्रामसेवक,गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येणे आदि उपस्थित होते .

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...