रविवार, २१ एप्रिल, २०१९

नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात बोट पलटी होऊन तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू मृतांमध्ये दोन मुली तर एक मुलाचा समावेश

नळदुर्ग /प्रतिनिधी 

 किल्ल्यात येणाऱ्या लोकांसाठी ठेवण्यात आलेल्या बोटीतून नौकाविहार करीत असताना बोटीत बसलेल्या मुलांचे  तोल समोरच्या बाजूला गेल्याने  बोट पलटी झाल्यामुळे तीन मुलांचे पाण्यात बुडाल्याने

 मृत्यू झाला. तर या बोटीत बसलेल्या इतर सहा जणांनासह बोट चालकाला वाचविण्यात यश आले. ही घटना 20 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की नळदुर्ग येथील एहसान नय्यर काजी हे आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ऐतिहासिक किल्ल्यातील बोरी नदी मध्ये नौकाविहारासाठी असलेल्या बोटीत आपली दोन मुलं तसेच बहिणीच्या पाच मुली व भावाची एक मुलगी असे एकूण नऊ जणांना बोटीमध्ये बसून नौकाविहार करीत असताना बोटीत बसलेल्या मुलांपैकी काहीजण अचानक समोर आल्याने बोट समोरच्या बाजूला झुकल्याने पलटी झाली व या घटने मध्ये एहसान काजी यांचा मुलगा ईजान एहसान काजी वय 5 वर्षे व त्यांची पुतणी सानिया फरोख काझी वय 7 वर्ष सर्व रा. नळदुर्ग तसेच त्यांची भाची अलमास शफिक जागीरदार वय 12 वर्ष रा .मुंबई हे मुलं पाण्यात बुडवून मरण पावले तर त्यांच्यासोबत असलेले 1) सायमा शफिक जागीरदार वय 18 वर्ष 2) अफशा शफिक जागीरदार वय 16 वर्ष 3) बुशेरा शफिक जागीरदार वय 14 वर्ष  4)अननस नौशाद पटेल वय 12 वर्ष सर्व रा. मुंबई 5) एहसान नयर काजी वय 35 वर्ष व त्यांची मुलगी अलिजा एहसान काजी वय 5 वर्ष तसेच बोटीचा रायडर(चालक) श्याम गायकवाड यांना युनिटी मल्टीकॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व इतर लोकांनी सतर्कता बाळगून वाचविण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच वरील 7 जणांना वाचविण्यात यश आले. या दुःखद घटनेत एहसान काझी यांना आपला एक मुलगा, एक पुतणी  व एक भाची गमवावी लागली या दुःखद घटनेमुळे काझी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.बोट उलटुन काही जण पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वारे, हिना  शेख हे पोलीस फाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मयत पैकी सानिया फरोख काझी व ईजान एहसान काजी चुलत भावा बहिणी पाण्यात बुडाल्यामुळे त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी सुमारे तीन ते चार तास लागले यासाठी शहरातील काही तरुणांनी बोटीसह इतर मार्गाचा वापर करून मृतदेह बाहेर काढले. यावेळी तुळजापूरचे उपविभागीय अधिकारी  नीलम बाफना मंडळ अधिकारी गांधले, तलाठी कदम, रफिक फुलारी इत्यादी जणांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला. तसेच या घटनेत मयत झालेली अलमास शफिक जागीरदार या मुलीस पाण्यात बुडाल्यानंतर तात्काळ बाहेर काढून येथील शासकीय रुग्णालयांमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे या मुलीला वेळेवर उपचार नाही मिळाल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याने मुलीच्या मृत्यूस कारणीभूत वैद्यकीय अधिकारी विरोधात कारवाई करावी म्हणून मुलीचे नातेवाईक व इतर लोक  मोठ्या प्रमाणात जमल्याने काही काळ  प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात तणाव निर्माण  झाला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन  तुळजापूरचे  उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप घुगे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिले यावेळी मयत मुलीचे नातेवाईक व शहरातील लोकांनी नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकार्‍यांविरोधात कारवाई करावी म्हणून तुळजापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप घुगे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वारे, हिना शेख यांनी संतप्त जमावाला शांत करून चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे मोठा अनर्थ टळला.  या दुःखद घटनेत तीन लहान मुलांना आपला जीव गमवावा लागला याबद्दल नळदुर्ग शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शुक्रवार, १९ एप्रिल, २०१९

वात्सल्य चारा छावणीस कडबा पेंडया भेट


नळदुर्ग/प्रतिनिधी

नळदुर्ग येथील काँग्रेसचे नगरसेवक श्री.बसवराज धरणे यांनी वात्सल्य संस्थेच्या माध्यमातून चालू असलेल्या गोवंश चारा छावणीस 400 कडबा पेंडी भेट दिली.सदरील मदत तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराचे महंत श्री इच्छागिरी महाराज यांच्या हस्ते स्वीकारण्यात आली. 

यावेळी महंत श्री इच्छागिरी महाराज म्हणाले,की दुष्काळी परिस्थिती मुळे तालुक्‍यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाई बरोबर चाराटंचाईचे संकट शेतकर्‍यांसमोर उभे आहे. अशा परिस्थितीत जिवापाड सांभाळलेले दावणीचे पशुधन कसे सांभाळायचे असा प्रश्न शेतकऱ्यासमोर होता. याचे उत्तर वात्सल्य सामाजिक संस्थेने समाजातुन दानशूरांच्या  सहकार्यातून गोवंश चारा छावणी सुरू करून सोडवले आहे.सध्या ज्वारीच्या कडब्याला सोन्याचा भाव आला आहे.अशा स्थितीत श्री बसवराज धरणे यांनी 400 पेंडी कडबा भेट देऊन सामाजिक जाणिवेचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.

या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोलापूर जिल्हा संघचालक शिवाजीराव  पाटील, प्रांत पदाधिकारी  निलेश भंडारी, शिवानंद कल्लुरकर,माधव पवार,अँड धनंजय धरणे,डॉ. अंबादास कुलकर्णी,उमेश नाईक, अँड जनक पाटील, अमित शेंडगे, प्रवीण चव्हाण,श्री भीमाशंकर बताले, अप्पू कलशेट्टी,

 कोप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, १८ एप्रिल, २०१९

मतदान प्रक्रियेची गोपनीयता भंग केल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल मतदान करतानाची छायाचित्रे व चित्रफितीचे केले समाजमाध्यमांव्दारे प्रसारण

उस्मानाबाद, दि.18- 

40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात दि.18 एप्रिल हा मतदानाचा दिवस होता. प्रशासनाने अतिशय व्यापक स्तरावर मतदार जागृती मोहीम पार पाडली. मात्र काही तरुणांनी मोबाईलचा वापर करुन मतदान करतानाची स्वत:ची छायाचित्रे व चित्रफितीचे समाजमाध्यमांव्दारे प्रसारण केले. 

त्यांची ही कृती लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 128 च्या तरतुदीचा व मतदान गोपनीयतेचाही भंग करणारी आहे. त्यामुळे संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहेत. 

त्यानुसार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 240 उमरगा (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री.विठठल उदमले तसेच  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 242 उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री.चेतन गिरासे यांनी संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याबाबत पोलीस स्टेशनला कळविले आहे. 

प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून मतदान केंद्रांमध्ये मोबाईलचा वापर निषिध्द असल्या बाबतची योग्य ती प्रसिध्दी देण्यात आली होती. तरीही काहींनी या सूचनांकडे दूर्लक्ष करुन मोबाईलचा वापर करुन मतदान करतानाची स्वत:ची छायाचित्रे व चित्रफितीचे समाजमाध्यमांव्दारे प्रसारण केले, त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. 

****


बुधवार, १७ एप्रिल, २०१९

मतदार जनजागृतीसाठी उमरग्यातील माजी सैनिकांनी दिला आवाज 18 एप्रिल ला मतदान करा ! मतदान करा !


 


उस्मानाबाद /प्रतिनिधी 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अंतर्गत  जिल्ह्यात मतदान 18 एप्रिल रोजी होणार आहे. या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे.


अशाच प्रयत्नाचा भाग म्हणून आज बुधवार, दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता उमरगा शहरात प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठठल उदमले व तहसिलदार संजय पवार,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती मेजर फिरासत यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शहाजी चालुक्य यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिकांच्या शिस्तबध्द अशा मतदार जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीतून माजी सैनिकांनी उमरग्यातील नागरिकांना आवाज दिला... 18 एप्रिल ला मतदान करा! मतदान करा! आपली लोकशाही बळकट करा!


