तुळजापूर प्रहार जनशक्ती च्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन
मागण्या मान्य नाही केल्यास आमरण उपोषणास बसणार
तुळजापूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीच्या दान पेटीत भक्तांनी टाकलेल्या दान हे पिडित कुटूंबाच्या आरोग्य निधी म्हणून खर्च करण्याची मागणी तुळजापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नायब तहसिलदार मोहिते यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
नायब तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि तुळजाभवानी देवस्थांनाच्या वतीने जे गरीब लोक ज्यांची परिस्थीती हालाकीची आहे. ज्यांची दवाखान्याचा खर्च करण्याची आयपत नाही अशा रुग्णाना बाकीच्या देवस्थाना
प्रमाणे आर्थीक मदत करण्यात यावी.दर्शनासाठी येणा-या भाविकांना आरोग्याची सोय तात्काळ व्हावी यासाठी देवस्थान वतीने अँबुलन्सची सोय करण्यात यावी. महावितरणने ग्राहकांना बील वितरीत केले जाते ते अंदाजे व चुकीचे देवून ग्राहकंवर आर्थिक भुरदंड बसवला जातो ते बिल दुरुस्तीसाठीचे अर्ज मागीतले जातात पण त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. ग्राहकांची वारंवार हेळसांड केली जाते ती हेळसांड थांबवून ग्राहकांना न्याय देण्यात यावा.
पंचायत समितीद्वारे मंजूर केलेले स्वच्छालय अनुदान अधिका-याच्या बेजबाबदारी पणामुळे स्वच्छालयाचे बिल वेळेवर मिळत नाही. शासनाने तुळजापूर तालुका हा दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर केला असुन दुष्काळ भागात योजना तात्काळ सुरु करण्यात यावे, तालुक्यातील अवैध रित्या चालू असलेले धंदे खुलेआम चालू आहेत त्यावर प्रशासनाचा कसलाही धाक नसुन आवैद धंदे तात्काळ बंद करण्यात यावे आदी मागण्यासाठी अमरण उपोषण करण्यात येणार आहे.
याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदार सौदागर,तालुकाध्यक्ष शशिकांत मुळे,उपाध्यक्ष जुबेर शेख,तालुका सचिव अमर शेख,सोमनाथ झाडे,जिवन साखरे,हबीब पठाण,कृष्णा सावंत,सुनिल शिंदे,आदींच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत
(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा