सावरगावात वाऱ्यासह झालेल्या पावसात चार एकर केळीची बाग उध्वस्त
काटी/ प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव परिसरात गुरुवार दि.( 4 ) रोजी सायंकाळी सहा वाजनेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे
येथील विद्यमान सरपंच तथा शेतकरी रामेश्वर तोडकरी यांच्या चार एकर केळीची बाग उध्वस्त झाली असून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेले केळीचे पीक जमिनदोस्त झाल्याने सरपंच रामेश्वर तोडकरी यांचे सुमारे पाचलाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी रवि अंदाने यांनी शुक्रवारी दुपारी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन केळी बागेचा नुकसानीचा पंचनामा केला असून पंचनाम्यात पाच-लाखाचे नुकसान झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सरपंच रामेश्वर तोडकरी यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या शेतात चार एकर केळीची लागवड केली होती.
गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने चार एकर केळीची बाग उध्वस्त झाली. त्यामुळे तोडकरी यांचे वार्षिक नियोजन कोलमडले आहे. चार एकर केळीची बाग उध्वस्त झाल्याने यातून मिळणारे सुमारे पाच-लाखाचे नुकसान झाले आहे. रामेश्वर तोडकरी यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन या पिकाची पाहाणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा