बुधवार, १० एप्रिल, २०१९

मद्य विक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश



 उस्मानाबाद/ प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाने दहा मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू केली आहे, त्यानुषंगाने मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपूर्वीच्या 48 तासांमध्ये मद्य विक्री करण्यास मनाई जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी)अन्वये जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 कलम 142 (1) अन्वये मतदान व मतमोजणी शांततेत व सुव्यवस्थित पार पडावी यासाठी मतदानाच्या एक दिवस अगोदर तथा मतदान वेळ संपण्यापूर्वी अठ्ठेचाळीस तास अगोदर म्हणजेच दि. 16 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते 17 एप्रिल 2019 रोजी संपूर्ण दिवस व मतदानाचा दिवस दि.18 एप्रिल 2019 रोजी मतदान संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच दि. 23 एप्रिल 2019 रोजी संपूर्ण दिवस जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध मुंबई मद्य निषेध कायदा 1949 च्या कलम 54  व 56 नुसार कठोर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.


 



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...