बुधवार, ११ जुलै, २०१८

शेतीच्या वादावरून एकास मारहाण बारा लोकांवर गुन्हा दाखल

तुळजापुर /प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावातील शेतात पेरणी करीत असताना शेतीच्या वादातून

 १० ते १२ जनानी एकास काठीने दगडाने मारुन जख्मी केल्याची घटना घडली.                  या बाबत पोलीस सुञाकडुन मिळालेली माहिती अशी की दि.७ शनिवार रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील काक्रंबा गावातील शिवारात आण्णासाहेब रामा हिवरे रा.उपळेमळा ता.बार्शी जि.सोलापूर हे व त्यांचे  व वडील व,दाजी,दाजीच्या शेतात पेरणी करीत असताना आरोपी क्रं(१) शकंर किसन देवगुंडे,२)प्रभाकर शंकर देवगुंडे ३) शारदा शंकर देवगुंडे ४)बालाजी रामचंद्र कोळेकर ५)दताञय माणिक कोळेकर ६) माणिक काशीनाथ कोळेकर ७)नागनाथ रामचंद्र कोळेकर ८)फुलचंद रामचंद्र कोळेकर ९)हरिदास सुर्यभान कोळेकर १०)हनमंत नागनाथ सरक ११) हरीभाऊ माने व १२)शिवाजी अभिमान हांडे सर्व रा.काक्रंबा ता.तुळजापुर यांनी शेतात पेरणी करीत असताना संगनमत करुन गैर कायद्याची मंडळी जमवुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ, करीत काठीने,व दगडाने मारहान करुन जख्मी केले.आण्णासाहेब हिवरे यांच्या फिर्यादीवरुन तुळजापुर पोलीस ठाण्यात १२ जनाविरुद्ध गु.र.नं. 211/2018 कलम 143,147,324,323,504,506भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पो.ना.राठोड करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...