रविवार, २१ एप्रिल, २०१९

नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात बोट पलटी होऊन तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू मृतांमध्ये दोन मुली तर एक मुलाचा समावेश

नळदुर्ग /प्रतिनिधी 

 किल्ल्यात येणाऱ्या लोकांसाठी ठेवण्यात आलेल्या बोटीतून नौकाविहार करीत असताना बोटीत बसलेल्या मुलांचे  तोल समोरच्या बाजूला गेल्याने  बोट पलटी झाल्यामुळे तीन मुलांचे पाण्यात बुडाल्याने

 मृत्यू झाला. तर या बोटीत बसलेल्या इतर सहा जणांनासह बोट चालकाला वाचविण्यात यश आले. ही घटना 20 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की नळदुर्ग येथील एहसान नय्यर काजी हे आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ऐतिहासिक किल्ल्यातील बोरी नदी मध्ये नौकाविहारासाठी असलेल्या बोटीत आपली दोन मुलं तसेच बहिणीच्या पाच मुली व भावाची एक मुलगी असे एकूण नऊ जणांना बोटीमध्ये बसून नौकाविहार करीत असताना बोटीत बसलेल्या मुलांपैकी काहीजण अचानक समोर आल्याने बोट समोरच्या बाजूला झुकल्याने पलटी झाली व या घटने मध्ये एहसान काजी यांचा मुलगा ईजान एहसान काजी वय 5 वर्षे व त्यांची पुतणी सानिया फरोख काझी वय 7 वर्ष सर्व रा. नळदुर्ग तसेच त्यांची भाची अलमास शफिक जागीरदार वय 12 वर्ष रा .मुंबई हे मुलं पाण्यात बुडवून मरण पावले तर त्यांच्यासोबत असलेले 1) सायमा शफिक जागीरदार वय 18 वर्ष 2) अफशा शफिक जागीरदार वय 16 वर्ष 3) बुशेरा शफिक जागीरदार वय 14 वर्ष  4)अननस नौशाद पटेल वय 12 वर्ष सर्व रा. मुंबई 5) एहसान नयर काजी वय 35 वर्ष व त्यांची मुलगी अलिजा एहसान काजी वय 5 वर्ष तसेच बोटीचा रायडर(चालक) श्याम गायकवाड यांना युनिटी मल्टीकॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व इतर लोकांनी सतर्कता बाळगून वाचविण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच वरील 7 जणांना वाचविण्यात यश आले. या दुःखद घटनेत एहसान काझी यांना आपला एक मुलगा, एक पुतणी  व एक भाची गमवावी लागली या दुःखद घटनेमुळे काझी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.बोट उलटुन काही जण पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वारे, हिना  शेख हे पोलीस फाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मयत पैकी सानिया फरोख काझी व ईजान एहसान काजी चुलत भावा बहिणी पाण्यात बुडाल्यामुळे त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी सुमारे तीन ते चार तास लागले यासाठी शहरातील काही तरुणांनी बोटीसह इतर मार्गाचा वापर करून मृतदेह बाहेर काढले. यावेळी तुळजापूरचे उपविभागीय अधिकारी  नीलम बाफना मंडळ अधिकारी गांधले, तलाठी कदम, रफिक फुलारी इत्यादी जणांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला. तसेच या घटनेत मयत झालेली अलमास शफिक जागीरदार या मुलीस पाण्यात बुडाल्यानंतर तात्काळ बाहेर काढून येथील शासकीय रुग्णालयांमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे या मुलीला वेळेवर उपचार नाही मिळाल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याने मुलीच्या मृत्यूस कारणीभूत वैद्यकीय अधिकारी विरोधात कारवाई करावी म्हणून मुलीचे नातेवाईक व इतर लोक  मोठ्या प्रमाणात जमल्याने काही काळ  प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात तणाव निर्माण  झाला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन  तुळजापूरचे  उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप घुगे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिले यावेळी मयत मुलीचे नातेवाईक व शहरातील लोकांनी नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकार्‍यांविरोधात कारवाई करावी म्हणून तुळजापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप घुगे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वारे, हिना शेख यांनी संतप्त जमावाला शांत करून चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे मोठा अनर्थ टळला.  या दुःखद घटनेत तीन लहान मुलांना आपला जीव गमवावा लागला याबद्दल नळदुर्ग शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...