रविवार, १५ जुलै, २०१८

गुरू रविदास पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन पालखी सोहळ्याचे सातवे वर्ष

गुरू रविदास पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

पालखी सोहळ्याचे सातवे वर्ष 

पंढरपूर/प्रतिनिधी 

गुरू रविदास पालखीचे दि 15 रोजी सोलापूर जिल्ह्यात  उत्साहाच्या वातावरणात आगमन झाले आहे पालखीचे सकाळी सातारा जिल्ह्यातील  फलटण नींबळक नाका येथून सकाळी  सात च्या सुमारास पुढील  प्रवासासाठी मार्गस्थ झाली त्यानंतर दुपारी शिंगणापूर फाट्यावर दुपारच्या भोजनानंतर भारुड गायनाचा कार्यक्रम झाला अतिशय उत्साहात हा पालखी सोहळा होत असून यामध्ये अनेक चर्मकार सह इतर समाजातील वारकरी सहभागी झाले आहेत पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच दादासाहेब शिंदे,महादेव होळकर,नानासाहेब शिंदे, हनुमंत मसुगडे, महादेव शिंदे यांनी स्वागत केले यावेळी संस्थापक तथा  पालखी सोहळा प्रमुख राजेश घोडके यांनी आभार मानले दि 15 रोजी  पालखीचा  मुक्काम माळशिरस तालुक्यातील पिरळे गावातील माध्यमिक शाळेत असणार आहे तर पालखी दि 16 रोजी पुन्हा पंढरपूर च्या दिशेने मार्गस्थ होणार आहे हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी पालखी सोहळा प्रमुख राजेश घोडके यांच्या सह गुरू रविदास  पालखी सोहळ्याचे सदस्य परिश्रम घेत आहेत पालखीचे जागोजागी मोठया उत्साहात स्वागत करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...