शनिवार, ११ मे, २०१९

लोहारा शहरात पाणी व्यवसाय फोफावला


लोहारा   /  सुमित झिंगाडे 

 नगरपंचायत ने दहा दिवसातून एकदा पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यापासून लोहारा शहरात पाणी विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू असून टँकरद्ररे पाणी विक्री जोरात सुरू झाली आहे, याबरोबरच शहरातील हातपंप बोअरवेल देखील पाण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे, जून महिन्यापर्यत पाणी विकत घेतल्या शिवाय पर्याय नाही श्रीमंत लोक पाणी विकत घेऊन वापरतील मात्र सर्वसामान्य गरीब नागरिकांना पाणी विकत घेणे शक्य नाही, ते मिळेल तेथून पाणी घेऊन वापरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, मागे काही महिन्यांपूर्वी पाणीपुरवठा विभागाने किमान दोन तीन वर्षे सुरळीत पाणी मिळेल, असे म्हटले होते, पण आता दहा दिवसातून एकदा पाणी सोडले जात असल्याने सामान्य नागरिकांची तारांबळ उडत आहे,ज्याच्या कडे वयक्तिक बोअर आहे,त्याचेही पाणी गायप झाल्याने खाजगी टँकरने पाणी घेणे महाग झाले आहे, गरीबाणा हे शक्य नाही, पाणी विकतही घेता येत नाही आणि घेतले तर साठवावे कुठे, असा प्रश्न त्याच्या समोर उभा असतो ,त्यामुळे दहा दिवसातून एकदा पाणी या निर्णयामुळे सर्वाची चिंता वाढली आहे, ऐन में महिन्यात दहा दिवसाला पाणी सोडण्याचा निर्णय नगरपंचायतने घेतल्याने सर्वत्र टंचाईग्रस्त परस्थिती निर्माण झाली आहे, या टंचाईचा लाभ खऱ्या अर्थाने खाजगी टँकरने पाणी विक्री करणाऱ्यांना होत असून यात गोरगरीब नागरीकाना मोठी अडचण होत आहे, यावर्षी तर पाऊस कमी प्रमाणात होईल असे भाकीत केले गेले आहे, हे भाकीत खरे ठरले तर गेल्यावर्षी सारखीच परिस्थिती पुन्हा उदभवणार आहे अशी भिती वाटत आहे या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकातून चिंता व्यक्त केली जात असून पाऊस मुबलक पडावा अशी सर्वाची अपेक्षा आहे,




(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...