नळदुर्ग/प्रतिनिधी
नळदुर्ग येथील काँग्रेसचे नगरसेवक श्री.बसवराज धरणे यांनी वात्सल्य संस्थेच्या माध्यमातून चालू असलेल्या गोवंश चारा छावणीस 400 कडबा पेंडी भेट दिली.सदरील मदत तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराचे महंत श्री इच्छागिरी महाराज यांच्या हस्ते स्वीकारण्यात आली.
यावेळी महंत श्री इच्छागिरी महाराज म्हणाले,की दुष्काळी परिस्थिती मुळे तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाई बरोबर चाराटंचाईचे संकट शेतकर्यांसमोर उभे आहे. अशा परिस्थितीत जिवापाड सांभाळलेले दावणीचे पशुधन कसे सांभाळायचे असा प्रश्न शेतकऱ्यासमोर होता. याचे उत्तर वात्सल्य सामाजिक संस्थेने समाजातुन दानशूरांच्या सहकार्यातून गोवंश चारा छावणी सुरू करून सोडवले आहे.सध्या ज्वारीच्या कडब्याला सोन्याचा भाव आला आहे.अशा स्थितीत श्री बसवराज धरणे यांनी 400 पेंडी कडबा भेट देऊन सामाजिक जाणिवेचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोलापूर जिल्हा संघचालक शिवाजीराव पाटील, प्रांत पदाधिकारी निलेश भंडारी, शिवानंद कल्लुरकर,माधव पवार,अँड धनंजय धरणे,डॉ. अंबादास कुलकर्णी,उमेश नाईक, अँड जनक पाटील, अमित शेंडगे, प्रवीण चव्हाण,श्री भीमाशंकर बताले, अप्पू कलशेट्टी,
कोप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा