सोमवार, १३ मे, २०१९

फळांच्या बिया साठवून ठेवा वृक्षलागवडीस सहाय्य करा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

 

     उस्मानाबाद,दि.१३- 

संपूर्ण भारतभर वृक्ष लागवडीचे महत्त्व जनसामान्यांपासून ते अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच कळून चुकले आहे. गेली दोन वर्षे वृक्ष लागवडीबाबत सर्वांनी गांभीर्याने एकत्रित प्रयत्न करून एक आदर्शवत असे काम करून दाखवले आहे.

         या वर्षीही उस्मानाबाद जिल्ह्यात वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन आहे. यामध्ये प्रशासनाबरोबरच लोकसहभागही महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की, पुढील काही दिवस आपण विविध फळांच्या बिया आपल्याकडे जमा करून ठेवाव्यात, या फळांच्या बिया प्रशासन आपल्या स्तरावरून एकत्र करणार असून नंतर पावसाळ्यापूर्वी या बिया जिल्ह्यात सर्वत्र जिथे शक्य आहे तिथे पेरण्यात येतील.

      या अनोख्या उपक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे, विभागीय वनाधिकारी राजेश्वर सातेलीकर, सामाजिक वनीकरण चे विभागीय वनाधिकारी श्री.बेडके आदींनी केले आहे.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...