गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

आताच्या सरकारने कर्जमाफी सोडाच फक्त ऑनलाईन फॉर्म भरण्यामध्येच शेतकरी दमवला- मधुकरराव चव्हाण

    आताच्या सरकारने कर्जमाफी सोडाच फक्त ऑनलाईन फॉर्म भरण्यामध्येच शेतकरी दमवला- मधुकरराव चव्हाण



     तुळजापूर/ प्रतिनिधी
गावातील प्रत्येक जागृत  नागरिकाने आपल्या गावात थांबून प्रत्येक घरातील व्यक्तीला आपल्या मताच्या अधिकाराचं महत्त्व पटवून सांगावे. प्रत्येकाने आपले गाव सांभाळून शंभर टक्के मतदान कसे होईल हे पहा, अन्यथा लोकशाहीची 'अब की बार फिर मोदी सरकार' ठोकशाही केल्याशिवाय राहणार नाही. असे परखड मत माजी दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण साहेब यांनी व्यक्त केले.
      काटगाव (ता. तूळजापूर) या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, रिपाई(क-ग) मित्रपक्ष संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना मधुकरराव चव्हाण म्हणाले," काटगाव मधील लोकांनी काँग्रेसवर प्रेम केले. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये काटगावने काँग्रेसला मदत केली. सर्वांनी मिळून काम केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष येत असतो. मीही संघर्षातूनच घडलो आहे. तसाच संघर्ष मधल्या काळामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असला तरी परका आक्रमण करत असेल तर सगळे एकत्र येऊन परक्याला त्याची जागा दाखवतात.तशीच वेळ आता आली आहे. पाच वर्षांपूर्वी भूलथापा देऊन 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून  नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.त्यांनी आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांना दिलेले एक ही वचन पाळले नाही.नरेंद्र मोदी यांनी किती थापा मारल्या त्याची यादी करा. ती यादी वाचायला तास लागेल. पंधरा लाख रुपये सर्वसामान्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यापासून ते परदेशातील काळा पैसा  भारतामध्ये परत आणावयाचा शब्द पाळला नाही. नोटबंदी करून अनेक छोटे-मोठे उद्योग बंद  पाडले .कुठे गेला काळा पैसा ?नोट बंदीच्या नावाखाली उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करून घेतला.
   शरद पवार कृषिमंत्री असताना एका झटक्यात 72 कोटी रुपये शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. आताच्या सरकारने कर्जमाफी सोडाच फक्त ऑनलाईन फॉर्म भरण्यामध्येच शेतकरी दमवला. पण !कर्जमाफी काय अजून केलेली नाही .कर्जमाफीची मुदत संपली तरी या सरकारचा अजून अभ्यास चालू आहे. सत्ता नसतानाही आपल्या भागाचा विकास करण्यासाठी 100 कोटीचा निधी आणला. आजवर ग्रामीण भागाच्या विकासासाठी विधानसभेमध्ये आवाज उठविला. या भागातील शेती, पाणी ,वीज ,उद्योग, रोजगार यासारखे अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवला. काटगाव मध्ये सर्व समाजाचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहेत.'हम सब एक है' यामुळे आपल्या भागाची पंचक्रोशीत ओळख आहे. लोकांनी आता ठरवले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडून लोकसभा आणि विधानसभेवर तिरंगा फडकवायचा आहे .आता पाच वर्षे गायब असणारे हंगामी उमेदवार तुमच्या दारात येतील. त्यांना एकच प्रश्न विचारा. तुम्ही पाच वर्षात आम्ही अडचणीत असताना आमच्यासाठी काय केले ते सांगा? मग मताचे बोलू.तुमच्या एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर तुम्हाला मिळणार नाही.आजवर या भागामध्ये काम केल्यामुळे चौथीपिढीसुद्धा संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या मागे ठामपणे उभे आहे. त्यामुळे आपला विजय निश्चितआहे.यावेळी महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
            यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाई (क-ग)चे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते, युवक ,युवती ,महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...