या रॅलीत काशिनाथ चौधरी, सूर्यकांत जाधव, व्यंकट चौधरी, राजेंद्र बेंडकाळे, लक्ष्मण कलबुर्गे, ज्ञानेश्वर पवार, किशोर गायकवाड, खंडू दुधमाने, बालवीर शिंदे, केशव गायकवाड, आदिनाथ घोरपडे, अशोक सूर्यवंशी, शिवाजी वडदरे, शिवाजी सौंदर्गे, श्रीमंत आठोरे, बसवण्णा होंडरगे,बब्रुवान गायकवाड आदी माजी सैनिकांनी विशेष सहभाग नोंदविला. रॅलीच्या सुरुवातीस गटशिक्षणाधिकारी देविदास बनसोडे यांनी मतदार जागृती, मतदानाविषयीचे महत्व विषद केले व शेवटी शहाजी चालुक्य यांनी उपस्थितांचे आभार मानले.   


मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात मतदानाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करुन मतदानाचे प्रमाण वाढावे, याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. देशाच्या विकासाला दिशा देण्‍यासाठी आपण मतदान करणे, हे प्रत्येक मतदाराने लक्षात घेऊन जाणीवपूर्वक मतदान केले पाहिजे, यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महिला, खेळाडू, कलाकार, शिक्षक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी, तृतीयपंथी, जेष्ठ नागरीक, दिव्यांग, माजी सैनिक अशा सर्वांच्या सक्रिय आणि उत्स्फूर्त सहभागाने विविध प्रकारे संपूर्ण जिल्हयात मतदार जागृती अभियान मोठया प्रमाणावर राबविण्यात आले. आता प्रतिक्षा आहे ती प्रत्यक्ष मतदान मोठया संख्येने होण्याची.


निवडणूक प्रक्रियेतील मतदारांचा सक्रिय सहभाग, यशस्वी व सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी गुरुवारी 18 एप्रिल रोजी मतदान निश्चित करावे, असे आवाहन सर्व जनतेला, मतदारांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक आर.राजा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी, समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांनी केले आहे.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)





मंगळवार, १६ एप्रिल, २०१९

जिल्हा प्रशासन निवडणूक प्रक्रियेसाठी,उमेदवार लढतीसाठी तर जनता मतदानासाठी सज्ज !

 


 

 

उस्मानाबाद/प्रतिनिधी 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अंतर्गत  जिल्ह्यात मतदान 18 एप्रिल रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन निवडणूक प्रक्रियेसाठी… उमेदवार लढतीसाठी तर जनता मतदानासाठी सज्ज झाली आहे.

 या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात मतदानाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करुन मतदानाचे प्रमाण वाढावे, याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. देशाच्या विकासाला दिशा देण्‍यासाठी आपण मतदान करणे, हे प्रत्येक मतदाराने लक्षात घेऊन जाणीवपूर्वक मतदान केले पाहिजे, यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महिला, खेळाडू, कलाकार, शिक्षक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी, तृतीयपंथी, जेष्ठ नागरीक, दिव्यांग, माजी सैनिक अशा सर्वांच्या सक्रिय आणि उत्स्फूर्त सहभागाने विविध प्रकारे संपूर्ण जिल्हयात मतदार जागृती अभियान मोठया प्रमाणावर राबविण्यात आले. आता प्रतिक्षा आहे ती प्रत्यक्ष मतदान मोठया संख्येने होण्याची.

निवडणूक प्रक्रियेतील मतदारांचा सक्रिय सहभाग, यशस्वी व सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी येत्या 18 एप्रिल रोजी मतदान निश्चित करावे, असे आवाहन सर्व जनतेला, मतदारांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक आर.राजा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी, समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांनी केले आहे.

