सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

तुळजापूर शहर प्रवेशाचे वळण रस्ता नव्याने नंदनवन ढाब्यापासून होणार संजयकुमार बोंदर यांच्या प्रयत्नाला यश

तुळजापूर शहर प्रवेशाचे वळण रस्ता नव्याने नंदनवन ढाब्यापासून होणार 


संजयकुमार बोंदर यांच्या प्रयत्नाला यश 



तुळजापूर /प्रतिनिधी 

तुळजापूर शहरात प्रवेश करण्यासाठी वाहनचालकांना सिंदफळ  चार किलोमीटर पासून वळण घावे  लागत असल्याची मोठी ओरड आहे त्यामुळे राष्ट्रीय अपराध ज्यांचं बयूरो मार्फत संजयकुमार बोंदर यांनी पाठपुरावा केला आहे. राष्ट्रीय अपराध जांच ब्युरो चे इन्फर्मेशन अधिकारी संजयकुमार बोंदर यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक  ५२ वर वहान चालकाची दिशाभूल होत असल्याची   समस्या श्री संजय कदम परियोजना निर्देशक (NHAI) सोलापूर यांच्याकडे पाठपुरावा केल्याने  हजारो वाहनचालकांना याचा फायदा होणार आहे  सोलापूर ते तुळजापूर मार्गावर सिंदफळ येथे तुळजापूर शहर प्रवेशासाठी चा  दिशा दर्शक फलक स्पष्ट मोठ्या अक्षरात लावावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने निवेदनाची दाखल घेऊन सदर सिंदफळ पासूनचे डायव्हर्शन नंदनवन ढाब्यापासून काढले आहे. त्यासाठी ची डिव्हायडर खोदकाम करण्यात आले आहेत. शेजारी असणाऱ्या शौचालयाचा वापर वाहन चालकांनी करावी अशीही व्यवस्था नंदनवन आणि आनंदवन या दोन्ही धाब्याच्या बाजूला केली आहे सोलापूर ते येडशी हा महामार्ग क्रमांक ५२ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी च्या पावन नगरीत येण्यासाठी सोलापूर मार्ग लाभदायक ठरत आहे.  तुळजापूर शहर हे उंचावरती असल्यामुळे दुरुनच तुळजापूर शहर नजरेस येते . वाहन चालकाचा समज असा होतो की शहराच्या जवळ आल्यानंतर शहरात प्रवेश करण्यासाठी चा मार्ग असावा. परंतु वळण मार्ग पाठीमागचे गेला असून त्या वाहनचालकांना पुलावरून उस्मानाबाद रोड वर यावे लागते हे सर्व दृष्टीने चुकीचे झाले आहे हि बाब संजयकुमार बोंदर यांनी प्रशासनाला निवेदनादवरे  लक्षात आणून दिले आहे त्यामुळे हि कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली आहे 


(लोकप्रिय साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व  जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,9637938555,8432860606)


     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...