मंगळवार, १० एप्रिल, २०१८

आरळी रत्नाचा गावच्या वतीने गौरव

आरळी रत्नाचा गावच्या वतीने गौरव

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बिभीषन जाधव राज्यात 53 वा 


तुळजापुर- तालुक्यातील आरळी बू येथिल सर्व सामान्य कुटुंबातील बिभीषन शिवजी जाधव या तरुणाने एम.पी. एस. सी. परीक्षेत राज्यात 53 वे स्थान मिळवत सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल समस्त आरळी बू ग्रामस्थ यांच्या वतीने आई वडील व बिभीषन जाधव कुटुंबीयांचा शाल,श्रीफल,फेटा,बांधून डॉ अब्दुल कलाम यांची प्रेरणा प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.

बिभीषन हा जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेत, उच्य शिक्षण करत आपले आई वडील हे शेत मजूरी करुन आपले शिक्षणासाठी मदत करतात याची जाणीव ठेवत जिद्दिने व चिकाटिने   अभ्यास करत त्याने हे यश प्राप्त करत ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात असा संदेश दिला. त्याच्या या यशबद्दल आरलीकरांनी त्याचा गौरव करुन त्याला पुढील कार्यसाठी शुभेच्या दिल्या.

यावेळी सरपंच सौ ज्योतिताई सुनील पारवे ,गांवतंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण व्हरकट, उपसरपंच डॉ व्यंकट पाटिल,भीमराव व्हरकट, चेअरमन अनिल जाधव,आरळी बू महोत्सव समिति अध्यक्ष सुनील पारवे ,उपाध्यक्ष धैर्यशील नारायणकर, सुधाकर उकरंडे,संजय पारवे,विकास जोत, प्रशांत व्हरकट, माउली सरटकर,शिवानंद गवळी ,यांच्या सह समस्त गांवकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

यावेळी संजय पारवे ,किरण व्हरकट, धैर्यशील नारायणकर विकास जोत,व सन्मानमूर्ती बिभीषन जाधव यांनी मनोगत व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...