शनिवार, ४ मे, २०१९

खाकी वर्दीतुन जपला सामाजिक भाव


ळदुर्ग /प्रतिनिधी 

खाकी वर्दी म्हटली की बंदोबस्त हे समीकरणच रुढ झाले आहे.उन,वारा,पाऊस कशाचीही तमा न बाळगता आपल्या कर्तव्यावर सदैव तत्पर अशी ओळख या पोलिस खात्याची आहे. एवढेच नाही तर वेळप्रसंगी सणासुदीच्या दिवसातही कुटुंबापासून दुर राहून बंदोबस्ताला प्राधान्य म्हणूनच ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’हे पोलीस खात्याचे ब्रीद आहे. रस्त्यावर ही वर्दी उभी दिसली की सगळे वातावरण  नीटनेटके असते.एक प्रकारचा रुबाब त्यातून जाणवतो. सज्जनांना आधार तर दुर्जनांना धाक वाटतो. एवढ्या सगळ्या धकाधकीत समाजातील सर्व प्रकारच्या सामाजिक कामात सहभाग घेणे,काम करणार्‍यांना प्रोत्साहन देणे ही नक्कीच साधी गोष्ट नाही पण ही किमया साधली आहे नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  संजीवन मिरकले  यांनी यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे संपूर्ण मराठवाडा भीषण दुष्काळाशी तोंड देत आहे. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांच्या प्रेरणेतून रामतीर्थ,नळदुर्ग येथे वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिली विनाअनुदानित गोवंश चारा छावणी मागील महिन्याभरापासून सुरू आहे.दातृत्व असलेले अनेक गोप्रेमी यासाठी कार्यरत आहेत.सदरील  चारा छावणीस नळदुर्गचे पोलीस अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी 1000 कडबा पेंडी साठी लागणारी आर्थिक मदत देऊन सामाजिक भाव जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...