लोकनृत्य खुला गट लातूर व्ही एक्सप्रियेशन प्रथम व्यक्तिगत गटात अनामिक अहिरे आणि दीप्ती नायगावकर यांनी मारली बाजी
तुळजापूर /प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील आरळी बु. फेस्टिवल २०१८ मध्ये २५० कलाकारांनी कलाप्रदर्शन केले, हजारो ग्रामीण भागातील लोकांसाठी हा फेस्टिवल कलेची पर्वणी ठरला. दीड लाखाची रोख पारितोषके कुलस्वामिनी सूतगिरणीचे चेअरमन सुनील चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
७ ते ९ एप्रिल याकाळात हा फेस्टिवल येथील प्रांगणात पार पडला. जी.प. उपाध्यक्ष अर्चना ताई पाटील, धनेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ, प्रतापसिह पाटील, जी.प. सदस्य महेंद्र धुरगुडे, प.स. सदस्य चितिरंजन सरडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय शिंगाडे, मंगरूळ उपसरपंच प्रतापसिह सरडे, नायब तहसीलदार जाधव , अजिंक्य सरडे यांची उपस्थिती होती.
अखेरच्या दिवसाच्या सादरीकरणाचे उदघाटन संस्कारभारतीचे प्रांत सहमंत्री डॉ. सतीश महामुनी यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम, पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, युवा स्पंदन अध्यक्ष महेंद्र कावरे पत्रकार सोमनाथ बनसोडे, सरपंच सुनील पारवे यांची उपस्थिती होती.
लहान गट सोलो प्रथम दीप्ती नायगावकर -उस्मानाबाद्, व्दितीय श्वेता इनामदार - सातारा तृतीय, मोठा गट सोलो प्रथम अनामिका अहिरे - बीड, व्दितीय आशुतोष संकाये पाटील - पुणे तृतीय दिपाली नायगावकर -उस्मानाबाद, सुरज भोपी - लातूर ग्रुप डान्स लहान गट प्रथम एम जे ग्रुप डान्स -लातूर , व्दितीय राष्ट्रमाता ग्रुप डान्स -आरळी बु, तृतीय श्रेया राज पुणे व दुर्गा प्रशांत व्हरकट आरळी बु, ग्रुप डान्स मोठा प्रथम व्ही एक्सप्रियेशन डान्स स्टुडिओ -लातूर,व्दितीय ऑस्कर डान्स अकेडमी - लातूर , तृतीय देवी डान्स ग्रुप -तुळजापूर यांना कुलस्वामिनी सूतगिरणी अध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिके दिली गेली
परीक्षक डॉ मिलिंद माने -उस्मानाबाद उमेश व्हरकट -आरळी बु अपर्णा धोतरकर -आरळी बु राकेश सोनी - सोलापूर यांनी का पहिले तर निवेदक भावना कोल्हापूरकर -कोल्हापूर यांनी संपूर्ण फेस्टिवल मध्ये खुमासदार सूत्रसंचालन आणि प्रदर्शनीय नृत्ये सादर केली. मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील हजारो लोकांची हजेरी या फेस्टिवल चे खास आकर्षण ठरली. यावेळी डॉ सतीश महामुनी, युवास्पंदन अध्यक्ष महेंद्र कावरे यांनी भाषणे केली आयोजन समितीचे सरपंच सुनील पारवे, उपाध्यक्ष धैयशील नारायणकर, सचिव भीमराव पारवे, कार्याध्यक्ष अनिल आगलावे, डॉ. व्यंकट पाटील, नंदकुमार सरटकर, शशिकांत जाधव , प्रभाकर कचरे, विकास ज्योत, एकनाथ कोळी, सुधाकर पौळ दगडू शेख यांनी तीन दिवस परिश्रम केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा