मंगळवार, १० एप्रिल, २०१८

शासनाचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्तारोको व मोफत भाजीपाला वाटप करुन आंदोलन


शासनाचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्तारोको व मोफत भाजीपाला वाटप करुन आंदोलन  


तुळजापूर (प्रतिनिधी) :-  

शेतकयांच्या भाजीपाल्यास हमीभाव मिळणे, विमा संरक्षण मिळणे बाबत दि. 26 मार्च रोजी दिलेल्या निवेदनावर कोणतीही उपाय योजना न केल्याने, दि. 10 एप्रिल (मंगळवार) रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री, यांना निवेदन देवून, शासनाचा निषेध म्हणून तुळजापूर येथील जुने बस स्थानकासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको" व मोफत भाजीपाला वाटप करुन अंदोलन करण्यात आले.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सद्यस्थितीमध्ये भाजीपाल्याचे भाव पडलेले आहेत, त्यामुळे राज्यातील शेतकरी हे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत, त्यामुळे शेतकयांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. 

ज्याप्रमाणे गुजरात राज्यामध्ये भाजीपाल्यास हमीभाव दिला जातो, त्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकयांना भाजीपाल्यास हमीभाव दिला जावा.  तसेच इतर शेती मालाप्रमाणे भाजीपाल्याला विमा संरक्षण देण्यांत यावे, जेणेकरुन शेतकयांना मोठे आर्थिक नुकसान होणार नाही. 

तसेच शहरी व ग्रामीण भागामध्ये आठवडा बाजार व रोजच्या भरणाया बाजारांमध्ये व्यापारी हे जागा धरुन बसत असल्याने, शेतकयांना सदर बाजारामध्ये जागा उपलब्ध होत नाही.  त्यासाठी सदर ठिकाणी शेतकयांसाठी 50 टक्के जागा आरक्षीत करण्यात यावी व त्या जागेत व्यापायांना बसण्यास मज्जाव करावा. 

तुर, हरभरा हमी केंद्र सुरु केले आहेत, परंतु ते फक्त नावापुरतेच सुरु आहेत. शेतकयांना चाळणीसाठी व हमालीसाठी दोनशे ते चारशे रुपये द्यावे लागत आहेत ते तात्काळ बंद करण्यात यावे.

वरील मागण्यासाठी दि. 26 मार्च रोजी तहसिल

दार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले होते.  परंतु त्याबाबत शासनाने कोणतीही उपाय योजना न केल्याने दि. 10 एप्रिल (मंगळवार) रोजी शासनाचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तुळजापूर येथील जुने बस स्थानकासमोर सकाळी 11-30 वाजता "रास्तारोको व मोफत भाजीपाला वाटप करुन अंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, धनंजय पेंदे, गुरव भोजने, बाळासाहेब जगताप, विष्णु गाटे जगदीश पलंगे, गणेश बेले, प्रदीप जगदाळे, शहाजी जगदाळे, चंद्रकांत नरुळे, संतोष भोजने, जयाजी जगदाळे, नाना साळुंके, राजा हाके, नितेश गाटे, संतु भोजने, विकास मारडे, विकास भोरे, जालींदर जाधव, संजय भोसले, संतोष कणे इत्यादीसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...