सोमवार, २ जुलै, २०१८

उस्मानाबाद पोलिसांचे नागरिकांना आवाहन

उस्मानाबाद पोलिसांचे नागरिकांना आवाहन 

 तुळजापूर/न्यूज सिक्सर

गेल्या अनेक दिवसांपासून मुले पळविणारी टोळी आली म्हणून मारहाण करण्यात आली त्यामध्ये

 अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे त्या अनुषंगाने उस्मानाबाद पोलीस यांच्या कडून खालील प्रमाणे आवाहन करण्यात आले आहे  सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, मागील काही दिवसापासून काही समाजकंटक  व्हाट्स अॅप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवा पसरवित आहेत. अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत तर काही घटनांत खून झाले आहेत. त्यातून अशा जमावावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या धुळे,नंदुरबार,जळगांव, नाशिक  जिल्ह्यातही अशा अफवा पसरविल्या जात असून लोकात भीती  पसरली असल्याचे निदर्शनास आले आहे. 

 

त्यामुळे जनतेस आवाहन करण्यात येत आहे की, अफवांवर  विश्वास ठेऊ नका. अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. खात्री केल्याशिवाय सोशल मिडीयावर आलेला कोणताही मॅसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये. सोशल मिडियातून आलेल्या मॅसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अफवा पसरविणाऱ्या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. अफवा पसरविण्यास हातभार लावल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अफवेला बळी पडून आपल्या हातून गंभीर गुन्हा घडल्यास संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी स्वतःहून कायदा हातात घेऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे व ही माहीती आपल्या सर्व काॅन्टॅक्ट व गृपला शेअर करावी. असे आवाहन उस्मानाबाद पोलीस यांच्याकडून  करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...