गुरुवार, २ मे, २०१९

भारतबाई सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उदघाटन

तुळजापुर / प्रतिनिधी 

तुळजापुर शहर हे तिर्थ क्षेत्र असल्यामुळे शहरात भाविकांची गर्दी नेहमीच असते उन्हाळ्यात भाविकांना स्वच्छ व थंड पाणी पिण्यास मिळवे म्हणुन तुळजापुर नगर परिषदचे माजी नगरसेवक श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी  कै. सौ भारतबाई वसंतराव सुर्यवंशी यांच्या स्मरणार्थ शहरातील  पावणारा गणपती जवळ कायम स्वरूपी पाणपोई चालु केली. 

पाणपोईचे उदघाटन प्रभारी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे, पाळीकर पुजारी मंडळचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी नगरसेवक पंडितराव जगदाळे,   विजय आबा कंदले माजी नगरसेवक विनोद पिटु गंगणे, श्रीकृष्ण सुर्यवंशी, संतोष साळुंके, गणेश नन्नवरे, गणेश साळुंके, माऊली भोसले, आनंद नाईकवाडी, लखन पेंदे, विजय झाडपिडे, राजामामा भोसले, सचिन गरड, महेश सिरसट, चंद्रकांत झाडपिडे, सुरेश नेपते, अजय मस्के, विश्वास भोसले व शहरातील नागरिक उपस्थित होते.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...