सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून युवकांनी शरीर, मन आणि बुद्धी सुदृढ करून व्यक्तिमत्त्व विकास करावा - प्रा.डी.टी इंगोले

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून युवकांनी शरीर, मन आणि बुद्धी सुदृढ करून व्यक्तिमत्त्व विकास करावा - प्रा.डी.टी इंगोले 


उमरगा / चेतन पवार


राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे

उदघाटन.


उमरगा तालुक्यातील आलूर येथे मुरुम येथील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे "विशेष शिबीराचे उदघाटन  झाले. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मुरुम पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मा.श्री.सानप बी.डी.साहेब, वेदमूर्ती महांतय्या स्वामी ,भारत शिक्षण संस्थेचे संचालक त्र्यंबक (बाबा) इंगोले, सोमेश्वर पंचकमिटी अध्यक्ष अशोक वाकडे, शंकर जाधव, रामचंद्र काळू, शिवराज(पोलीस) पाटील इत्यादी.उपस्थित होते.

ग्राम राष्ट्रीय सेवा योजना विभांगातर्गत   स्वच्छता व जलसंवर्धन हि काळाची गरज आहे. जलव्यवस्थापनासाठी युवा हे विशेष  श्रमसंस्कार शिबीर मौजे आलुर येथे दि.२४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत करणार आहेत. शिबिरामध्ये मौजे आलुर गावातील ग्रामस्वच्छता करून स्वच्छता ही सेवा जनजागृती करण्यात आली. गावातील सांडपाणी पूर्णभरण करण्यासाठी शोषखड्डे घेण्यात आले सदर शिबिरामध्ये प्रबोधन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कौशल्य विकास व रोजगार निर्मिती शिवकालीन जल व्यवस्थापन, सामाजिक ,धार्मिक समस्या आजचा तरुण, जलसंधारण काळाचे गरज सूक्ष्म सिंचन वापर, आणि ग्राम सहभागातून जल समृद्धी अशा विविध ज्वलंत प्रश्न व विचार  मंथन करण्यात येणार आहे .तसेच विविध विषयांवर शिबिरार्थीची गट चर्चा अशा विविध उपक्रमाचा या श्रमसंस्कार शिबिरामध्ये राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुरूम पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मा.श्री.सानप बी.डी साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कला,वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य इंगोले डी. टी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते आपण चांगले आयुष्य जगण्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. हे वय वादळी वय आहे.आपल्या हातून कोणत्याही प्रकारचा अपराध घडू नये,यासाठी आपण भरपूर अभ्यास करून आई वडीलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असे प्रतिपादन सानप साहेब यांनी केले.

विजयकुमार बोळदे हे म्हणाले की, शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न होण्यासाठी चांगले व्यासपीठ तयार होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य इंगोले डी.टी.यांनी अंध मुलाची जिद्द कशी असते. ही कथा सांगितली. ते पुढे म्हणाले की, आपण मुलगा जन्माला आला तर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करतो ,पण ज्या आईच्या ऊदरी अंध मुलगा जन्माला येतो त्या मातेची वेदना काय असेल. परंतु तोच अंध मुलगा पुढे मोठा झाल्यावर जिल्ह्याधिकारी बनतो.तुमच्या मध्येही जिद्द निर्माण करून चांगला माणूस म्हणून जगा असे मत व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.किसन माने यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती. विजया बेलकेरी मॅडम यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...