मंगळवार, २ एप्रिल, २०१९

नेते प्रचारात मतदार दुष्काळात निवडणुकीच्या नावाखाली अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार ग्रामीण भागात भिषण पाणी टंचाई

नेते प्रचारात मतदार दुष्काळात

निवडणुकीच्या नावाखाली अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार ग्रामीण भागात भिषण पाणी टंचाई


तुळजापूर / प्रतिनिधी 


तालुक्यात गत वर्षी सरासरी पेक्षा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने तसेच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ग्रामीण भागातील नागरीक पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती . विहीर,बोअर,हातपंप,तलावांच्या पाणीपातळीत वेगाने घट होत असून,परिणामी तालुक्यातील पाणी प्रश्न भेडसावणाऱ्या ३३ गावांमध्ये ६० खाजगी विहीर,बोअर अधिग्रहणावर प्रशासनाला ग्रामस्थांची तहान भागवावी लागत असली तरी वन्य प्राणी व पशु पालकांच्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था प्रशासनाने करावी अशी मागणी होत आहे.सततच्या दुष्काळी परिस्थिती मुळे  शेतकरी हा दुष्काळाच्या सावटाखाली मेटाकुटीला आला आहे. आणि दुसरीकडे लोकसभा निवडणूकीचे वारे यामुळे पुढारी प्रचारराजकारणात व्यत आणि अधिकारी निवडणूकीच्या अनुशंगाने माझी डीवटी बाहेरगावी आहे . अशी उत्तरे देतात पुढारी व अधिकाऱ्याच्या निषकाळजी , कामचुकार अधिकाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात भिषण पाणी टंचाई


तुळजापूर तालुक्यात १२३ गावाचा समावेश असताना १०८ ग्रामपंचायती तालुक्यामध्ये अस्तित्वात आहेत.अल्प पर्जन्यमाना मुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थिती ने ग्रामीण भागात पाणी टंचाई चे  भीषण रूप धारण केले आहे.त्याप्रमाणे ग्रामीन भागातून पंचायत समिती  स्तरावर विहीर,बोअर अधिग्रहणा सह टँकर साठी प्रस्ताव दाखल होत आहेत.त्याप्रमाणे पंचायत समिती ,तहसील प्रशासन स्थळ पंचनामा करून उपाय योजना करीत आहे.त्याप्रमाणे तालुक्यातील पाणी प्रश्न भेडसावणाऱ्या ३३ गावांमध्ये ६० खाजगी विहीर ,बोअर अधिग्रहनाद्वारे ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जात आहे.तसेच पंचायत समिती कडे ८ प्राप्त प्रस्तावापैकी ३ प्रस्तावाची गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी संयुक्त पाहणी केली असून पाच प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्रलंबित आहेत.तर पंचायत समिती कडे खुदावाडी,भातंब्री, वडगाव काटी,चिवरी येथून टँकर ची मागणी आली आहे,यातील भातंब्री येथील प्रस्ताव तहसील कडे पाठविण्यात आला आहे.याचबरोबर अधिग्रहण केलेल्या विहीर बोअरचे ही पाणी ग्रामपंचायतिच्या नियोजनामुळे ग्रामस्थाना वेळेवर मिळत नसल्याची ही तक्रारी आहेत. 


तसेच तालुक्यातील साठवण स्रोत पूर्ण क्षमतेने भरू शकले नाहीत,सध्या उन्हाची तीव्रता ही वाढू लागली असून यामुळे विहीर, तलाव,बोअर, कोरड्या पडत आहेत,लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणी साठा ही दिवसेंदिवस झपाट्याने खालावत आहे.तालुक्यात २० लघु प्रकल्प असून यापैकी १३ प्रकल्पात मृत साठा शिल्लक आहे.गंजेवाडी येथील एक प्रकल्प कोरडा ठाक पडला आहे.तसेच कसई प्रकल्पात ३१.९६ टक्के,आरळी ०.२५ टक्के,सांगवी- माळूंब्रा १६.९०टक्के ,इटकळ ३६.६३ टक्के,निलेगाव ४६.०५ टक्के,सांगवी काटी ०.०९ टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.


तसेच ४३ साठवण तलावापैकी ११ साठवण तलाव मृत साठ्यात आहेत,तर आपसिंगा,गंजेवाडी,केशेगाव, चिकुंद्रा, होर्टी क्रं १,सलगरा म,लोहगाव,नंदगाव,हंगरगा नळ,देवसिंगा तुळ, केमवाडी, फुलवाडी, वानेगाव, चिवरी क्रं १,चिवरी क्रं २,वडगाव हे १६ तलाव कोरडे ठक पडले आहेत.तर काळेगाव तलावात १०.०१टक्के,कुंभारी ८.८२टक्के,तामलवाडी ३४.३२ टक्के,देवकुरुळी ०.८५टक्के, धोत्री ४.३२ टक्के,अरबळी ०.०९ टक्के साठवण तलावात शिल्लक पाणी साठा आहे.तर नळदुर्ग ,अणदूर सह तुळजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कुरनूर मध्यम प्रकल्पामध्ये सध्या ८.५५ टक्के,अलियाबाद,जळकोट,नंदगाव, सिंदगाव या गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या खंडाळा मध्यम प्रकल्पामध्ये १३.८७ टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.असे असली तरी पाटबंधारे उपविभागाच्या साप्ताहिक पाणी पातळी अहवालानुसार असे दिसून येते की मध्यम प्रकल्पासह साठवण तलाव,लघु प्रकल्पामधील पाणी पातळीत झपाट्याने घट होत चालली आहे.


शेत शिवारातील बारमाही वाहणारे नदी, नाले,तलाव हेच जनावरांच्या ,वन्य प्राण्यांचे पाणी पिण्याचे एकमेव स्त्रोत आहेत.मात्र हेच स्रोत कोरडे पडल्याने वन्यप्राण्यासह पशुपालकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. नदी नाले,तलाव उन्हाळ्यापुर्वीच कोरडे पडल्याने उन्हाळ्याचे चार महिने तीव्र पाणी टंचाई चा सामना करावा लागणार आहे.पाणी टंचाई चा प्रश्न अधिक गंभीर झालेला आहे.एकवेळ गावातील नागरिक, महिला ,लहान मुले पाण्यासाठी आपल्या शिवारातील ज्या विहिरीना व बोअरला पाणी आहे अशी ठिकाणी हातामध्ये भांडी घेऊन पिण्याच्या पाण्याचा शोध घेऊन आपली तहान भागविताना दिसतात, मात्र पशुपालकांची जनावरे,वन्य प्राण्याना पिण्यासाठी पाणीच उपलब्ध होत नसल्यामुळे वन्य प्राणी,पशुपालकांच्या जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...