दि.18 एप्रिल रोजी होणा-या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईलचा वापर निषिध्द - जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे


 

उस्मानाबाद /प्रतिनिधी 

जिल्ह्यातील 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान होणार असून निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाईल वापरावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

मतदानाच्या दिवशी वा मतमोजणीच्या दिवशी पसरणारे आणि पसरविल्या जाणाऱ्या अफवांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणूनच मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष वगळता अन्य कोणत्याही कर्मचा-याला तसेच उमेदवाराच्या प्रतिनिधीलाही मतदान केंद्रात मोबाईल वापरता येणार नाही, असे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. मतदान केंद्रातील माहिती चुकीच्या पध्दतीने बाहेर पडून त्यातून अफवा पसरु नयेत, हा आयोगाचा हेतू असून असे केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तात्काळ निकाली निघण्यास मदत होईल, लोकसभा निवडणूक पारदर्शीपणे पार पाडली जावी, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून मोबाईल बंदी हा त्याचाच एक भाग आहे.

बऱ्याचदा मतदान केंद्रात कार्यरत असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून केंद्रात चाललेल्या किरकोळ घडामोडींचीही माहिती भ्रमणध्वनीच्या माध्यमातून बाहेर असलेल्या व्यक्तींना दिली जाते, त्यामुळे अनावश्यक गंभीर गोष्टी घडतात. मतदान यंत्र, मतदार यादी यासंदर्भात मतदारांच्या तक्रारी असल्या तरी त्या मतदान केंद्रातच सोडविण्याची व्यवस्था निवडणूक यंत्रणेने केली आहे मात्र काही व्यक्तींकडून त्याबाबत चुकीचे संदेश मोबाईलव्दारे पसरविले जातात, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. हे टाळण्यासाठी मतदान कर्मचारी असो वा उमेदवारांचे प्रतिनिधी किंवा मतदार यापैकी कोणालाच मोबाईल वापरता येणार नसल्याची खास दक्षता निवडणूक यंत्रणेने घेतली आहे. याबाबत उमेदवारांना यापूर्वीच अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत तर मतदारांनीही मतदानाला येताना शक्यतो मोबाईल आणूच नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडूनही करण्यात आले आहे. तरीही मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्याची व्यवस्था निवडणूक यंत्रणेने केली आहे.

मात्र केंद्रात काही अडचण निर्माण झाल्यास केंद्राध्यक्ष त्यांचा मोबाईल वापरू शकतात, अशी मुभाही त्यांना देण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वापर करण्याबरोबरच चुकीचे संदेश व्हायरल करण्याचे प्रकार सर्रास घडतात त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये आणि मतदानाच्या दिवशी सर्व निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडावी, यासाठी निवडणूक आयोगाने सर्व बाबतीत विशेष दक्षता घेतली असून त्याची जिल्हा निवडणूक यंत्रणेकडूनही काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.

तरी गुरुवार,दि.18 एप्रिल रोजी होणा-या मतदानाच्या दिवशी मतदारांनी, उमेदवारांनी, उमेदवारांच्या प्रतिनिधींनी, प्राधिकृत न केलेल्या अधिकारी-कर्मचा-यांनी मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

मोफत पशुआरोग्य सर्वरोग निदान शिबीर संपन्न

नळदुर्ग/प्रतिनिधी 

भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने वात्सल्य सामाजिक संस्था,नळदुर्ग यांच्यावतीने पशुवैद्यकीय दवाखाना नळदुर्ग व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती,तुळजापूर यांच्या सहकार्यातून गोवंश चारा छावणी,रामतीर्थ नळदुर्ग येथे मोफत ‘पशुआरोग्य सर्वरोग निदान शिबिर’संपन्न झाले.यावेळी गर्भ तपासणी,खुरकत,लाळ लसीकरण,गोचीड इंजेक्शन, जंतनिर्मूलन याशिवाय पशूंच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व प्रकारची वैद्यकीय तपासणी झाली. प्रारंभी नळदुर्ग येथील व्यवसायिक एस.के.जागीरदार,जैन युवक मंडळ ग्रुपचे अध्यक्ष श्री सुधीर पाटील,उपाध्यक्ष श्री प्रवीण कासार, डॉ.अंबादास कुलकर्णी,श्री प्रभाकर घोडके, संस्थाचालक श्री वैभव जाधव, यांच्या हस्ते गोपूजन करून शिबिराची सुरुवात झाली.सदरील शिबिरासाठी नळदुर्गचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा रेडडी,परिचर श्री सुभान शेख, श्रीनिवास मुदावळे,सत्यजित कदम,सतिश राठोड,बालाजी जाधव यांचे सहकार्य लाभले

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...