बुधवार, १७ एप्रिल, २०१९

मतदार जनजागृतीसाठी उमरग्यातील माजी सैनिकांनी दिला आवाज 18 एप्रिल ला मतदान करा ! मतदान करा !


 


उस्मानाबाद /प्रतिनिधी 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अंतर्गत  जिल्ह्यात मतदान 18 एप्रिल रोजी होणार आहे. या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे.


अशाच प्रयत्नाचा भाग म्हणून आज बुधवार, दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता उमरगा शहरात प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठठल उदमले व तहसिलदार संजय पवार,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती मेजर फिरासत यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शहाजी चालुक्य यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिकांच्या शिस्तबध्द अशा मतदार जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीतून माजी सैनिकांनी उमरग्यातील नागरिकांना आवाज दिला... 18 एप्रिल ला मतदान करा! मतदान करा! आपली लोकशाही बळकट करा!


या रॅलीत काशिनाथ चौधरी, सूर्यकांत जाधव, व्यंकट चौधरी, राजेंद्र बेंडकाळे, लक्ष्मण कलबुर्गे, ज्ञानेश्वर पवार, किशोर गायकवाड, खंडू दुधमाने, बालवीर शिंदे, केशव गायकवाड, आदिनाथ घोरपडे, अशोक सूर्यवंशी, शिवाजी वडदरे, शिवाजी सौंदर्गे, श्रीमंत आठोरे, बसवण्णा होंडरगे,बब्रुवान गायकवाड आदी माजी सैनिकांनी विशेष सहभाग नोंदविला. रॅलीच्या सुरुवातीस गटशिक्षणाधिकारी देविदास बनसोडे यांनी मतदार जागृती, मतदानाविषयीचे महत्व विषद केले व शेवटी शहाजी चालुक्य यांनी उपस्थितांचे आभार मानले.   


मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात मतदानाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करुन मतदानाचे प्रमाण वाढावे, याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. देशाच्या विकासाला दिशा देण्‍यासाठी आपण मतदान करणे, हे प्रत्येक मतदाराने लक्षात घेऊन जाणीवपूर्वक मतदान केले पाहिजे, यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महिला, खेळाडू, कलाकार, शिक्षक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी, तृतीयपंथी, जेष्ठ नागरीक, दिव्यांग, माजी सैनिक अशा सर्वांच्या सक्रिय आणि उत्स्फूर्त सहभागाने विविध प्रकारे संपूर्ण जिल्हयात मतदार जागृती अभियान मोठया प्रमाणावर राबविण्यात आले. आता प्रतिक्षा आहे ती प्रत्यक्ष मतदान मोठया संख्येने होण्याची.


निवडणूक प्रक्रियेतील मतदारांचा सक्रिय सहभाग, यशस्वी व सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी गुरुवारी 18 एप्रिल रोजी मतदान निश्चित करावे, असे आवाहन सर्व जनतेला, मतदारांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक आर.राजा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी, समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांनी केले आहे.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...