रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी दौऱ्यावर आले असता पाटोदा (चौरस्ता) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) रोजगार आघाडी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील चैत्यविहार जागे संदर्भात अप्पर सचिव मंञालय यांची मान्यता घेण्या संदर्भात रामदास आठवले यांना निवेदन देण्यात आले.त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू असे सांगीतले यावेळी परमेश्वर भालेराव,किशोर भालेराव, बालाजी माटे,विजय भालेराव समाधान मस्के,बालाजी नागटिळे,दादासाहेब घोडके मुबारक गवंडी,ज्ञानेश्वर मस्के, मंगलताई कांबळे आदी शेकडो रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते
(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा