शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

भारतीय जवानांना जळकोट येथील विद्यार्थिनींनी रक्षाबंधना निमित्त पाठवल्या राख्या व शुभेच्छा संदेश

जळकोट दि.25  मेघराज किलजे 

 भारतीय जवान डोळ्यात तेल ओतून रात्रंदिवस भारत देशाच्या सीमेच रक्षण करत असतात.या जवानांना लढण्याची उर्मी ,ताकत मिळावी यासाठी जळकोट ( ता.तुळजापूर ) येथील विविध शाळांत शिक्षण घेत असलेल्या तीनशे मुलींनी सीमेवर रक्षण करणाऱ्या आपल्या जवान भावांना रक्षाबंधनानिमित्त रेशीम धाग्याच्या रुओअने राख्या पाठवल्या आहेत. जळकोट येथील युवक बालाजी पालमपल्ले व निलेश पोतदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन तीन चार दिवस मेहनत घेऊन जळकोट येथील जिल्हा परिषद शाळा ,जि.प.प्राथमिक मुलींची शाळा ,पार्वती कन्या प्रशाला ,जि.प .प्राथमिक संभाजीनगर भाग शाळा ,कुलस्वामिनी आश्रम शाळा ,शिवाजी काळे कनिष्ठ महाविद्यालय व इंग्लिश मेडीअम स्कूलमध्ये जाऊन रक्षाबंधनानिमित्त भारतीय जवानांना रक्षाबंधनानिमित्त रेशीमधागे पाठवण्याचे आवाहन केले असता या उपक्रमाला सर्व शाळांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विविश शाळेतील विद्यार्थिनी यांनी एक राखी ,एक शुभेच्छा संदेश लिहून बंद पाकिटात भारतीय जवानाला राखी पाठवली आहे.यामध्ये जि.प.प्राथमिक शाळा संभाजीनगर या शाळेतील छोट्या छोट्या बहिणींनी स्वतः राख्या तयार करून जवानांना लढण्यासाठी व भारतीय सीमेच रक्षण करण्यासाठी उर्जा निर्माण करून दिली आहे. या सर्व राख्या दि. 25 रोजी रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला भारतीय टपालाद्वारे संयोजक बालाजी पालमपल्ले व निलेश पोतदार यांच्या खास खास जवानांना लिहलेल्या संदेश पत्राद्वारे या राख्या पाठवण्यात आल्या आहेत.या सर्व शाळामधील बॉक्सद्वारे जवानांना राख्या पाठवण्यात आल्या आहेत. विविध शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करून जावांना रक्षाबंधनानिमित्त शूभेच्छा  देण्यात आल्या.बालाजी पालमपल्ले व निलेश पोतदार यांनी राबलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या उपक्रमात विविध शाळेत पार पडलेल्या कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी जी.एन.सर्जे ,कुलस्वामिनीचे संचालक महेश कदम ,मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे ,श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालयाचे अध्यक्ष तथा  पत्रकार मेघराज किलजे ,पत्रकार वीरभद्र पिसे ,उपक्रमाचे संयोजक बालाजी पालमपल्ले व निलेश पोतदार , उपक्रम सहकारी अजिंक्य माने ,सचिन माळगे , सागर राजमाने, माजी सैनिक प्रकाश कदम,गुंडाप्पा यादगौडा ,जि.प.प्रशालेचे तलमोडे , राठोड सर ,सोमवंशी सर ,जिल्हा परिषद प्राथमिक कन्या  प्रशालेचे  प्रभारी मु.अ.सय्यद सर , ,पार्वती कन्या प्रशालेचे मु.अ. लता सोमवंशी ,सह्हायक शिक्षक विजयकुमार मोरे ,बसवराज मडोळे ,पंडित कदम ,अभिमन्यू कदम , एस.एच.व्हटकर, आर.एम तळेकर ,एम .एम.गुड्ड ,बी.ए.कवठे ,लाळे ,जि.प.प्राथमिक शाळा संभाजीनगरचे मु.अ.धनराज रेणुके ,जिल्हा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष एन.एन..इटकरी ,आदर्श शिक्षक जि.एन.सोनवणे ,जि,के,मुरमुरे ,नाना क्षीरसागर ,एम,एस,रेणुके ,एम.बी.महामुनी , .ए.एस.गायकवाड ,एस.एम भोसले .एस.जी . क्षीरसागर ,कुलस्वामिनी आश्रमशाळेचे मुख्याद्यापक चव्हाण सर, डे.एम पांढरे ,ए.एच.चव्हाण , शिवाजी काळे कनिष्ठ महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे दिनेश कलाल , पवन जाधव ,प्रतिभा पवार ,सहशिक्षिका कारले , नासरजंगे ,संस्थेचे सचिव गहिनीनाथ काळे आदीसह विविध शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी ,माजी सैनिक ग्रामस्थ ,उपस्थित होते .



(अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या,जाहिरात,वर्गणीदार, प्रतिनिधी होण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606,9637938555)

1 टिप्पणी:

  1. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी , तसेच सामाजिक भान ठेवून त्याचं उत्तरदायित्व म्हणून हाती घेतलेल्या आपल्या शुभकार्यास मनःपूर्वक शुभेच्छा .

    उत्तर द्याहटवा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...